पाच वर्षांपासून बंद असलेली शिर्डी-पंढरपूर रेल्वे पुन्हा सुरू करा : वारकऱ्यांची मागणी

कोपरगाव : आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या साईबाबांची शिर्डी आणि वारकऱ्यांचे आराध्य दैवत पंढरीचा पांडुरंग विठोबा या दोन श्रद्धा स्थानांना जोडणारी शिर्डी मुंबई पंढरपूर अशी जलद गती पॅसेंजर रेल्वे गाडी पाच वर्षापूर्वी सुरू होती, मात्र ती आता शिर्डी मुंबई पर्यंतच चालवली जाते त्यामुळे वारकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले असून त्यांनी ही रेल्वे सेवा शिर्डी ते पंढरपूर पर्यंत न्यावी अशी मागणी रेल्वे प्रवासी, वारकऱ्यांनी संबंधित रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.


अवघ्या ११० रुपयात शिर्डी ते पंढरपूर असा प्रवास वारकऱ्यांचा होत होता, मात्र पाच वर्षापासून ही रेल्वे सेवा खंडित करण्यात आली आहे, सदर शिर्डी पंढरपूर ही रेल्वे सकाळी पाच वाजता हसायची साडेबारापर्यंत पंढरपूरला पोहोचायची, मात्र ती आता बंद आहे त्यामुळे अनेक वारकऱ्यांसह भाविकांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. पंढरीचा पांडुरंग अनेक वारकऱ्यांचे श्रद्धास्थान आहे, तर पंढरपुरातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान साईबाबांची शिर्डी आहे. या दोन धार्मिक स्थळावरील भाविकांसह प्रवाशांना ही रेल्वे सेवा अत्यंत सुलभ होती पण ती सध्या शिर्डी ते मुंबई पर्यंत चालविली जाते, त्यामुळे ज्या भाविकांना पंढरपूर आणि शिर्डीला ये जा करायची असते ते या सेवेपासून गेल्या पाच वर्षापासून वंचित आहेत.


आषाढी एकादशी काही दिवसावर येऊन ठेपली आहे. शिर्डी मुंबई पंढरपूर अशी सेवा सुरू झाली तर वारकऱ्यांसह भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. वयोवृद्ध वारकऱ्यांसह भाविकांना रेल्वेने प्रवास करणे सोयीचे वाटते त्यासाठी ते एस.टी ऐवजी रेल्वे सेवेला प्राधान्य देतात, तेव्हा रेल्वे विभागाने शिर्डी मुंबई जलद गती पॅसेंजर सेवा थेट पंढरपूर पर्यंत सुरू करण्यात यावीअशी मागणी केली आहे.

Comments
Add Comment

शिवजन्मभूमीचा विकास करणे आमचे भाग्य

जुन्नरला देशातील क्रमांक-१ पर्यटन तालुका करणार एमआयडीसी, आयटी पार्क चांगले रस्ते तयार करून जुन्नरचा कायापालट

नाशिकच्या ६२२ ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासक राज’

नाशिक : यंदा मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. सार्वत्रिक

Nitesh Rane: आम्ही विरोधकांना दुर्बीण घेऊन शोधत...; नितेश राणेंचा विरोधकांवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत सिमितीच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच निवडणुकीच्या

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०