Rain Update: जोरदार फटकेबाजीनंतर आजही पावसाची रिमझिम सुरूच, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्याला रेड अलर्ट

मुंबई: सोमवारी मुंबईसह महाराष्ट्रात धुंवाधार पाऊस बरसला. या जोरदार पावसामुळे संपूर्ण मुंबईची वाहतूकव्यवस्था कोलमडली होती. ठिकठिकाणी पाणी जमा झाल्याने नागरिकांची प्रचंड तारांबळ झाली. दरम्यान, सोमवारी जोरदार बरसल्यानंतर मंगळवारी सकाळपासून पावसाने काहीशी उसंत घेतली आहे.मात्र तरीही अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस सुरूच आहे.


मुंबईमध्ये रस्ते वाहतूक व्यवस्थित सुरू आहे तर लोकल गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने सुरू आहेत. दरम्यान, सोमवारच्या पावसानंतर मुंबईतील वातावरण थंडावले आहे. हवामान विभागाने आजही मुंबईला पिवळा अलर्ट दिला आहे. त्यामुळे पावसाची शक्यता आहे.


मुंबईत पावसाची रिपरिप सुरू असली तरी राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुणे, हिंगोली, नांदेड, परभणी तसेत रायगड येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, मच्छिमारांनी या दरम्यान समुद्रामध्ये जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.



मुंबई-गोवा महामार्गाची दुर्दशा


जोरदार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था खराब झाली आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे मोठमोठाले खड्डे पडले आहेत. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मात्र प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Comments
Add Comment

मुंबईतील २५२ कोटींच्या एमडी ड्रग्ज प्रकरणात मोठा खुलासा: सलीम शेखच्या कबुलीजबाबाने खळबळ

मुंबई : देशभरात खळबळ माजवणाऱ्या २५२ कोटी रुपयांच्या मेफेड्रोन (एमडी) प्रकरणात पोलिसांना आणखी एक मोठा धागा मिळाला

घाटकोपरमध्ये रस्ता रुंदीकरणातील अडथळा झाला दूर

बाधित २४ बांधकामांवर झाली अखेर कारवाई मुंबई (खास प्रतिनिधी) : घाटकोपर येथील झुणझुणवाला महाविद्यालय ते

उत्तर पश्चिम जिल्ह्यात महायुतीचे ३२ ते ३३ नगरसेवक निवडून आणणार

भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड ज्ञानमूर्ती शर्मा यांनी व्यक्त केला विश्वास मुंबई (सचिन धानजी) : उत्तर पश्चिम लोकसभा

लाडकी बहीण योजनेची वेबसाईट होत आहे अपग्रेड

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची सर्वाधिक लोकप्रिय योजना आहे. या योजनेचा सोळावा

दहिसरच्या राजकारणात उलथापालथ, वॉर्ड क्रमांक १ घोसाळकर कुटुंबाच्या आवाक्याबाहेर!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. पण राजकारणात हालचाली सुरू झाल्या आहेत. दहिसरमधील

शीतल म्हात्रे यांचा मोठा निर्णय : महापालिका निवडणूक लढवणार नाही, आमदारकीवर लक्ष केंद्रित!

मुंबई : शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे मुंबईच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरल्या आहेत.