‘घाबरू नका, पण काळजी घ्या’

  44

कल्याण  :कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत कडोंमपा कार्यक्षेत्रातील जनतेला सुचित करण्यांत येते की, जरी कडोंमपा कार्यक्षेत्रात कोविडने शिरकाव केला असला तरी, घाबरू नका पण काळजी घ्या. कडोंमपा कार्यक्षेत्रात कोविड नियंत्रणात आहे.


तरी, कोविडबाबत वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत जनतेला आव्हान करण्यात येत आहे. गर्दीच्या आणि बंदिस्त ठिकाणी विशेषतः सह-व्याधी असणाऱ्या व्यक्ती आणि वृद्ध यांनी जाणे टाळावे. डॉक्टर, पॅरामेडिकल अणि रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांनी आरोग्य संस्थामध्ये/रुग्णालयात मास्कचा वापर करावा. शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड झाकण्यासाठी रुमाल/टिश्यू वापरणे. हाताची स्वच्छता राखणे/वारंवार हात धुणे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळणे. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, घशामध्ये खवखवणे, श्वसनास त्रास होणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेऊन लवकर कोविड चाचणी करावी. श्वसनाच्या आजाराने ग्रस्त असल्यास वैयक्तिक संपर्क मर्यादित करणे. कोविड उपचार व निदानाची सोय सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. बाई रुक्मिणीबाई रुग्णालय, कल्याण व शास्त्रीनगर हॉस्पिटल, डोंबिवली येथे अलगीकरण कक्ष तयार करण्यांत आलेले असून ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध आहे.



त्याचप्रमाणे कोविडसाठी घेण्यात येणारी स्वॅब तपासणी दोन्ही रुग्णालयात करण्यात येते. कोविड तपासणी करण्यासाठी महापालिकेची गौरीपाडा आरटीपीसीआर लॅब उपलब्ध आहे. सौम्य लक्षणे असल्यास स्वतः खात्री करुन डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार व कोविड चाचणी करावी. लक्षणे सौम्य असली तरी कोविडचा प्रसार इतरांना होऊ नये म्हणून कार्यालयात, शाळा, महाविद्यालये ठिकाणी/गर्दीच्या ठिकाणी/सार्वजनिक ठिकाणी न जाता पूर्ण बरे होईपर्यंत स्वतः घरी अलगीकरण करावे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार व कोविड चाचणी करावी.


सध्या मुंबई-ठाण्यासह राज्यात कोरोनाचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. कोरोनामुळे मृत्यू झाल्याचीही नोंद झालेली आहे. तेव्हा पुन्हा कोरोनाच्या धास्तीचे वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचा कडोंमपाने निर्धार केला आहे.

Comments
Add Comment

उबाठा गटाचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

रामदास कांबळे यांची युवासेना कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती जाहीर ठाणे: मुंबई महानगरपालिकेतील सायन कोळीवाडा

भारत महासत्ता न होण्यासाठी तरुणाईला अंमली पदार्थांच्या आहारी लोटण्याचा परकीय शक्तींचा डाव

आयआरएस समीर वानखेडे यांचे वक्तव्य कल्याण  : ''आपला भारत देश हा महासत्ता होण्याच्या दिशेने अतिशय विश्वासाने आणि

पोलीस अधिकारी संभाजी देशमुख यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदक

कल्याण : पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय कामगीरीमुळे राज्य गुप्त वार्ता विभागातील पोलीस अधिकारी संभाजी देशमुख

ठाणेकरांनो, पाण्याचा जपून वापरा करा

मंगळवारी ८ तास पाणीपुरवठा बंद डोंबिवली  : केडीएमसीच्या कल्याण (पूर्व) परिसरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील

श्रीकृष्णनाथ पांचाळ ठाण्याचे जिल्हाधिकारी

मुंबई : जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची महाराष्ट्र सरकारने बदली केली असून ठाण्याचे

मध्य रेल्वेची ऐन सकाळी ठप्प झालेली वाहतूक सुरळीत, रेल्वे रुळाला तडे गेल्याने नोकरदारांचे झाले हाल

कर्जत: मध्य रेल्वेची लोकल वाहतूक आज सकाळी काही तासांसाठी विस्कळीत झालेली पाहायला मिळाली. पण रेल्वे प्रशासनाच्या