Mumbai Rain: मुंबईत पावसाचा पहिला बळी; विक्रोळीत झाड कोसळून तरुणाचा मृत्यू

  57

मुंबई: मुंबईत कालपासून नैऋत्य मान्सूनचे जोरदार आगमन झाले, आणि या पहिल्याच पावसाने मुंबई शहराला अक्षरशः झोडपून काढले. मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील ठिकठिकाणी पाणी साचण्यासोबत झाड कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. दरम्यान, विक्रोळीतील कन्नमवार नगरमध्ये अशाच एका झाड कोसळण्याची घटना घडली आहे, ज्यामध्ये २६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तेजस नायडू असं या तरुणाचं नाव असून, तो आपल्या दोन मित्रांसोबत गणेश मैदानाजवळ पावसापासून आश्रय घेण्यासाठी झाडाखाली थांबला होता.



अंगावर झाड कोसळल्याने मृत्यू


मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये जोरदार पाऊस कोसळत होता. विक्रोळीतील कन्नमवार नगर येथील गणेश मैदानाजवळ तीन तरुण झाडाखाली उभे होते. पाऊसाबरोबरच वारे देखील प्रचंड वाहत होते, याचवेळी अचानक एक मोठं जंगली झाड त्यांच्या अंगावर कोसळलं.  झाड थेट तेजस नायडूच्या डोक्यात आदळलं, तर इतर दोन तरुण थोडक्यात बचावले गेले.


घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. तेजसच्या मित्रांनी आरडाओरड करून स्थानिक नागरिकांना मदतीसाठी बोलावलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. झाड हटवून तिघांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर तेजसला गोदरेज रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण तिथे त्याला मृत घोषित केले गेले..

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.