जामखेड - सौताडा रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी २९ पर्यंत डेडलाईन

जामखेड : जामखेड सौताडा महामार्गाचे शहरातील खर्डा चौक ते बीड रोड पर्यंतचे काम रखडले आहे. गेल्या दोन वर्षांपासून जामखेड सौताडा महामार्गाचे काम लांबले आहे. रखडलेल्या रस्त्याचे काम २९ मे पर्यंत करण्यात यावे अन्यथा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेमार्फत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तालुकाध्यक्ष पांडुरंग भोसले यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे

गेल्या दोन वर्षांपासून जामखेड शहारातील राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडलेले असून या रखडलेल्या कामामुळे जामखेड शहर तालुका व पर जिल्ह्यातील येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना हाल सहन करावे लागत आहेत. तसेच या रखडलेल्या कामामळे अनेक मोटारसायकल चालकांचे अपघात होऊन हात मोडणे, पाय मोडणे, अशा अनेक घटना दोन वर्षात घडल्या आहेत. जून महिन्यात सर्व शाळा विद्यालय सुरु होत आहेत. पावसाळा सुरु झाल्यामुळे रस्त्यावरती चिखलाचे साम्राज्य झाले आहे. रखडलेल्या कामामुळे नागरिकांचे आणि विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. प्रशासनाने रस्त्याचे काम २९ मे गुरुवार पर्यंत पूर्ण करावे नाहीतर आंदोलन करू आणि त्या आंदोलनाला प्रशासन जबाबदार राहील असे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेने जाहीर केले आहे.
Comments
Add Comment

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला