अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात २१ लाखांचे नुकसान

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात गेले चार ते पाच दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात एकूण ५९ गावांना अतिवृष्टीचा फटका बसला असून यामध्ये २१ लाख ४४ हजार १७० रुपयांचे अंदाजित नुकसान झाले आहे.

जिल्ह्यातील ५९ गावांमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. यामध्ये पायाभूत सुविधांचेही अंशतः नुकसान झाले असून त्याची अंदाजित किंमत १५ हजार रुपये आहे. याबाबतचा आढावा जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आल्यानंतर ही माहिती उघड झाली आहे. यात सर्वाधिक फटका घरांना बसला आहे.

अहवालानुसार ५४ घरांचे अंशतः नुकसान झाले असून त्याचे अंदाजित मूल्य २० लाख २४ हजार १७० रुपये आहे. तर, २ घरांचे पूर्णपणे नुकसान झाले असून, त्याची अंदाजित किंमत १ लाख ५ हजार रुपये आहे. जिल्हा प्रशासनाकडून नुकसानीचा अधिक तपशीलवार आढावा घेतला जात असून बाधित कुटुंबांना आणि गावांना तातडीने मदत पोहोचवण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Comments
Add Comment

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

चंद्रपूर-यवतमाळ एसटीला अपघात

करंजी : करंजीजवळ महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एसटी बसला झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आणि दहा जण गंभीर

हॉलतिकीट नाही म्हणून परीक्षा नाही, विद्यार्थी गेले थेट पोलीस ठाण्यात ; धक्कादायक परीक्षा व्यवस्थापन

छत्रपती संभाजीनगर : मास्टर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनच्या (एमसीए) विद्यार्थ्यांना हॉलिकीट मिळाले नाही. यामुळे हे

उद्या मुंबईतील शाळांना सुट्टी; शाळा बंद आंदोलनाला मुंबई मुख्याध्यापक संघटनेचा जाहीर पाठिंबा

मुंबई: राज्यातील शिक्षक बांधवांच्या हक्कासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय

Vasantdada Sugar Institute : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीला वेग; १७ वर्षांचा आर्थिक लेखाजोखा मागवला

मुंबई : शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या आर्थिक व्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी सुरू

महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू?

राज्य निवडणूक आयोगाची आज आयुक्तांसोबत बैठक २७ महानगरांचे सोपे गणित, ५०% आरक्षणात जिल्हा परिषदा