पाच विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक, निवडणूक आयोगाची घोषणा

नवी दिल्ली : पाच विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रक काढून ही घोषणा केली आहे. गुजरातमधील दोन तर केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी एका विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे.

गुजरातमध्ये करसनभाई पंजाभाई सोलंकी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कडी (एससी) तसेच भायनी भूपेंद्रभाई गंधूभाई यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विसावदर येथे पोटनिवडणूक होणार आहे. केरळमध्ये पीव्ही अन्वर यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या निलांबूरमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. गुरप्रीत गोगी बस्सी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंजाबच्या लुधियाना पश्चिम येथे पोटनिवडणूक होणार आहे. नसिरुद्दीन अहमद यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पश्चिम बंगालमधील कालीगंज येथे पोटनिवडणूक होणार आहे.

पोटनिवडणुकीची अधिसूचना २६ मे रोजी जारी केली जाईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २ जून आहे आणि अर्जांची छाननी ३ जून रोजी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ५ जून आहे. मतदान १९ जून रोजी होईल. मतमोजणी २३ जून रोजी होईल.

Comments
Add Comment

हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवाद्यांच्या कारवायांना लागली घरघर, एकाचवेळी ३७ नक्षलवादी आले शरण

नवी दिल्ली : शरण या आणि नक्षलवाद्यांच्या भावी योजनांची तसेच तयारीची माहिती देऊन सरकारी योजनांचा लाभ घ्या अथवा

‘तिरुपती’च्या २० कोटी लाडूंसाठी वापरले ‘भेसळयुक्त’ तूप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): तिरुपती मंदिरात भेसळयुक्त तूप वापरून अंदाजे २० कोटी लाडू तयार करण्यात आले होते.

दिल्ली क्राईम ब्रँचची धडक कारवाई, आयएसआयशी संबंधित ४ आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करांना अटक

नवी दिल्ली: दिल्ली गुन्हे शाखेने पाकिस्तानी आयएसआयशी जोडलेल्या आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करीच्या टोळीतील चार

कोट्यावधींच्या सायबर फसवणुकीचा दिल्ली पोलिसांकडून पर्दाफाश; गुन्हेगारीचे मुळ उद्ध्वस्त करणाच्या हेतूने कारवाई

मुंबई : दिल्ली पोलिसांनी गेल्या ४८ तासांत मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्हेगारीविरोधात मोहीम राबवत शेकडो फसवणूक

भारतात नवीन कामगार कायदे लागू, आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल! काय होणार लाभ, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: केंद्रीय श्रममंत्री मनसूख मांडवीय यांनी देशात चार नवीन कामगार कायदे लागू करत असल्याची मोठी घोषणा

नितीश कुमार यांनी २० वर्षांनी गृहमंत्री पद सोडले

१८ मंत्र्यांची खाती जाहीर पाटणा : बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी दुसऱ्या दिवशी