पहिल्याच पावसात ‘मंत्रालय’ सामसूम; ७० टक्के अधिकारी वर्गाची दांडी

  45

मुंबई : मुंबईत सोमवारी सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू असून संध्याकाळपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना संध्याकाळी चार वाजता कार्यालय सोडण्याची परवानगी देण्यात आली. या संबंधी आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे एरव्ही रात्रीपर्यंत सुरू असलेले मंत्रालयातील कामकाज सोमवारी संध्याकाळी चार वाजेपर्यंतच आटोपल्याचं चित्र दिसून आलं.


दरम्यान,मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतूक सेवा कोलमडलेली आहे. याचा परिणाम मंत्रालयातील कामकाजावर झालेला पाहायला मिळाला. अनेक अधिकारी, कर्मचारी कामावरती पोहोचू शकले नाही आणि जे पोहोचले त्यांना लवकर घरी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मंत्रालयातील रिकाम्या खुर्च्या, टेबल पाहायला मिळत आहे.


मान्सूनचे आगमन झाल्यानंतर त्याचा फटका राज्याची राजधानी मुंबईला बसला.


पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे एकीकडे येथील जीवन विस्कळीत झालेले असतानाच याचा फटका राज्याचा बोजा हाकणाऱ्या मंत्रालयालादेखील बसला. सकाळपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मंत्रालयात केवळ ३० टक्के कर्मचारीच उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे.


मुसळधार पावसामुळे मुंबईतील विविध भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. त्यामुळे ठिकठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. याचा परिणाम लोकल सेवेवरही झाला. त्यात हवामान खात्याने येत्या तीन ते चार तास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून मंत्रालयात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना दुपारी साडेतीन वाजताच घरी जाण्यास सांगण्यात आले. यामुळे इतरवेळी गजबजलेलं मंत्रालय सामसुम झाल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.

Comments
Add Comment

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता

नोकरीच्या शोधात आहात? तर ही बातमी आहे तुमच्यासाठी

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती, ८,७६७ पदांना मान्यता मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७

रवींद्र चव्हाण नवे भाजपा प्रदेशाध्यक्ष, बिनविरोध निवड

भाजपाची कोकणातील ताकद आणखी वाढणार मुंबई : भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी

RailOne ॲप लाँच, आता सर्व सुविधा एकाच जागी मिळणार, तिकीट बुकिंगपासून ते लाईव्ह ट्रेन ट्रॅकिंग

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी आता आनंदाची माहिती आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने एक नवीन

ज्या कंपन्यांमुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होत असेल त्यांच्यावर कारवाई करू

मुंबई : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमधून रसायन मिश्रीत पाणी नदीत सोडले जाते. यामुळे पिण्याचे पाणी

Devendra Fadanvis : "...नंतर गाशा गुंडाळून गायब होतात", CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन

'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही'- मुख्यमंत्री फडणवीस मुंबई : आज विधानसभेत टोरेस कंपनीच्या (Torres Company)