शक्ती चक्रीवादळाचा कहर! कोकणात रेड अलर्टचा इशारा

रत्नागिरी : अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता असून, येत्या ३६ तासांत ‘शक्ती’ हे चक्रीवादळ कोकण किनारपट्टीकडे सरकणार आहे. हवामान विभागाने रायगड आणि रत्नागिरीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबईसह कोकणात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.


चक्रीवादळामुळे ताशी ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह संपूर्ण कोकणासाठी ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे.


२० मेपासून राज्यात अवकाळी पावसाचा जोर वाढला असून, तळकोकणात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. २७ मेपर्यंत पावसाचा इशारा कायम आहे.


आज पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांत पावसाची तीव्र शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

सरकारी निधी थांबल्यामुळे नासातही शटडाऊन

वॉशिंग्टन : अमेरिकेते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर उच्च टॅरिफ लावले असताना, त्यांच्या

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव देणार

मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येणार असून यासाठी पंतप्रधान

शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?

मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची