संगमनेरच्या वाहतुकीबाबत कडक पावले उचलणार : पोलीस अधीक्षक घार्गे

संगमनेर : संगमनेर शहरातील वाहतुक प्रश्नांबाबत माहिती घेणार असून याबाबत लवकरच कडक पावले उचलली जातील. तसेच येथील सिग्नल देखील पुढील महिन्यात सुरू करण्यात येईल अशी प्रतिक्रिया जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्रकार परिषदेत दिली.


अहिल्यानगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे सोमनाथ घार्गे यांनी स्वीकारल्यानंतर आज शनिवार दिनांक २४ मे २०२५ रोजी संगमनेर शहर पोलीस ठाण्याला भेट दिली.यावेळी श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे, संगमनेर विभागाचे पोलिस उप अधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख, संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे उपस्थित होते.यावेळी पत्रकारांशी पुढे बोलताना जिल्हा पोलिस अधीक्षक घार्गे म्हणाले की, संगमनेर येथील वाहतुकीचा प्रश्न गंभीर असल्याचे समजले असून याबाबत मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या सोबत चर्चा झाली आहे.शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख व मुख्याधिकारी रामदास कोकरे यांची एक टीम याबाबत सर्वे करणार आहे.त्यानंतर याबाबत त्वरित निर्णय घेण्यात येईल.


पुढील महिन्यात दिनांक १५ जून २०२५ पर्यंत संगमनेर शहरातील दोन ते तीन चांगले चौक फायनल करून याठिकाणी असलेले ट्रॅफिक सिग्नल सुरू करण्यात येणार आहेत. त्याच बरोबर संगमनेर शहरातील बंद असलेले सीसीटिव्ही कॅमेरे सुरू करण्यात येतील. तसेच जिल्ह्यातील ज्या ज्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बंद आहेत ते सर्व सुरू करण्यात येतील, जेणेकरून पोलिसांना देखील त्याची मदत होईल. तसेच संगमनेर शहर पोलिस ठाण्यात जरी पोलिसांचे संख्या बळ कमी असेल तरी जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचारी संख्या बळाची माहिती घेवून पोलिसांचे संख्या बळ कसे वाढवता येईल याबाबत प्रयत्न करणार आहे. तर जिल्ह्यातील गुन्हेगारी व अवैध धंदे याबाबत प्रत्येक तालुक्यात कडक पावले उचलली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक

Sanjay Shirsat : "तुमचा डबा रुळावरून घसरलाय, आता काठावर बसा"; मंत्री शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना टोला

छत्रपती संभाजीनगर : "उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाचा जीव केवळ मुंबईत अडकलेला आहे. नगरपालिका निवडणुकीत