देहू संस्थानला १ कोटींचा निधी मंजूर

पिंपरी : देहूगाव वारकरी संप्रदायाच्या आध्यात्मिक परंपरेचा गौरव करणारा संत तुकाराम महाराजांचा ३७५ वा वैकुंठगमन महोत्सव ओतूर येथे अत्यंत भक्तिभावाने साजरा होत आहे. या निमित्ताने ओतूर गावात जगद्गुरू तुकाराम महाराज, त्यांचे सद्गुरू आणि संत चोखोबा महाराज यांचा त्रिवेणी संगम साधल्याची भावना भाविकांत दाटून आली.


या महोत्सवाच्या निमित्ताने उपस्थित भाविकांच्या माध्यमातून अक्षय महाराज भोसले यांनी प्रकाशनासाठी देहू संस्थानच्या वतीने एक कोटींची मागणी केली असता महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत देहू संस्थानसाठी संत तुकाराम महाराज अभंग गाथेच्या प्रकाशनासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून हा निधी ४८ तासांत अधिकृत खात्यावर वर्ग केला जाणार आहे. संत श्रीतुकाराम महाराजांच्या गाथेचे ईबूक करून विश्वभर संत साहित्य नेणार अशी घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली.


यावेळी सामंत म्हणाले, "ज्यांनी 'तुकाराम तुकाराम' नामाचा उच्चार जरी केला तरी यमालाही थरकाप सुटतो, त्या संतांच्या गाथेचे रक्षण साक्षात भगवंताने केले. ही गाथा म्हणजे पाचवा वेद आहे. यापूर्वी ज्ञानेश्वरी छपाईसाठी देखील आपण एक कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला." माऊली महाराज कदम (छोटे माऊली) यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील विविध भागांतून लक्षावधी वारकरी सहभागी झाले आहेत. ही अभूतपूर्व उपस्थिती वैश्विक विक्रमात नोंदवली जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी संत नामदेव महाराज यांचे वंशज केशवमहाराज नामदास, देहू देवस्थान विश्वस्त जालिंदर महाराज मोरे उपस्थित होते.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये