पावसाळा महापालिकेच्या पथ्यावर पडणार

असाच पावसाळा राहिल्यास राखीव कोट्यातील पाणी उचलण्याची येणार नाही वेळ


मुंबई :मुंबईकरांना पुरवठा होणाऱ्या जलसाठ्यांमध्ये सध्या केवळ १५.७५ टक्के एवढाच पाणी साठा शिल्लक असला तरी यंदा महापालिकेने पाणीकपात न करता मुंबईकरांना दैनंदिन पाणीपुरवठा १०० दशलक्ष लिटरने वाढवून दिला आहे. मात्र, पावसाने जर यंदा लावलेली हजेरी पुढे अशीच कायम ठेवल्यास मुंबईकरांना दिल्या जाणाऱ्या पाण्यासाठी महापालिकेला अधिक पैसे मोजावे लागणार आहे. त्यामुळे यंदाची पावसाची हजेरी ही महापालिकेचा पाण्यासाठी होणारा संभाव्य खर्च टाळणारी ठरण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.



मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या धरण तथा तलावांमधून दैनंदिन ४००० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जात आहे. सध्या यासर्व धरण तथा तलावांमध्ये वर्षभराच्या एकूण १४ लाख ४७ हजर ३६३ दशलक्ष लिटर पाण्याच्या तुलनेत सध्या २५ मे २०२५ पर्यंत १५.७५ टक्के एवढा पाणी साठा उपलब्ध आहे, तर मागील वर्षी याच तारखेला सुमारे ९.६९ टक्के एवढा पाणी साठा उपलब्ध होता. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत साठा अधिक असला तरी पाण्याची वाढती मागणीचा विचार करता भविष्यात पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून पाणीकपात करावी लागू नये यासाठी महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांच्या मागणीनुसार, भातसा आणि उर्ध्व वैतरणा धरणातील राखीव जलसाठ्यातून महापालिकेला पाणी उपलब्ध करून देण्यास जलसंपदा विभागाने मान्यता दिली आहे.


त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणातील पुरेसा पाणी साठा आणि भविष्यात राखीव कोटा लक्षात घेता १०० ते १२५ दशलक्ष लिटर पाणी साठा वाढवण्यात आला. या सर्व धरणातील पाणी साठा ८ टक्क्यांवर येताच राखीव कोट्यातील पाणी उचलण्यात येईल. राखीव कोट्यातून उर्ध्व वैतरणा धरणातून ६५ लाख क्युसेस आणि भातसातून १ लाख ११ हजार क्युसेस पाणी उचलले जाईल. मात्र, हे पाणी गरजेनुसार उचलले जाईल.


जर पाऊस आल्यास येथील पाणी उचलले जाणार नाही. कारण शासनाच्या धरणातून उचलल्या जाणाऱ्या महापालिकेला पैसे मोजावे लागतात. त्यामुळे आवश्यकतेनुसार राखीव कोट्यातील पाणी उचलले जाईल असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे यंदा पावसाने ज्याप्रकारे हजेरी लावली आहे, तीच जर पुढील काही दिवस कायम राहिल्यास मुंबईला पाणीपुरवठा करताना तलावातील वाढणाऱ्या पाणी साठ्यामुळे राखीव पाणी साठ्यातील उर्ध्व वैतरणा आणि भातसामधून पाणी उचलण्याची गरज भासणार नाही आणि ते पाणी उचलल्यास यासाठी मोजले जाणारे पैसे सरकारला अदा करण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे संभाव्य खर्च टाळता येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. महापालिका जलअभियंता पुरुषोत्तम माळवदे यांच्याशी संपर्क साधला असता सध्या तलाव क्षेत्रात पाऊस दिसून येत नाही. पण पुढे पावसाळा कसा असेल याची खात्री नाही, पण साडेआठ टक्क्यापर्यंत साठा गेल्यास उर्ध्व वैतरणा आणि भातसाच्या राखीव साठ्यातून पाणी उचलावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.



सर्व तलाव क्षेत्रातील पाणी साठा
२५ मे २०२५ : २ लाख २७ हजार ९९५ दशलक्ष लिटर (१५.७७ टक्के)
२५ मे २०२४ : १ लाख ४० हजार २२० दशलक्ष लिटर (०९.६९ टक्के)
२५ मे २०२३ : २ लाख १८ हजार ५१० दशलक्ष लिटर (१५.१० टक्के)

Comments
Add Comment

Snake Spotted Polling Station : चेंबूरमधील मतदान केंद्रात विषारी सापाचं दर्शन! सुरक्षा रक्षकांमध्ये भीतीचं वातावरण; थेट आला अन्...

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीसाठी आज सकाळी मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी चेंबूर परिसरातील

Tejasvee Ghosalkar : मतदानाच्या दिवशी तेजस्वी घोसाळकर भावूक! आज शारीरिकदृष्ट्या अभिषेक सोबत नसले, तरी...

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत असताना, दहिसरमधील वॉर्ड क्रमांक २ मध्ये एक अत्यंत

Maharashtra Election 2026 Voting : आज दारू मिळणार? बँका सुरु आहेत का? आज काय काय सुरु आहे? वाचा संपूर्ण यादी

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी

BMC Elections : ही सुट्टी म्हणून घरात बसून राहू नका...; नाना पाटेकरांचे मतदारांना कळकळीचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्र आज एका मोठ्या राजकीय वळणावर उभा आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांच्या २,८६९ जागांसाठी आज मतदान

मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत वाहतूक नियोजनात बदल; काही मार्गांवर प्रवेश मर्यादित

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार असून, या प्रक्रियेच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी

BMC Election 2026 : महापालिका निकाल प्रक्रियेत बदल; मुंबईत मतमोजणीसाठी नव्या नियमांची अंमलबजावणी

मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. १५ जानेवारी रोजी मतदान