मान्सून महाराष्ट्रात दाखल! भारतीय हवामान विभागाची अधिकृत घोषणा

  89

मुंबई : गेल्या आठवडाभरापासून राज्यात विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मे महिन्याच्या उन्हाळ्याच्या झळा त्यामुळे कमी झाल्या असल्या तरीही हा पूर्वमोसमी पाऊस आहे की मान्सून अशी शंका शेतकरी वर्गामध्ये होती. पूर्वमोसमी पावसानंतर मान्सूनचे आगमन लांबणार का? असा प्रश्न उपस्थित होत असताना आज भारतीय हवामान विभागाने आजपासून महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे.

यावर्षी मान्सून अपेक्षेपेक्षा तब्बल १२ दिवस आधी राज्यात पोहोचला आहे. मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाल्याने शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला असून, आनंदाचे वातावरण आहे. दरवर्षी साधारणतः ७ जूनच्या सुमारास महाराष्ट्रात मान्सून दाखल होत असतो. शनिवारी केरळात पोहोचलेल्या मान्सूनला, महाराष्ट्रात आगमनासाठी एक ते दोन दिवस लागतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र मात्र यंदा हवामानातील पोषक स्थितीमुळे अवघ्या काही तासांतच मान्सून आज महाराष्ट्रात दाखल झाला.

यंदाच्या वर्षी राज्यात आणि देशभरात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, यंदा देशात मान्सून १०७ टक्क्यांपर्यंत पाऊस पडू शकतो. त्यामुळे शेतक-यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. राज्यातही समाधानकारक आणि भरघोस पावसाची शक्यता असल्याने कृषी क्षेत्राला मोठा दिलासा मिळू शकतो. १ जून ते ३० सप्टेंबरदरम्यानचा पाऊस मान्सूनचा म्हणून नोंदवला जातो.

केरळ हे मान्सूनचे भारतातील प्रवेशद्वार मानले जाते. केरळात प्रवेश केल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून देशभरात आगेकूच करतो. नैऋत्य मान्सून साधारणपणे १ जून रोजी केरळमध्ये दाखल होतो आणि आगेकूच करत ८ जुलै रोजी संपूर्ण देश व्यापतो, तर १७ सप्टेंबरच्या सुमारास तो वायव्य हिंदुस्थानातून माघारीचा प्रवास सुरू करतो आणि १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्णपणे माघार घेतो, पण दरवर्षी १ जून या तारखेला केरळमध्ये दाखल होणारा पाऊस यंदा आठवडाभर आधीच दाखल झाला आहे. याआधी २००९ आणि २००१ मध्ये मान्सून २३ मे रोजीच दाखल झाला होता. गेल्या वर्षी २०२४मध्ये मान्सून ३० मे रोजी केरळमध्ये धडकला होता. १९१८ मध्ये सर्वात लवकर म्हणजेच ११ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता. २५ मे रोजी मान्सून दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सर्वात आधी १९५६ साली २९ मे रोजी लवकर मान्सून दाखल झाला. यानंतर ३१ मे १९९० रोजी लवकर मान्सून दाखल झाला.

Comments
Add Comment

Rain update: महाराष्ट्रासाठी पुढील २४ तास अतिमुसळधार, रायगडमध्ये अतिवृष्टीची शक्यता, गरज असेल तरच घराबाहेर पडा

पुणे: गेली अनेक दिवस सुट्टीवर गेलेला पाऊस महाराष्ट्रात पुन्हा दाखल झाला आहे.  पुढील २४ तासांमध्ये महाराष्ट्रात

Independence Day 2025: विकासाच्या वाटचालीत मोदी सरकारला साथ द्या: मंत्री मंगलप्रभात लोढा

गोंदिया:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाने मागील ११ वर्षांत जलद गतीने प्रगती साधली असून भारत

खडसेंच्या जावयावर आणखीन एक गुन्हा दाखल, महिलेचे चोरून फोटो अन् व्हिडिओ काढले...

प्रांजल खेवलकरच्या अडचणीत वाढ पुणे: एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचा पती प्रांजल खेवलकरच्या अडचणीत

Manoj Jarange Patil : मुंबई दौऱ्याआधीच जरांगेंची तब्येत बिघडली! नेमकं काय घडलं?

डॉक्टरांनी दिला विश्रांती घेण्याचा सल्ला नांदेड: मराठा आरक्षणासाठी गेले अनेक वर्ष संघर्ष करत असलेले मनोज

स्वातंत्र्यदिनी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दिग्गजांचा अजित पवारांनी केला सत्कार

बीड : भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील विविध विभागातील अधिकारी व

आंबा घाटात दरड कोसळली ! वाहतूक ठप्प

रत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर आंबा घाटात दरड कोसळण्याची गंभीर घटना घडली आहे. साखरपा मुर्शी चेक