मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, सहा पुलांची होणार दुरुस्ती

मुंबई : दक्षिण मुंबईतील सहा उड्डाणपुलांची लवकरच दुरुस्ती केली जाणार आहे. या कामासाठी १५ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे.

मुंबई महापालिकेने २०२४-२५ मध्ये रस्ते, वाहतूक आणि पूल विभागासाठी एकूण १२ हजार ११० कोटी रुपये ९७ लाख रुपयांची तरतूद केली. यातील पूल कामासाठी ७ हजार ७१० कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला. यातील बहुतांश नवीन कामांसाठी निधी मंजूर केला गेला. २०२५-२६च्या अर्थसंकल्पीय अंदाजात पूल विभागासाठी ८ हजार २३८ कोटी ७३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन पुलांसह अस्तित्वात असलेल्या पुलांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. यामध्ये मुंबई शहर भागातील जुन्या उड्डाणपुलांचा समावेश आहे. यामध्ये लालबाग, हिंदमाता, जगन्नाथ शंकरशेट (दादर टीटी) उड्डाणपूल, कविवर्य केशवसूत उड्डाणपूल, शीव रुग्णालय उड्डाणपूल, जीटीबीनगर आरओबी यांचा समावेश आहे. या पुलांच्या दुरुस्तीसाठी १५ कोटी ८९ लाख ३२ हजार रुपये खर्च येणार आहे. पुलांची कामे पावसाळा वगळून १५ महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

पुलांवरील रस्त्यांची अवस्था वाईट आहे. यामुळे पुलांचे फेरपृष्ठीकरण केले जाणार आहे. पुलांच्या खांबांचीही दुरुस्ती केली जाणार आहे. पुलाशी संबंधित इतर आवश्यक ती दुरुस्तीची कामंही केली जातील.
Comments
Add Comment

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत