Rain Update: जोरदार फटकेबाजीनंतर आजही पावसाची रिमझिम सुरूच, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्याला रेड अलर्ट

मुंबई: सोमवारी मुंबईसह महाराष्ट्रात धुंवाधार पाऊस बरसला. या जोरदार पावसामुळे संपूर्ण मुंबईची वाहतूकव्यवस्था कोलमडली होती. ठिकठिकाणी पाणी जमा झाल्याने नागरिकांची प्रचंड तारांबळ झाली. दरम्यान, सोमवारी जोरदार बरसल्यानंतर मंगळवारी सकाळपासून पावसाने काहीशी उसंत घेतली आहे.मात्र तरीही अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस सुरूच आहे.


मुंबईमध्ये रस्ते वाहतूक व्यवस्थित सुरू आहे तर लोकल गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने सुरू आहेत. दरम्यान, सोमवारच्या पावसानंतर मुंबईतील वातावरण थंडावले आहे. हवामान विभागाने आजही मुंबईला पिवळा अलर्ट दिला आहे. त्यामुळे पावसाची शक्यता आहे.


मुंबईत पावसाची रिपरिप सुरू असली तरी राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुणे, हिंगोली, नांदेड, परभणी तसेत रायगड येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, मच्छिमारांनी या दरम्यान समुद्रामध्ये जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.



मुंबई-गोवा महामार्गाची दुर्दशा


जोरदार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था खराब झाली आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे मोठमोठाले खड्डे पडले आहेत. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मात्र प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Comments
Add Comment

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला

मृणालताई गोरे विस्तारित उड्डाणपूलाच्या वाढीव खर्चावरून शंका; स्थायी समितीचे सदस्य करणार प्रत्यक्ष जागेची पाहणी

मुंबई: मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिम पर्यंतच्या रिलीफ रोड

सहली आडून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा घाट भाजपने उधळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांची राणीबाग आणि बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सहल आयोजित करण्याचा

अखेर महापौर चषक स्पर्धा होणार; सन २०२६-२७ मध्ये होणाऱ्या महापौर चषक क्रीडा स्पर्धांसाठी पाच कोटी रुपये निधीची तरतूद

मुंबई: डिजिटल युगात मुले भ्रमणध्वनीभोवती गुरफटली आहेत. मुले मैदानी खेळ विसरली आहेत. मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ कमी