Kasara Ghat : कसारा घाटात कोसळली दरड! पावसामुळे नैसर्गिक विज पडून एकाचा मृत्यू

नाशिक : जिल्ह्यामध्ये रोहिणी नक्षत्राचा पाऊस सुरू असून कसारा घाटामध्ये दरड कोसळली होती. जिल्ह्यातील चार तालुक्यांनी पावसाची शंभरी पार केलेली आहे. एकूणच जिल्ह्यामध्ये १७०.७ मिलिमीटर पावसाची नोंद आत्तापर्यंत करण्यात आलेली आहे.


नाशिक जिल्ह्यामध्ये ३ मे पासून सुरू झालेला बेमोसमी पाऊस २४ दिवसांमध्ये जिल्ह्यात एकूण १७० पॉईंट ७ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. तर, सोमवारी उशिरा १२ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील इगतपुरी पेठ सुरगाणा दिंडोरी नासिक या परिसरामध्ये पावसाचा जोर कायम आहे. सोमवारी रात्री उशिरा विजेच्या कडकड्याचा सह जिल्ह्यात झालेल्या पावसाने सुरगाणा तालुक्यातील सादूडने या ठिकाणी मुकुंदा लक्ष्मण वड यांचा हेल्यावर रात्री झालेल्या पावसामुळे नैसर्गिक विज पडून मृत्यू झाला.



इगतपुरी तालुक्यामध्ये सतत सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील कसारा घाट येथे मंगळवारी सकाळी दरडीचा काही भाग कोसळला. त्यामुळे वाहतुकी वरती परिणाम झाला होता. तातडीने ही दरड हलवून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये बागलाण येवला निफाड आणि चांदवड या चार तालुक्यांनी शंभरी पार केली आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात नागरिकांना खबरदारीचे उपाय केल्याचा आव्हान केलेला आहे. तर, हवामान विभागाने पुढील दोन दिवस नाशिक जिल्ह्यासाठी येलो अलर्ट घोषित केलेला आहे.

Comments
Add Comment

ॲमेझॉन इंडिया ने आर्मी विमेन्स वेल्फेयर असोसिएशन बरोबर केला सहकार्य करार

- सैन्यदलातल्या कुटूंबातील महिलांमध्ये व्यावसायिक संधी वाढीस लागण्यासाठी करणार मदत बंगळुरु : आंतरराष्ट्रीय

मॅरियट बॉनव्हॉय आणि स्विगीची भागीदारी; दैनंदिन जीवनात मिळणार आनंद

स्विगीच्या विविध ऑफरिंग्समधून मिळणार मॅरियट बॉनव्हॉयचे फायदे मुंबई : मॅरियट इंटरनॅशनलचा पुरस्कारप्राप्त

धक्कादायक! १२ वर्षाच्या विद्यार्थ्याने रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव, कारण ऐकून थक्क व्हाल...

सिनेमातले कथानकालाही लाजवेल असा एक प्रकार पवनी तालुक्यात समोर आला आहे. एका नामांकित शाळेतील १२ वर्षीय

गुढीपाडवा का साजरा केला जातो? जाणून घ्या गुढीपाडव्याचे महत्त्व, पूजा विधी आणि परंपरा

मुंबई : महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते महामंडळे पुढील अधिवेशनाच्या आत स्थापन करणार

-- मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही; पत्रकारांच्या समस्यांवर व्यापक बैठक घेणार मुंबई : पत्रकार आणि वृत्तपत्र

हा फक्त राष्ट्रपतींचा नव्हे, तर संविधानाचा अपमान, पंतप्रधान मोदींचा ममता सरकारवर घणाघात

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यक्रमात प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याच्या मुद्द्यावरून