'धारावीचा विकास केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही'

कुंभारवाड्यासह सर्व कुटीर उद्योगांना पाच वर्षे असेल कर माफ


राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला धारावीकरांना शब्द


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : धारावी विकास प्रकल्प होणारच, धारावीकरांना घर दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असे निक्षून सांगतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धारावीतील इमारती या इतर गृहनिर्माण सोसायट्यांपेक्षा वेगळ्या असतील आणि धारावीचा विकास झाल्यानंतर येथील कुटीर उद्योगांना पुढील पाच वर्षे कोणत्याही प्रकारच्या कराची आकारणी केली जाणार नाही, त्यांचे सर्व टॅक्स माफ केले जाईल असा शब्दच राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने फडणवीस यांनी धारावीतील जनतेला दिला.


धारावीतील प्रभाग क्रमांक १८५चे उमेदवार रवी राजा यांच्यासह इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी धारावीत आले होते. यावेळी धारावीत त्यांचे जंगी स्वागत झाले. धारावीतील ९० फुटी रस्त्यावरील प्रचार फेरीमध्ये सहभागी होत मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना, या धारावीचा उल्लेख दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी करायचे. परंतु त्यांना आजवर जो विकास करता आलेला नाही तो विकास आम्ही करत आहोत,असे सांगितले. धारावीतील पात्र कुटुंबांना कुठेही बाहेर पाठवले जाणार नाही, तर त्यांचे पुनवर्सन धारावीतच केले जाणार असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुंभारवाडा तसेच चामडा बाजारांसह इतर जे कुटीर उद्योग करतात, त्यांचेही पुनवर्सन धारावीतच केले जाणार आहे. धारावीचा विकास केल्यानंतर कुंभारवाड्यासह इतर कुटीर उद्योगांना पुढील पाच वर्षे सर्व प्रकारचे कर माफ केला जाईल. त्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. एवढेच नाही, तर अपात्र कुटुंबांनाही आम्ही घरे देणार असून त्यासाठी हा विशेष प्रकल्प म्हणून घोषित केला आहे. अपात्र कुटुंबांना घर न दिल्यास ते कुठे तरी दुसरीकडे झोपडी बांधून राहतील. त्यांना पुन्हा झोपडीत न पाठवता त्यांनाही घरे दिली जाणार आहे,असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले


धारावी विकास प्रकल्प हा कोणत्याही विकासाला दिलेला नसून हा प्रकल्प सरकार आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा आहे. सरकार आणि एसआरए यात हिस्सेदार आहे. विकासकाला कोणताही स्कोपच ठेवलेला नाही. त्यामुळे धारावीतील जनतेला घर दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि या प्रकल्पाचे भूमिपुजन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल,असे आश्वास्त केले.



महापलिकेतील सत्ताधाऱ्यांनी केला ३ लाख कोटींचा भ्रष्टाचार


सत्ताधाऱ्यांना मागील २५ वर्षांत धारावीचा विकास करता आलेला नाही. आपल्या जीवावर ते महापालिकेत निवडून गेले. परंतु २५ वर्षांत विकास करण्याऐवजी भ्रष्टाचार आणि घोटाळे केले. तब्बल ३ लाख कोटींचा भ्रष्टाचार त्यांनी केला .रस्ते, नाले, कोविड, खिचडी, बॉडी बॅग, पीपीई किट, ऑक्सिजन प्लांट, कोविड सेंटर, पत्रा चाळ आदी घोटाळे करत त्यांनी भ्रष्टाचार केले. हे घोटाळे करतानाच त्यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वातही घोटाळा केला अशी टिका फडणवीस यांनी उबाठावर केली.


Comments
Add Comment

MahaCare : महाकेअरच्या माध्यमातून राज्यात जागतिक दर्जाच्या कर्करोग उपचार सुविधा; नागपुरात हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पाला मंजुरी

मुंबई : राज्यातील कर्करोग रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार आणि संशोधन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र

Devendra Fadnavis : आता शाळेत मिळणार 'ड्रग्ज'च्या दुष्परिणामांचे धडे

मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र व्यूहरचना आणि कृती योजनेबाबत

Central Railway : कर्जत-लोणावळा रेल्वे मार्ग पूर्णपणे पूर्ववत; 17 जुलैपासून अनेक एक्सप्रेस गाड्या पुन्हा मूळ मार्गावर

मुंबई : कर्जत-लोणावळा (Karjat lonavala) दरम्यानच्या मध्य रेल्वेच्या दक्षिण-पूर्व डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे

Transformation of railway stations : पंतप्रधान मोदी उद्या ७५ स्थानके राष्ट्राला करणार समर्पित; 'अमृत भारत' योजनेचा वेग वाढला

मुंबई: रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि स्थानकांचे रूप पालटावे, या उद्देशाने

Pratap Sarnaik : ओला, उबरसह सर्व कंपन्यांना आता राज्य सरकारचा परवाना बंधनकारक

महाराष्ट्राचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू; रिक्षा टॅक्सीप्रमाणे चालकांना बॅच बंधनकारक मुंबई : महाराष्ट्रातील

Devendra Fadnavis : महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; गव्हर्नन्स प्रोसेस रि-इंजिनियरिंग संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक मुंबई : राज्य