५ हजार ६०० शेतकऱ्यांच्या फळबागांचे नुकसान

...... ५३८ हेक्टरवरील पिकेही बाधित


पालघर : पालघर जिल्ह्यात ६ व ७ मे रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे फळबागांना चांगलाच फटका बसला आहे. ५ हजार ६०० शेतकऱ्यांच्या २ हजार १६३ हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले असून, १ हजार ९२३ शेतकऱ्यांच्या ५३८ हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना मदत मिळावी म्हणून पालकमंत्री गणेश नाईक यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री. नितेश राणे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे. जिल्ह्यात सहा व सात मे रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे २ हजारांहून अधिक घरांची पडझड झाली आहे. त्याचप्रमाणे धाकटी डहाणू येथील ९८ बोटींसह १०२ बोटीचे नुकसान झाले आहे.



वसई तालुक्यातील अर्नाळा गाव, अर्नाळा किल्ला, पाचूबंदर तसेच पालघर तालुक्यातील ३ गावांमधील सुक्या मासळीचा व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या सुक्या मासळीचे नुकसान झाले आहे.घरांचे, शेती पिकांचे आणि फळबागांचे नुकसान झाल्यामुळे सर्वे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी दिले होते. नुकसानीचा सर्वे पूर्ण झाला असून वादळी वारा व पावसाचा फटका सर्वाधिक फळबागांना बसला आहे. २ हजार १६३ हेक्टर वरील फळबागांचे नुकसान वादळी वारा व पावसामुळे झाले आहे.


तसेच शेती पिकांसह घरांची सुद्धा मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना, मच्छीमार बांधवांना शासकीय मदत त्वरित मिळावी म्हणून, पालकमंत्री गणेश नाईक यांनी मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २१ कोटींच्या निधीची मागणी केली आहे.



शुक्रवारच्या पावसाने १०३० घरांचे नुकसान


तीन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे सुद्धा जव्हार आणि विक्रमगड तालुक्यातील १०३० घरांचे नुकसान झाले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांना सुद्धा लवकरच मदत करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

Vasai : रुळावर उभा राहून ट्रेन अडवण्याचा प्रयत्न? वसई-नालासोपारा दरम्यान लोकल थांबली प्रवशांना सुटला घाम!

पालघर: वसई-नालासोपारा रेल्वे स्थानकांदरम्यान पश्चिम रेल्वे मार्गावर बुधवारी एक धक्कादायक घटना घडली. एका

Flood Relief Maharashtra : पालघर, वसई-विरार पूरग्रस्तांना राज्य सरकारची विशेष मदत; घरांसाठी 1.5 लाख, कुटुंबाला 10 हजार रुपये

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय; पूरग्रस्त, शेतकरी, मच्छीमार, दुकानदार आणि

Nalasopara News : नागेला तलाव पुन्हा ठरला जीवघेणा! 18 वर्षीय तरुणाचा बळी, सुरक्षेअभावी नागरिक आक्रमक

नालासोपारा : नालासोपारा पूर्व भागातील नागेला तलावात (Nagela Lake) बुडून १८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक

Palghar : अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या पालघरची सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनी केली पाहणी

पालघर : पालघर जिल्ह्यात २२ ते २४ जुलै २०२६ या कालावधीत झालेल्या विक्रमी अतिवृष्टीमुळे सार्वजनिक रस्ते, पूल आणि

Palghar Rain : मुंबई-गुजरात रेल्वे सेवेवर पावसाचा मोठा परिणाम; वंदे भारत, शताब्दीसह अनेक गाड्या रद्द

पालघर : पालघर जिल्हा आणि गुजरातमधील वलसाड (Valsad) परिसरात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) जोर सलग दुसऱ्या दिवशीही कायम आहे.

Palghar Rain : पालघरमध्ये अतिवृष्टीचा इशारा; पालघर, डहाणू, तलासरीतील शाळा-महाविद्यालयांना आज सुट्टी

पालघर : भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department - IMD) पालघर जिल्ह्यासाठी २३ जुलै रोजी 'रेड अलर्ट' (Red Alert) आणि २४ जुलैसाठी