Mumbai Rain: मुंबईत पावसाचा पहिला बळी; विक्रोळीत झाड कोसळून तरुणाचा मृत्यू

मुंबई: मुंबईत कालपासून नैऋत्य मान्सूनचे जोरदार आगमन झाले, आणि या पहिल्याच पावसाने मुंबई शहराला अक्षरशः झोडपून काढले. मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील ठिकठिकाणी पाणी साचण्यासोबत झाड कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. दरम्यान, विक्रोळीतील कन्नमवार नगरमध्ये अशाच एका झाड कोसळण्याची घटना घडली आहे, ज्यामध्ये २६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तेजस नायडू असं या तरुणाचं नाव असून, तो आपल्या दोन मित्रांसोबत गणेश मैदानाजवळ पावसापासून आश्रय घेण्यासाठी झाडाखाली थांबला होता.



अंगावर झाड कोसळल्याने मृत्यू


मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये जोरदार पाऊस कोसळत होता. विक्रोळीतील कन्नमवार नगर येथील गणेश मैदानाजवळ तीन तरुण झाडाखाली उभे होते. पाऊसाबरोबरच वारे देखील प्रचंड वाहत होते, याचवेळी अचानक एक मोठं जंगली झाड त्यांच्या अंगावर कोसळलं.  झाड थेट तेजस नायडूच्या डोक्यात आदळलं, तर इतर दोन तरुण थोडक्यात बचावले गेले.


घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. तेजसच्या मित्रांनी आरडाओरड करून स्थानिक नागरिकांना मदतीसाठी बोलावलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. झाड हटवून तिघांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर तेजसला गोदरेज रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण तिथे त्याला मृत घोषित केले गेले..

Comments
Add Comment

महाराष्ट्रासाठी पुढील २४ तास महत्त्वाचे! कुठे कोसळणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. नोव्हेंबर उजाडला तरी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 'या' दिवशी लागणार आचारसंहिता, सूत्रांची माहिती

मुंबई: राज्यात सध्या सर्वांनाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यात

मुंबई महापालिकेचा मोठा उपक्रम, गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या कामाला सुरुवात

मुंबई: महापालिकेमार्फत राबविण्यात येणारा गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पांतर्गंत गोरेगावच्या दादासाहेब

खोदलेले चर बुजवण्यात कंत्राटदारांची हातचलाखी

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील अनेक रस्ते आणि पदपथाखालून विविध सेवा सुविधांचे जाळे जात असून यामध्ये तांत्रिक

वांद्रे पश्चिममधील एस. व्ही. रोडवरील त्या तुंबणाऱ्या पावसाच्या पाण्यापासून मिळणार मुक्ती

मुंबई (सचिन धानजी) : वांद्रे पश्चिम येथील एस व्ही रोड आणि के.सी मार्गावर पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या वारंवारच्या

ब्रिटिशकालीन १२ वर्षांच्या पुलाचा शेवट; रेल्वे ट्रॅकवरील काम जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई: मुंबईतील ११२ वर्षांचा जुना आणि महत्त्वाचा ब्रिटिशकालीन रस्ता पूल, एलफिन्स्टन पूल पाडण्याच्या कामाचा