Kasara Ghat : कसारा घाटात कोसळली दरड! पावसामुळे नैसर्गिक विज पडून एकाचा मृत्यू

नाशिक : जिल्ह्यामध्ये रोहिणी नक्षत्राचा पाऊस सुरू असून कसारा घाटामध्ये दरड कोसळली होती. जिल्ह्यातील चार तालुक्यांनी पावसाची शंभरी पार केलेली आहे. एकूणच जिल्ह्यामध्ये १७०.७ मिलिमीटर पावसाची नोंद आत्तापर्यंत करण्यात आलेली आहे.


नाशिक जिल्ह्यामध्ये ३ मे पासून सुरू झालेला बेमोसमी पाऊस २४ दिवसांमध्ये जिल्ह्यात एकूण १७० पॉईंट ७ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. तर, सोमवारी उशिरा १२ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील इगतपुरी पेठ सुरगाणा दिंडोरी नासिक या परिसरामध्ये पावसाचा जोर कायम आहे. सोमवारी रात्री उशिरा विजेच्या कडकड्याचा सह जिल्ह्यात झालेल्या पावसाने सुरगाणा तालुक्यातील सादूडने या ठिकाणी मुकुंदा लक्ष्मण वड यांचा हेल्यावर रात्री झालेल्या पावसामुळे नैसर्गिक विज पडून मृत्यू झाला.



इगतपुरी तालुक्यामध्ये सतत सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील कसारा घाट येथे मंगळवारी सकाळी दरडीचा काही भाग कोसळला. त्यामुळे वाहतुकी वरती परिणाम झाला होता. तातडीने ही दरड हलवून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये बागलाण येवला निफाड आणि चांदवड या चार तालुक्यांनी शंभरी पार केली आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात नागरिकांना खबरदारीचे उपाय केल्याचा आव्हान केलेला आहे. तर, हवामान विभागाने पुढील दोन दिवस नाशिक जिल्ह्यासाठी येलो अलर्ट घोषित केलेला आहे.

Comments
Add Comment

दीपिका करणार कमबॅक! २०२६ मध्ये बिग बजेट चित्रपटांमधून झळण्याची शक्यता

मुंबई: बॉलीवूडची ग्लॅम अभिनेत्री दीपिका पादुकोण २०२५ मध्ये अनेक वादांमध्ये अडकली. तिच्या आठ तास काम करण्याच्या

नववर्षाच्या सुरुवातीला भारतीय महिला संघाने घेतले बाबा महाकाल दर्शन

२०२५ च्या अखेरीस धमाका करणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या स्टार खेळाडूंनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला बाबा

'इक्किस' चित्रपटात दिसलेला अगस्त्य नंदा आणि बच्चन कुटुंबियांचे नाते काय?

मुंबई: भारतीय सिनेसृष्टीत हि-मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मेंद्र यांचा देशभक्तीपर इक्कीस हा शेवटचा चित्रपट

आणखी एका न्यायालयीन लढ्यात धनंजय मुंडेंचा विजय!

शपथपत्राविरोधात दाखल केलेली फिर्याद परळी न्यायालयाने फेटाळली परळी : माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा आणखी एका

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी इक्बाल सिंग चहल मुख्य निरीक्षक

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १५ जानेवारीला

नव्या विमानतळाच्या धावपटटीच्या कार्यक्ष्मतेसाठी ‘टॅक्सीवे एम’ कार्यान्वित

गर्दीच्या वेळी आगमन आणि प्रस्थानाचा गोंधळ टळणार मुंबई : जगातील सर्वात जास्त व्यस्त सिंगल-रनवे विमानतळांपैकी एक