शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, खरिपाच्या MSP मध्ये वाढ

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशहिताचे पाच निर्णय घेण्यात आले. यातील एका निर्णयामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. केंद्र सरकारने खरिपाच्या MSP मध्ये अर्थात किमान आधार मुल्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने २०२५ - २०२६ या वर्षासाठी धान्य, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन या खरिपाच्या पिकांसाठी किमान आधारा मुल्यात वाढ केली आहे. शेतकऱ्यांना किमान आधार मूल्य देण्यासाठी सरकारने यंदा दोन लाख सात हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात थेट वाढ होणार आहे.



तांदुळासाठी प्रति क्विंटल किमान २,३६९ रुपये मिळतील. सरकारी निर्णयानुसार तांदुळाच्या किमान आधार मुल्यात ६९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना तूर डाळीसाठी प्रति क्विंटल किमान आठ हजार रुपये मिळतील. सरकारने तूर डाळीच्या किमान आधार मुल्यात ४५० रुपयांची वाढ केली आहे. उडदाच्या डाळीचे किमान आधार मूल्य ४०० रुपयांनी वाढवून ७,८०० रुपये करण्यात आले आहे. मूग डाळीचे किमान आधारमूल्य ८६ रुपयांनी वाढवून ८,७६८ रुपये करण्यात आले आहे. मोदी सरकारने सत्तेत आल्यापासून अकरा वर्षात तेलबिया, डाळी आणि कापसाच्या किमान आधार मुल्यात अर्थात एमएसपीमध्ये सुमारे पन्नास टक्के वाढ केली आहे. मोदी सरकार शेतकऱ्यांच्या उत्पन्ना दुपटीपेक्षा जास्त वाढ व्हावी यासाठी सतत प्रयत्न करत आहे.



केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी आणखी एक निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डवर ४ टक्के व्याजदराने कर्ज मिळेल. याशिवाय, पायाभूत सुविधांच्या बाबतीतही सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आंध्र प्रदेशातील बडवेल नेल्लोर ४ पदरी महामार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. यासोबतच, रतलाम ते नागदा रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील वर्धा ते बल्लारशाह रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आंध्र प्रदेशमधील बडवेल ते नेल्लोर या चौपदरी महामार्गाच्या प्रकल्पालाही मंजुरी देण्यात आली आहे. हा १०८ किमी. चा प्रकल्प आहे.

Comments
Add Comment

तिरुपती लाडू वाद पुन्हा पेटला, लाडूवात बाथरूम साफ करायचे केमिकल...... ; मुख्यमंत्री नायडूंचे गंभीर आरोप

तिरुपती : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या शुद्धतेवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेच्या

इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, जाणून घ्या

दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला

Sikkim Earthquake: सिक्कीममध्ये जाणवले चक्क १३ भूकंपाचे धक्के

सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे

Bharat Taxi App: भारतीय टॅक्सी चालक ओला किंवा उबरपेक्षा किती जास्त कमावू शकतात?, जाणून घ्या...

मुंबई: जर तुम्ही ओला किंवा उबरने दररोज प्रवास करत असाल किंवा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करत असाल, तर ही बातमी

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.