पाच वर्षांपासून बंद असलेली शिर्डी-पंढरपूर रेल्वे पुन्हा सुरू करा : वारकऱ्यांची मागणी

कोपरगाव : आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या साईबाबांची शिर्डी आणि वारकऱ्यांचे आराध्य दैवत पंढरीचा पांडुरंग विठोबा या दोन श्रद्धा स्थानांना जोडणारी शिर्डी मुंबई पंढरपूर अशी जलद गती पॅसेंजर रेल्वे गाडी पाच वर्षापूर्वी सुरू होती, मात्र ती आता शिर्डी मुंबई पर्यंतच चालवली जाते त्यामुळे वारकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले असून त्यांनी ही रेल्वे सेवा शिर्डी ते पंढरपूर पर्यंत न्यावी अशी मागणी रेल्वे प्रवासी, वारकऱ्यांनी संबंधित रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.


अवघ्या ११० रुपयात शिर्डी ते पंढरपूर असा प्रवास वारकऱ्यांचा होत होता, मात्र पाच वर्षापासून ही रेल्वे सेवा खंडित करण्यात आली आहे, सदर शिर्डी पंढरपूर ही रेल्वे सकाळी पाच वाजता हसायची साडेबारापर्यंत पंढरपूरला पोहोचायची, मात्र ती आता बंद आहे त्यामुळे अनेक वारकऱ्यांसह भाविकांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. पंढरीचा पांडुरंग अनेक वारकऱ्यांचे श्रद्धास्थान आहे, तर पंढरपुरातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान साईबाबांची शिर्डी आहे. या दोन धार्मिक स्थळावरील भाविकांसह प्रवाशांना ही रेल्वे सेवा अत्यंत सुलभ होती पण ती सध्या शिर्डी ते मुंबई पर्यंत चालविली जाते, त्यामुळे ज्या भाविकांना पंढरपूर आणि शिर्डीला ये जा करायची असते ते या सेवेपासून गेल्या पाच वर्षापासून वंचित आहेत.


आषाढी एकादशी काही दिवसावर येऊन ठेपली आहे. शिर्डी मुंबई पंढरपूर अशी सेवा सुरू झाली तर वारकऱ्यांसह भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. वयोवृद्ध वारकऱ्यांसह भाविकांना रेल्वेने प्रवास करणे सोयीचे वाटते त्यासाठी ते एस.टी ऐवजी रेल्वे सेवेला प्राधान्य देतात, तेव्हा रेल्वे विभागाने शिर्डी मुंबई जलद गती पॅसेंजर सेवा थेट पंढरपूर पर्यंत सुरू करण्यात यावीअशी मागणी केली आहे.

Comments
Add Comment

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी