हगवणे कुटुबीयांच्या पोलीस कोठडीत वाढ ?

पुणे : वैष्णवी मृत्यू प्रकरणात हगवणे कुटुबीयांच्या पोलीस कोठडीत वाढ होण्याची शक्यता आहे. न्यायालयाने वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे तसेच सासू लता हगवणे, नणंद करिष्मा हगवणे आणि पती शशांक हगवणे या पाच जणांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली होती. या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्यामुळे आज पाचही आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे. यावेळी चौकशीसाठी तसेच काही कायदेशीर प्रक्रियांसाठी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी पोलिसांकडून केली जाण्याची शक्यता आहे.

वैष्णवीला तिच्या सासरच्या मंडळींकडून सतत मानसिक त्रास दिला जात होता. तिला वेळोवेळी मारहाण करण्यात येत होती. कौटुंबिक कलह, हुंड्याची मागणी आणि आर्थिक कारणांमुळे हा छळ दिवसेंदिवस वाढत गेला. अखेर सहनशक्तीचा अंत होऊन वैष्णवीने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष पोलिसांनी मांडला आहे. या प्रकरणात अजूनही निलेश चव्हाण हा आरोपी फरार आहे. वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर हगवणे कुटुंबाने तिचे बाळ निलेशच्या ताब्यात दिले होते. बाळाची विचारपूस करण्यासाठी गेल्यावर निलेशने वैष्णवीच्या माहेरच्यांना पिस्तुलाचा धाक दाखवला होता. यामुळे पोलीस निलेशला शोधत आहेत.

शवविच्छेदन अहवालानुसार अर्थात पोस्टमॉर्टेम रिपोर्टनुसार वैष्णवीच्या शरीरावर २९ जखमा आढळल्या. यापैकी १५ जखमा या तिचा मृत्यू होण्याआधीच्या २४ तासांतील होत्या. वैष्णवीला वारंवार पाईप, गज आदी वापरुन बेदम मारहाण करण्यात आली होती.
Comments
Add Comment

भारताचे आतापर्यंतचे सर्वात मोठे संरक्षण बजेट

नवी दिल्ली : यंदाच्या बजेटमध्ये संरक्षण विभागासाठी ७.८ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संरक्षणासाठी

अजित पवारांच्या अस्थी नेताना पदाधिकाऱ्यांना अश्रू अनावर

मुंबई: दि.१ फेब्रुवारी - आम्ही एनडीएसोबत आहोत आणि कायम सोबत राहण्याचा निर्णय झालेला असून मी कोणतीही गोष्ट

आत्मनिर्भर नवा भारत घडवण्याच्या प्रक्रियेतील मैलाचा दगड ठरणारा अर्थसंकल्प : मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि.१: प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात आत्मनिर्भर नवा भारत घडवण्याच्या प्रक्रियेतील

महाराष्ट्राला मिळणार सुमारे 1 लाख कोटी!

विकसित भारताकडे दमदार पाऊल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. १:- पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या

आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या मार्गावर नेणारा ऐतिहासिक अर्थसंकल्प

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला

भूतान, नेपाळ, श्रीलंका याविश्वासू मित्रांसाठी मदतीचा हात, संबंधातील कडवटपणामुळे बांगलादेशला आर्थिक झटका

नवी दिल्ली  : केंद्रातील मोदी सरकारने २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना आपल्या परराष्ट्र धोरणाचे