दक्षिण मुंबईकरांसाठी बुधवार, गुरूवारी पाणीबाणी

पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन


मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे 'ई' विभागातील पाणीपुरवठा सुव्यवस्थित करण्याकरिता नवीन कामे हाती घेण्यात आली आहेत. या अंतर्गत नवानगर, डॉकयार्ड मार्ग येथील जुनी १२०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी बंद करून, नवीन १२०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे. तसेच भंडारवाडा जलाशयाचा कप्पा १ वरील ९०० मिलिमीटर व्यासाचे जुने जलद्वार काढून नवीन ९०० मिलिमीटर व्यासाचे जलद्वार बसविण्यात येणार आहे. ही दोन्ही कामे बुधवारी २८ मे २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून हाती घेण्यात येणार आहेत.


हे काम गुरुवारी २९ मे २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या कालावधीमध्ये दक्षिण मुंबईतील कुलाबा ते भायखळा, माझगाव आदी परिसरातील काही भागांत १०० टक्के पाणीकपात केली जाणार असून काही भागांमध्ये अंशतः पाणीकपात करण्यात येणार आहे या परिसरातील नागरिकांनी, या जलवाहिनी बदलण्याच्या कामाच्या आधी आवश्यकतेनुसार पाण्याचा साठा करून ठेवावा.


तसेच, पाणीपुरवठा बंद असलेल्या कालावधीत पाण्याचा वापर काटकसरीने करावा. तसेच या जलवाहिनीच्या कामानंतर संबंधित परिसरांमध्ये पुढील दोन दिवस कमी दाबाने व गढूळ पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे, तसेच महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.



हे पॉइंटर्स


नेव्हल डॉकयार्ड पाणीपुरवठा परिक्षेत्र- सेंट जॉर्ज रुग्णालय, पी. डि'मेलो मार्ग, बाबूला टँक परिक्षेत्र, डोंगरी 'ब'परिक्षेत्र, मुंबई पोर्ट ट्रस्ट (बी. पी. टी.) परिक्षेत्र- संपूर्ण मुंबई पोर्ट ट्रस्ट (बी. पी. टी.) परिक्षेत्र, मध्य रेल्वे - रेल्वे यार्ड, भायखळा पश्चिम, मुंबई सेंट्रल, बाबूला टँक, चिंचपोकळी, काळाचौकी, माझगाव, डॉकयॉर्ड, जे जे रुग्णालय परिसर, भायखळा पूर्व आदी परिसरात पाणीकपात करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला