अवकाळीने शेतकऱ्यांवर मोठे संकट

पिकांच्या पंचनाम्याची क्रांतीसेनेची मागणी


राहुरी : तालुक्यातील कोंढवड परिसरात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, बियाण्यासाठी सोडलेल्या घास पिकाचे बियाणे काढणीपुर्वीच मोड फुटल्याने पूर्णतः निकामी झाले आहे. या पार्श्वभूमीवर क्रांतीसेनेचे राज्य संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई- निवेदन पाठवून तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई देण्याची मागणी केली आहे.

सदर निवेदनात म्हटले आहे की, राहुरी तालुक्यातील कोंढवड परिसरात मागील ५ ते ६ दिवसांपासून संततधार अवकाळी पावसाचे सत्र सुरू आहे. या भागातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात घास पिक बियाण्यासाठी सोडले होते. यासाठी अळी, मावा, तुडतुडे व फुलकिडे यांच्या नियंत्रणासाठी विविध रासायनिक औषधांची फवारणी केली. यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खर्च आला आहे. मात्र पावसाच्या सरीवर सरी कोसळत असल्याने बियाण्याला काढणीपूर्वीच मोड फुटून ती बियाणे पूर्णतः निकामी झाली आहेत.

परिणामी, या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.राज्य सरकारकडून मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, स्थानिक पातळीवर पंचायत समिती व महसूल विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

गावातील तलाठी यांना याबाबत कळवले असता, त्यांच्याकडे अशा प्रकारचे कोणतेही आदेश नसल्याचे त्यांनी सांगितले. तरी आपले सरकार हे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांप्रती संवेदनशील आहे. त्यामुळे राहुरी तालुक्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी पिक नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत. तालुक्यातील कोंढवड परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशा मागणीसह अवेळी पडणाऱ्या पावसाच्या आपत्तीमुळे बाधित झालेल्या चिंताग्रस्त बळीराजाला दिलासा देण्यास राज्य सरकार नेहमीच प्राधान्य देईल,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
Comments
Add Comment

Maharashtra Govt Signs 3 MoUs : महाराष्ट्रात उभारली जाणार कोरियन 'लर्निंग फॅक्टरी'; कौशल्य विकासासाठी राज्य सरकारचे ३ ऐतिहासिक करार

मुंबई : महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि तरुणांना जागतिक स्तरावर रोजगाराच्या उत्तम संधी मिळाव्यात आणि राज्याच्या

Maharashtra Finance Department New Rules : राज्याच्या तिजोरीवर ताण : सरकारी खर्चाला चाप; वित्त विभागाचे नवे कडक नियम लागू!

त्रुट्या असलेल्या प्रस्तावांना थेट केराची टोपली मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीवर सध्या पडणारा ताण

NEET Paper Leak Case : नीट पेपर फुटीचे लातूर पॅटर्न; लातूरमधून डॉ. मनोज शिरूरे यांना अटक

लातूर : देशभरात खळबळ उडवणाऱ्या नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणात सीबीआयने लातूरमध्ये आणखी एक मोठी कारवाई केली आहे.

Akola City Hospital Fire : अकोल्यातील सिटी हॉस्पिटलमध्ये आग; ICUमध्ये धूर तर बाहेर नातेवाईकांची गर्दी, मोठी दुर्घटना टळली

अकोला : अकोल्यातील रामदासपेठ परिसरात आज म्हणजेच गुरुवार २१ मे दुपारी मोठी खळबळ उडाली. शहरातील प्रसिद्ध ‘सिटी

Pune Leopard Attack : जुन्नरमध्ये पुन्हा बिबट्याचा थरार! बहिणीसोबत मॉर्निंग वॉकला गेली अन् दबा धरून बसलेल्या बिबट्याची चिमुरडीवर झडप

पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर (Pune Junner) तालुक्यात बिबट्या आणि मानवी वस्तीतील संघर्ष काही केल्या थांबण्याचे नाव घेत

NEET Paper Leak Case : पुण्यात ‘मोटेगावकर’ RCC क्लासवर महापालिकेची मोठी कारवाई; ३.२० कोटींचा कर थकीत, क्लास सील

पुणे : नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात चर्चेत आलेले प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांच्या पुण्यातील प्रसिद्ध