अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात २१ लाखांचे नुकसान

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात गेले चार ते पाच दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात एकूण ५९ गावांना अतिवृष्टीचा फटका बसला असून यामध्ये २१ लाख ४४ हजार १७० रुपयांचे अंदाजित नुकसान झाले आहे.

जिल्ह्यातील ५९ गावांमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. यामध्ये पायाभूत सुविधांचेही अंशतः नुकसान झाले असून त्याची अंदाजित किंमत १५ हजार रुपये आहे. याबाबतचा आढावा जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आल्यानंतर ही माहिती उघड झाली आहे. यात सर्वाधिक फटका घरांना बसला आहे.

अहवालानुसार ५४ घरांचे अंशतः नुकसान झाले असून त्याचे अंदाजित मूल्य २० लाख २४ हजार १७० रुपये आहे. तर, २ घरांचे पूर्णपणे नुकसान झाले असून, त्याची अंदाजित किंमत १ लाख ५ हजार रुपये आहे. जिल्हा प्रशासनाकडून नुकसानीचा अधिक तपशीलवार आढावा घेतला जात असून बाधित कुटुंबांना आणि गावांना तातडीने मदत पोहोचवण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Comments
Add Comment

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग