महाराष्ट्रताज्या घडामोडीसिंधुदुर्ग

अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात २१ लाखांचे नुकसान

  24

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात गेले चार ते पाच दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात एकूण ५९ गावांना अतिवृष्टीचा फटका बसला असून यामध्ये २१ लाख ४४ हजार १७० रुपयांचे अंदाजित नुकसान झाले आहे.

जिल्ह्यातील ५९ गावांमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. यामध्ये पायाभूत सुविधांचेही अंशतः नुकसान झाले असून त्याची अंदाजित किंमत १५ हजार रुपये आहे. याबाबतचा आढावा जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आल्यानंतर ही माहिती उघड झाली आहे. यात सर्वाधिक फटका घरांना बसला आहे.

अहवालानुसार ५४ घरांचे अंशतः नुकसान झाले असून त्याचे अंदाजित मूल्य २० लाख २४ हजार १७० रुपये आहे. तर, २ घरांचे पूर्णपणे नुकसान झाले असून, त्याची अंदाजित किंमत १ लाख ५ हजार रुपये आहे. जिल्हा प्रशासनाकडून नुकसानीचा अधिक तपशीलवार आढावा घेतला जात असून बाधित कुटुंबांना आणि गावांना तातडीने मदत पोहोचवण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Comments
Add Comment

मराठा समाजाकडून लग्नसोहळ्यांसाठी आचारसंहिता जाहीर

अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी घटनेनंतर लग्नातील हुंडा, मानपान आणि शाही सोहळ्यांच्या

संजीवनीच्या १५ विद्यार्थ्यांना सॅप कोर्समुळे झेन्सर टेक्नॉलॉजित संधी

कोपरगांव : संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजने सॅप (सिस्टिम अ‍ॅप्लिकेशनस् अँड प्रॉडक्ट्स ) या सॉफ्टवेअर कंपनीशी

जामखेड कलाकेंद्र गुन्हेगारांचा अड्डा : रमेश आजबे

रंगा- बिल्लाच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे राजरोसपणे अवैध धंदे जामखेड : जामखेडमध्ये सध्या राजरोसपणे अवैध धंदे हे