ठाणे पालिका क्षेत्रात कोरोनाचे २० रुग्ण

  52

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या चार दिवसांत कोरोनाचे २० रुग्ण आढळले असून त्यापैकी एका २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. तो गंभीर स्वरूपाच्या मधुमेहामुळे रुग्णालयात गुरुवारी दाखल होता. शुक्रवारी त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आणि २४ तारखेला त्याचे निधन झाल्याची माहिती छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयचे अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी दिली आहे. दुसरीकडे ठाण्यात नवीन ९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. कोरोना रुग्ण आढळण्यास सुरुवात झाल्यानंतर शुक्रवारपर्यंत महापालिका क्षेत्रात कोरोनाचे १० रुग्ण आढळले. त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली असून त्या सर्व रुग्णांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी चेतना नितील यांनी दिली. त्याचबरोबर, सर्व आरोग्य केंद्रात पुरेसा औषध साठा उपलब्ध असून तेथे टेस्टिंग कीटही आहेत. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे कोरोनाच्या रुग्णांसाठी १९ खाटांचा स्वतंत्र कक्ष तयार करण्यात असून, आरटीपीसीआरची सुविधाही रुग्णालयात उपलब्ध असल्याचेही रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी सांगितले. १७ रुग्णांची प्रकृती स्थिर असून, ते गृह विलगीकरणात असून एकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Comments
Add Comment

पोलीस अधिकारी संभाजी देशमुख यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदक

कल्याण : पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय कामगीरीमुळे राज्य गुप्त वार्ता विभागातील पोलीस अधिकारी संभाजी देशमुख

ठाणेकरांनो, पाण्याचा जपून वापरा करा

मंगळवारी ८ तास पाणीपुरवठा बंद डोंबिवली  : केडीएमसीच्या कल्याण (पूर्व) परिसरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील

श्रीकृष्णनाथ पांचाळ ठाण्याचे जिल्हाधिकारी

मुंबई : जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची महाराष्ट्र सरकारने बदली केली असून ठाण्याचे

मध्य रेल्वेची ऐन सकाळी ठप्प झालेली वाहतूक सुरळीत, रेल्वे रुळाला तडे गेल्याने नोकरदारांचे झाले हाल

कर्जत: मध्य रेल्वेची लोकल वाहतूक आज सकाळी काही तासांसाठी विस्कळीत झालेली पाहायला मिळाली. पण रेल्वे प्रशासनाच्या

सॅनिटरी नॅपकिन बनवणारी मशीन भंगारमध्ये

सहा वर्षे धूळ खात पडून भाईंदर : महिलांच्या मासिक पाळी काळात स्वच्छता वाढवण्यासाठी तसेच महिलांना रोजगार उपलब्ध

दूषित पाण्यामुळे डोंबिवलीकरांचे आरोग्य धोक्यात

ठाणे  : डोंबिवली पश्चिमेतील गृहनिर्माण सोसायट्यांना दूषित व पिवळसर रंगाचा पाणीपुरवठा होत असून, यामुळे नागरिक