मान्सून महाराष्ट्रात दाखल! भारतीय हवामान विभागाची अधिकृत घोषणा

  77

मुंबई : गेल्या आठवडाभरापासून राज्यात विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मे महिन्याच्या उन्हाळ्याच्या झळा त्यामुळे कमी झाल्या असल्या तरीही हा पूर्वमोसमी पाऊस आहे की मान्सून अशी शंका शेतकरी वर्गामध्ये होती. पूर्वमोसमी पावसानंतर मान्सूनचे आगमन लांबणार का? असा प्रश्न उपस्थित होत असताना आज भारतीय हवामान विभागाने आजपासून महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे.


यावर्षी मान्सून अपेक्षेपेक्षा तब्बल १२ दिवस आधी राज्यात पोहोचला आहे. मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाल्याने शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला असून, आनंदाचे वातावरण आहे. दरवर्षी साधारणतः ७ जूनच्या सुमारास महाराष्ट्रात मान्सून दाखल होत असतो. शनिवारी केरळात पोहोचलेल्या मान्सूनला, महाराष्ट्रात आगमनासाठी एक ते दोन दिवस लागतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र मात्र यंदा हवामानातील पोषक स्थितीमुळे अवघ्या काही तासांतच मान्सून आज महाराष्ट्रात दाखल झाला.



यंदाच्या वर्षी राज्यात आणि देशभरात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, यंदा देशात मान्सून १०७ टक्क्यांपर्यंत पाऊस पडू शकतो. त्यामुळे शेतक-यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. राज्यातही समाधानकारक आणि भरघोस पावसाची शक्यता असल्याने कृषी क्षेत्राला मोठा दिलासा मिळू शकतो. १ जून ते ३० सप्टेंबरदरम्यानचा पाऊस मान्सूनचा म्हणून नोंदवला जातो.


केरळ हे मान्सूनचे भारतातील प्रवेशद्वार मानले जाते. केरळात प्रवेश केल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून देशभरात आगेकूच करतो. नैऋत्य मान्सून साधारणपणे १ जून रोजी केरळमध्ये दाखल होतो आणि आगेकूच करत ८ जुलै रोजी संपूर्ण देश व्यापतो, तर १७ सप्टेंबरच्या सुमारास तो वायव्य हिंदुस्थानातून माघारीचा प्रवास सुरू करतो आणि १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्णपणे माघार घेतो, पण दरवर्षी १ जून या तारखेला केरळमध्ये दाखल होणारा पाऊस यंदा आठवडाभर आधीच दाखल झाला आहे. याआधी २००९ आणि २००१ मध्ये मान्सून २३ मे रोजीच दाखल झाला होता. गेल्या वर्षी २०२४मध्ये मान्सून ३० मे रोजी केरळमध्ये धडकला होता. १९१८ मध्ये सर्वात लवकर म्हणजेच ११ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता. २५ मे रोजी मान्सून दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सर्वात आधी १९५६ साली २९ मे रोजी लवकर मान्सून दाखल झाला. यानंतर ३१ मे १९९० रोजी लवकर मान्सून दाखल झाला.

Comments
Add Comment

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७ पदांचा आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता. या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात तीन नवीन सदस्यांची नियुक्ती

राजीव निवतकर व महेंद्र वारभुवन यांचा शपथविधी मुंबई : राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर

Eknath Shinde: उत्तराखंडमध्ये अडकलेल्या मराठी बांधवांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावले 

मराठी पर्यटकांशी फोनवरून संवाद साधत, त्यांना शक्य ती सारी मदत पोहचवण्याची ग्वाही मुंबई: उत्तराखंडमध्ये

Maharashtra Monsoon Session 2025: इंद्रायणी पुलाचा मुद्दा विधानसभेत, पूलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटबद्दल झाली चर्चा

मुंबई: राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सोमवारी ३० जूनपासून सुरू झाले असून, आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा

म्हाडा छत्रपती संभाजीनगर, नाशिक मंडळातर्फे १४१८ निवासी सदनिका व भूखंडांसाठी सोडत

सदनिका विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीसह अर्ज भरणा प्रक्रिया सुरू मुंबई : म्हाडाचा विभागीय घटक छत्रपती संभाजीनगर व

Devendra Fadanvis : कोंचिग क्लासमधील लैंगिक छळाप्रकरणी SIT स्थापन करणार; नराधमांना कठोर शिक्षा देणार : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : बीडमध्ये खासगी कोचिंग क्लासेसमध्ये 'नीट' ची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक