Kasara Ghat : कसारा घाटात कोसळली दरड! पावसामुळे नैसर्गिक विज पडून एकाचा मृत्यू

  49

नाशिक : जिल्ह्यामध्ये रोहिणी नक्षत्राचा पाऊस सुरू असून कसारा घाटामध्ये दरड कोसळली होती. जिल्ह्यातील चार तालुक्यांनी पावसाची शंभरी पार केलेली आहे. एकूणच जिल्ह्यामध्ये १७०.७ मिलिमीटर पावसाची नोंद आत्तापर्यंत करण्यात आलेली आहे.


नाशिक जिल्ह्यामध्ये ३ मे पासून सुरू झालेला बेमोसमी पाऊस २४ दिवसांमध्ये जिल्ह्यात एकूण १७० पॉईंट ७ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. तर, सोमवारी उशिरा १२ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील इगतपुरी पेठ सुरगाणा दिंडोरी नासिक या परिसरामध्ये पावसाचा जोर कायम आहे. सोमवारी रात्री उशिरा विजेच्या कडकड्याचा सह जिल्ह्यात झालेल्या पावसाने सुरगाणा तालुक्यातील सादूडने या ठिकाणी मुकुंदा लक्ष्मण वड यांचा हेल्यावर रात्री झालेल्या पावसामुळे नैसर्गिक विज पडून मृत्यू झाला.



इगतपुरी तालुक्यामध्ये सतत सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील कसारा घाट येथे मंगळवारी सकाळी दरडीचा काही भाग कोसळला. त्यामुळे वाहतुकी वरती परिणाम झाला होता. तातडीने ही दरड हलवून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये बागलाण येवला निफाड आणि चांदवड या चार तालुक्यांनी शंभरी पार केली आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात नागरिकांना खबरदारीचे उपाय केल्याचा आव्हान केलेला आहे. तर, हवामान विभागाने पुढील दोन दिवस नाशिक जिल्ह्यासाठी येलो अलर्ट घोषित केलेला आहे.

Comments
Add Comment

Astrology: ज्या लोकांच्या नशीबात असतो खूप पैसा, त्यांच्यामध्ये दिसतात ही लक्षणे

मुंबई: हस्तरेषा शास्त्र हे व्यक्तीच्या हातावरील रेषा पाहून त्याचे भविष्य आणि नशीबाबाबत सांगितले जाते. दरम्यान,

ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे निधन

ठाणे : ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि व्याख्याते दाजी पणशीकर यांचे शुक्रवार, ६ जून रोजी संध्याकाळी ठाण्यातील राहत्या

घोडबंदर मार्गावर वाहतुकीत बदल

मेट्रो प्रकल्पाच्या खांबावर गर्डर टाकण्याचे काम हाती ठाणे : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत सुरू

नीट पीजी परीक्षा ३ ऑगस्टला

नवी दिल्ली : पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेशपूर्व परीक्षा अर्थात नीट पीजी परीक्षेची

आणखी एका गर्दीने घेतले नाहक जीव! मरण खरंच स्वस्त झालंय का?

मुंबई : आपल्या देशात कोणत्याही सण, उत्सव, सेलिब्रेशनसाठी होणारी गर्दी आणि त्यात जाणारे बळी हे नेहमीचंच झालंय.

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.