Naxalites Surrender: छत्तीसगडमध्ये 33 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, सरकार करणार पुनर्वसन

बिजापूर: छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात नक्षलविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. येथे ३३ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे, त्यापैकी २४ जणांवर तब्बल ९० लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. आत्मसमर्पणाचे कारण माओवादी विचारसरणीबद्दलचा भ्रमनिरास, आदिवासींवरील अत्याचार आणि सरकारच्या पुनर्वसन योजनांचा प्रभाव सांगितला जात आहे. गेल्यावर्षी २०२४ मध्ये, एकट्या बस्तरमधून तब्बल ७९२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. या आत्मसमर्पित नक्षलवाद्यांनी आता हिंसाचार सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात परतण्याचा निर्णय घेतला आहे.


या माओवाद्यांमध्ये पीएलजीए कंपनी क्रमांक 2 चे उपकमांडर, माड डिव्हिजन कंपनी क्रमांक ७ पीपीसीएम, एसीएम/पीपीसीएम, एलओएस कमांडर, सीएनएम अध्यक्ष, केएमएस अध्यक्ष आणि केकेबीएन डिव्हिजन पक्ष सदस्य असे अनेक उच्चपदस्थ नेते समाविष्ट आहेत. हे सर्वजण बऱ्याच काळापासून विजापूर, सुकमा आणि आसपासच्या भागात सक्रिय होते आणि अनेक नक्षलवादी घटनांमध्ये सहभागी होते.



आत्मसमर्पण आणि पुनर्वसन धोरणांचा फायदा


राज्य सरकारच्या आत्मसमर्पण आणि पुनर्वसन धोरणामुळे प्रभावित होऊन या नक्षलवाद्यांनी हे पाऊल उचलल्याचे विजापूरचे पोलिस अधीक्षक डॉ. जितेंद्र कुमार यादव यांनी सांगितले. रस्ते बांधकाम, वीज-पाणी सुविधा, शिक्षण आणि आरोग्य सेवा यासारख्या विकासकामांमुळे नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात परत येण्याची प्रेरणा मिळाल्याचे यादव यांनी सांगितले. आत्मसमर्पण कार्यक्रमाला केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (CRPF) उपमहानिरीक्षक राकेश कुमार, विजापूरचे एसपी डॉ. जितेंद्र कुमार यादव, कोब्रा आणि सीआरपीएफ बटालियनचे कमांडंट, एएसपी ऑपरेशन, जिल्हा राखीव गार्ड (DRG), बस्तर फायटर आणि एसटीएफ अधिकारी उपस्थित होते. या ऑपरेशनमध्ये डीआरजी, बस्तर फायटर, एसटीएफ, सीआरपीएफ आणि कोब्रा दलांनी विशेष योगदान दिले आहे.



माओवाद्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची प्रोत्साहन रक्कम


सरकारच्या आत्मसमर्पण धोरणाअंतर्गत, सर्व 24 माओवाद्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची प्रोत्साहन रक्कम देण्यात आली आहे. याशिवाय, त्यांना पुनर्वसन, रोजगार आणि शिक्षणाच्या सुविधा देखील दिल्या जातील जेणेकरून ते सामान्य जीवन सुरू करू शकतील.


यावर्षी 1 जानेवारीपासून विजापूर जिल्ह्यात एकूण 227 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, 237 माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे आणि 119 माओवादी मारले गेले आहेत. या आकडेवारीवरून असे दिसून येते की सरकारचे धोरण आणि सुरक्षा दलांची रणनीती नक्षलवादाच्या विरोधात प्रभावी ठरत आहे. एसपी डॉ. जितेंद्र कुमार यादव यांनी इतर माओवाद्यांनाही आत्मसमर्पण करून सरकारच्या पुनर्वसन धोरणाचा फायदा घेण्याचे आणि हिंसाचार सोडून समाजात शांततेत राहण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशात 100 वर्षे जुने घर कोसळले; एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यात मध्यरात्री घडलेल्या भीषण दुर्घटनेत 100 वर्षे जुने घर कोसळून

Devendra Fadnavis Gen Z : तरुणांची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीस सरकारचा 'मास्टरप्लॅन'; 'जेन Z' साठी ९ मोठे निर्णय ठरणार गेमचेंजर!

मुंबई : राज्यातील तरुण पिढी, विशेषतः 'जेन Z' (Gen Z) म्हणजेच नव्या युगातील युवक-युवतींमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता

Indian Space Station : 2035 पर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक; गगनयान मोहिमेची तयारी अंतिम टप्प्यात

मुंबई : भारताच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमांना वेग आला असून, 2035 पर्यंत देशाचे स्वतःचे अंतराळ स्थानक (भारतीय

India Weather : मुसळधार पाऊस थांबायचं नाव घेईना! देशातील 17 राज्यांना हाय अलर्टचा इशारा; आसाममधील पूरस्थिती गंभीर

मुंबई : देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर कायम असून काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः

Central government plan on LPG LNG : आता हे काय नवीन ? एलपीजी अन् एलएनजीच्या आपत्कालीन साठ्यासाठी ग्राहकांवर कर ? केंद्र सरकारचा मोठा प्लॅन

भारतातील ऊर्जा संकट टाळण्यासाठी आणि इंधनाचा आपत्कालीन साठा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार ४२ अब्ज डॉलर

Central Government Operation Trishul : मोदी सरकारची मोठी कारवाई! 7 वर्षांत 36 देशांतून 274 फरार गुन्हेगार भारतात परत; 'ऑपरेशन त्रिशूल'ने वाढवली तपास यंत्रणांची ताकद

नवी दिल्ली : देशातून पळून गेलेल्या फरार गुन्हेगारांविरोधात केंद्र सरकारने मोठी मोहीम हाती घेतली असून, 2019 ते 2026 या