मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, सहा पुलांची होणार दुरुस्ती

  48

मुंबई : दक्षिण मुंबईतील सहा उड्डाणपुलांची लवकरच दुरुस्ती केली जाणार आहे. या कामासाठी १५ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे.

मुंबई महापालिकेने २०२४-२५ मध्ये रस्ते, वाहतूक आणि पूल विभागासाठी एकूण १२ हजार ११० कोटी रुपये ९७ लाख रुपयांची तरतूद केली. यातील पूल कामासाठी ७ हजार ७१० कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला. यातील बहुतांश नवीन कामांसाठी निधी मंजूर केला गेला. २०२५-२६च्या अर्थसंकल्पीय अंदाजात पूल विभागासाठी ८ हजार २३८ कोटी ७३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन पुलांसह अस्तित्वात असलेल्या पुलांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. यामध्ये मुंबई शहर भागातील जुन्या उड्डाणपुलांचा समावेश आहे. यामध्ये लालबाग, हिंदमाता, जगन्नाथ शंकरशेट (दादर टीटी) उड्डाणपूल, कविवर्य केशवसूत उड्डाणपूल, शीव रुग्णालय उड्डाणपूल, जीटीबीनगर आरओबी यांचा समावेश आहे. या पुलांच्या दुरुस्तीसाठी १५ कोटी ८९ लाख ३२ हजार रुपये खर्च येणार आहे. पुलांची कामे पावसाळा वगळून १५ महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

पुलांवरील रस्त्यांची अवस्था वाईट आहे. यामुळे पुलांचे फेरपृष्ठीकरण केले जाणार आहे. पुलांच्या खांबांचीही दुरुस्ती केली जाणार आहे. पुलाशी संबंधित इतर आवश्यक ती दुरुस्तीची कामंही केली जातील.
Comments
Add Comment

धक्कादायक! मुंबई IIT मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या, हॉस्टेलवरून उडी मारत संपवलं आयुष्य

मुंबई : मुंबईमधील पवईमधील IIT मुंबईमध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Mumbai Dadar Kabutar khana : कबुतरखाना हटवण्यासाठी मध्यरात्री पालिकेचं पथक दाखल… पण संतप्त जमावानं कारवाईला घातला आडवा! मध्यरात्री दादरमध्ये काय घडलं?

मुंबई : दादरमधील गाजलेला कबुतरखाना अखेर हटवण्याच्या तयारीला सुरुवात झाली, पण ही कारवाई नक्की कधी होणार, याचं

जुहू समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली

मुंबई : जुहूच्या समुद्रात पोहोण्यासाठी गेलेली दोन अल्पवयीन मुले बुडाली. ड्युटीवर असलेल्या जीवरक्षकांनी एकाला

जलप्रदूषण रोखण्यासाठी पालिकेचे एक पाऊल पुढे

मनपाकडून सहा प्रकारच्या रंगांचे वाटप मुंबई : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला अधिक बळकटी यावी यासाठी पालिकेकडून

चाकरमान्यांना कोकण रेल्वेत मिळणार उकडीचे मोदक !

मुंबई : गणेशोत्सव अवघ्या चार आठवड्यांवर आला असून यावर्षी २७ ऑगस्ट रोजी गणरायाची प्रतिष्ठापणा होणार आहे. कोकणात

Monsoon: ऑगस्टमध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

मुंबई: यंदाच्या वर्षी मान्सूनने अपेक्षेपेक्षा आधीच देशात आणि राज्यात प्रवेश करत दमदार सुरुवात केली होती. जून