Mumbai Rain: मुंबईत पावसाचा पहिला बळी; विक्रोळीत झाड कोसळून तरुणाचा मृत्यू

मुंबई: मुंबईत कालपासून नैऋत्य मान्सूनचे जोरदार आगमन झाले, आणि या पहिल्याच पावसाने मुंबई शहराला अक्षरशः झोडपून काढले. मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील ठिकठिकाणी पाणी साचण्यासोबत झाड कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. दरम्यान, विक्रोळीतील कन्नमवार नगरमध्ये अशाच एका झाड कोसळण्याची घटना घडली आहे, ज्यामध्ये २६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तेजस नायडू असं या तरुणाचं नाव असून, तो आपल्या दोन मित्रांसोबत गणेश मैदानाजवळ पावसापासून आश्रय घेण्यासाठी झाडाखाली थांबला होता.



अंगावर झाड कोसळल्याने मृत्यू


मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये जोरदार पाऊस कोसळत होता. विक्रोळीतील कन्नमवार नगर येथील गणेश मैदानाजवळ तीन तरुण झाडाखाली उभे होते. पाऊसाबरोबरच वारे देखील प्रचंड वाहत होते, याचवेळी अचानक एक मोठं जंगली झाड त्यांच्या अंगावर कोसळलं.  झाड थेट तेजस नायडूच्या डोक्यात आदळलं, तर इतर दोन तरुण थोडक्यात बचावले गेले.


घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. तेजसच्या मित्रांनी आरडाओरड करून स्थानिक नागरिकांना मदतीसाठी बोलावलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. झाड हटवून तिघांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर तेजसला गोदरेज रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण तिथे त्याला मृत घोषित केले गेले..

Comments
Add Comment

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील