Mumbai-Goa highway : मुंबई गोवा महामार्गावरील ठेकेदारांच्या बेजबाबदार कारभारामुळे नागरिक त्रस्त

  59

ओहोळाचे पाणी शिरले थेट नागरिकांच्या घरात


लांजा : मुंबई गोवा महामार्गावर बांधकाम करणारे ठेकेदार कंपनी आणि अधिकारी वर्ग यांच्या बेजबाबदार आणि गलथान कारभारामुळे लांजा शहरातील ओहोळातील पाण्याचा निचरा होत नसल्याने साचलेले पाणी थेट येथील नागरिकांच्या घरात शिरले आहे. लांजा श्रीरामपल येथे ही घटना घडली आहे. त्यामुळे महामार्ग ठेकेदार कंपनीच्या संथपणे सुरू असलेल्या कामांचा हा नमुनाच पुढे आला आहे.

मुंबई गोवा महामार्गाची लांजा शहरात आधीच बिकट अवस्था आहे. ठिकठिकाणी महामार्गावर पडलेले खड्डे आणि मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले चिखलाचे साम्राज्य यातून नागरिकांना, पादचाऱ्यांना चालत जाणे एक प्रकारचे दिव्यच आहे. तर चिखल आणि खड्ड्यांमुळे वाहन चालकांचे देखील मोठे हाल होत आहेत. पावसाला सुरुवात झाल्यानंतर नागरिक आणि वाहन चालक यांची या महामार्गामुळे अतिशय बिकट परिस्थिती झाली आहे. साटवली फाटा ते बसस्थानक दरम्यान रोजच ट्रॅफिक जॅमची समस्या आहे.



लांजा शहरात श्रीराम पुलाचे काम मे महिन्यात हाती घेण्यात आले होते. सुरुवातीपासूनच हे काम धीम्या गतीने सुरू झाले. वास्तविक हे काम पावसाळ्यापूर्वीच किंवा मे महिन्या अगोदरच पूर्ण करणे गरजेचे होते. कारण मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी हा एकमेव आणि महत्त्वाचा पुल आहे. मात्र याचे काम धीम्या गतीने आणि उशिरा सुरू केल्याने याचा फटका सध्या बसत आहे.


या ठिकाणी वाहनांसाठी तयार करण्यात आलेल्या रस्त्याच्या ठिकाणी ओहोळाचे पाणी वाहून जाण्यासाठी एकच मोरी टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे या ओहोळाला आलेल्या प्रचंड पुराचे पाणी जाण्यासाठी एक मोरी अपुरी पडत असल्याने पुराचे पाणी या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरात शिरत आहे. पुराच्या पाण्याचा फटका हा रोजच त्यांना सहन करावा लागत आहे.

महामार्ग ठेकेदार कंपनी आणि अधिकारी वर्ग यांच्या चालढकल आणि बेजबाबदार धोरणामुळेच लांजातील नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत आहे. जर वेळीच पुलाचे, सर्व्हिस रोडचे कामपूर्ण झाले असते तर आजची ही परिस्थिती निर्माण झाली नसती, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.

Comments
Add Comment

Nirmala Sitharaman :अर्थमंत्री निर्मला सीतारामन पीएसयु बँकांची घेणार नवी दिल्लीत बैठक 'या' मुद्यांवर चर्चा अपेक्षित

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पब्लिक सेक्टर बँकांच्या अडचणी समजून घेण्याबरोबरच

Samsung Launch:सॅमसंगकडून भारतात २०२५ Bespoke AI अप्‍लायन्‍सेस लाँच

नाविन्‍यपूर्ण बीस्‍पोक एआय लॉण्‍ड्री कॉम्‍बोचे पदार्पण गुरूग्राम: देशातील आघाडीच्या इलेक्‍ट्रॉनिक्‍स

प्रहार विशेष 'एक्सप्लेनर' लेख: रिअल इस्टेट इनव्हेस्टमेंट ट्रस्ट (रिटस् REITs) म्हणजे काय?

लेखक - प्रतिक दंतरा (हेड – इन्व्हेस्टर रिलेशन्स अ‍ॅण्ड स्ट्रॅटेजी, नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट अ‍ॅण्ड एक्झिक्युटिव्ह

Pune Airport: प्रवाशांना घेऊन विमान पुण्यात तर आलं, पण सामान मागेच राहीलं!

स्पाइसजेटच्या दुबई-पुणे विमानाने इंधन भारामुळे प्रवाशांचे सामान न घेताच पुण्यात लँडिंग केले.  पुणे:  दुबईहून

Mayasheel Ventures: मायाशील वेंचर्सचे बाजारात जोरदार पदार्पण 'इतक्या' किंमतीवर शेअर झाला Listed

प्रतिनिधी: मायाशील वेंचर्स (Mayasheel Ventures) कंपनी आजपासून बाजारात सूचीबद्ध झाली आहे. त्यामुळे आज कंपनीचा पहिला दिवसच

Stock Market Update: सेन्सेक्स २६.६७ व ३७.०५ अंकाने वाढला ! सकारात्मक सुरुवात तेजीचे संकेत?

मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज किरकोळ वाढच अपेक्षित आहे. प्रामुख्याने सकाळी गिफ्ट निफ्टीत