स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजप कार्यकर्त्यांनी तयार राहा - फडणवीस

सांगली : राज्यात कार्यकाळ संपुष्टात येऊनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रतिक्षित आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर आता सर्वच राजकीय पक्षांना त्याचे वेध लागले आहेत. त्या अनुषंगाने तयारी देखील सुरू आहे. दरम्यान आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मनपा आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी तयार राहा, असे आदेश दिले आहेत. तसेच जिथे निवडणुका जिंकाल तिथे मोठ्या प्रमाणावर निधी देऊ, असे आश्वासन देखील दिले आहे. ते सांगलीत भाजप कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

स्थानिक स्वराज्य संस्था सरकारच्या ताब्यात असल्या की काम चांगलं होतं, नाहीतर विकासाला खीळ बसते. त्यामुळे कार्यकर्त्यांना कामाला लागा, सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये निवडणुका जाहीर होतील. जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुका एकत्र होतील किंवा 5-6 दिवसांचं अंतर असेल. त्यानंतर 15 दिवसांनी महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाने 6 मे रोजी राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात महत्वाचे निर्देश दिले होते. चार महिन्यांच्या आत रखडलेल्या निवडणुका घ्या. न्यायालयाच्या या आदेशानंतरच आता राज्य निवडणूक आयोग या निवडणुका घेण्यासाठी सक्रिय झाला आहे.
Comments
Add Comment

Pune Police Bharti : पुणेकरांसाठी मोठी बातमी! अखेर पोलीस भरतीचे बिगुल वाजले; 'या' तारखेपासून चाचणीला सुरुवात

पुणे : पुणे शहराच्या सीमांचा विस्तार आणि झपाट्याने वाढणारी लोकसंख्या पाहता, पुणे पोलीस दलावर पडणारा ताण कमी

Jayant Patil : अजित दादांची 'ती' इच्छा अधुरीच...राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत जयंत पाटलांचा मोठा खुलासा!

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी पोकळी

Amravati News : आयआरबीची मलमपट्टी, प्रवाशांच्या जिवाशी खेळ! नांदगाव पेठमध्ये भरवस्तीत उड्डाण पुलाचे काँक्रिट कोसळले

अमरावती : राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव पेठ येथे आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या (IRB) निकृष्ट कामाचा नमुना

Sunetra Pawar : मी सुनेत्रा अजित पवार...उद्या राज्याला मिळणार पहिली महिला उपमुख्यमंत्री ?

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील आकस्मिक निधनामुळे राज्याच्या मंत्रिमंडळात मोठी

Sunil Tatkare : सुनेत्रा पवार आणि मुलांशी चर्चा करूनच उपमुख्यमंत्रिपदावर होणार शिक्कामोर्तब; सुनील तटकरेंनी दिले स्पष्ट संकेत

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये

राज्यातील 'आयटीआय' होणार 'स्किल डेव्हलमपेंट हब'

मंत्री मंगल प्रभात लोढा; पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे जिल्ह्याचा समावेश मुंबई : पंतप्रधान