मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, सहा पुलांची होणार दुरुस्ती

मुंबई : दक्षिण मुंबईतील सहा उड्डाणपुलांची लवकरच दुरुस्ती केली जाणार आहे. या कामासाठी १५ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे.

मुंबई महापालिकेने २०२४-२५ मध्ये रस्ते, वाहतूक आणि पूल विभागासाठी एकूण १२ हजार ११० कोटी रुपये ९७ लाख रुपयांची तरतूद केली. यातील पूल कामासाठी ७ हजार ७१० कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला. यातील बहुतांश नवीन कामांसाठी निधी मंजूर केला गेला. २०२५-२६च्या अर्थसंकल्पीय अंदाजात पूल विभागासाठी ८ हजार २३८ कोटी ७३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन पुलांसह अस्तित्वात असलेल्या पुलांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. यामध्ये मुंबई शहर भागातील जुन्या उड्डाणपुलांचा समावेश आहे. यामध्ये लालबाग, हिंदमाता, जगन्नाथ शंकरशेट (दादर टीटी) उड्डाणपूल, कविवर्य केशवसूत उड्डाणपूल, शीव रुग्णालय उड्डाणपूल, जीटीबीनगर आरओबी यांचा समावेश आहे. या पुलांच्या दुरुस्तीसाठी १५ कोटी ८९ लाख ३२ हजार रुपये खर्च येणार आहे. पुलांची कामे पावसाळा वगळून १५ महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

पुलांवरील रस्त्यांची अवस्था वाईट आहे. यामुळे पुलांचे फेरपृष्ठीकरण केले जाणार आहे. पुलांच्या खांबांचीही दुरुस्ती केली जाणार आहे. पुलाशी संबंधित इतर आवश्यक ती दुरुस्तीची कामंही केली जातील.
Comments
Add Comment

Inspirational Story: दोन भावांची सोशल मीडियावर तुफान चर्चा, कमी वयात...

मुंबई: किशोर मंडल आणि त्याचा लहान भाऊ कृष मंडलची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. अतिशय कमी वयात या दोन्ही

तब्बल २ लाख ४४ हजार कोटींचे पायाभूत सुविधा प्रकल्प, राखीव निधी केवळ ३६ हजार कोटी

मुंबई: मुंबई महापालिच्यावतीने पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले असून आता या प्रकल्पांचा खर्च २ लाख ४४

क्रांतिसूर्य स्वा.सावरकर यांच्या सन्मानार्थ मुंबईतून किमान १० हजार स्वाक्षऱ्यांचे पत्र केंद्र व राज्य सरकारला पाठवणार

मुंबई: मुंबईमधील दादर पश्चिमेकडील बालमोह शाळेशेजारील सावरकर सदन हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

Satara: कराडमधील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात ५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल

सातारा: कराडमधील गाजलेल्या यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेतील ११२ कोटी १० लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात मुख्य आरोपी आणि

अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त

मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे "अ‍ॅबोड" निवासस्थान

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करा - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील