PM Modi : पंतप्रधान मोदींची कर्तव्यपूर्ती अन् जनतेची स्वप्नपूर्ती!

अमृत भारत स्थानकं जनतेच्या सेवेत


कितीही टीका झाली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकासाचा कर्तव्यपथ सोडलेला नाही. लोकाभिमुख विकासकामांवर त्यांनी मोठा भर दिलाय. विकसित भारत या स्वप्नपूर्तीच्या दिशेनं पंतप्रधान मोदींनी एक एक पाऊल पुढं टाकलंय. देशातील अमृत भारत स्थानकांचं लोकार्पण करतानाच त्यांनी भारताचं उद्दिष्ट काय असेल यांचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

एकीकडे भारत - पाकिस्तान युद्धविरामावर चर्चा सुरू आहेत तर दुसरीकडे लोकाभिमुख विकासकामांचं लोकार्पण करण्यात येतंय. या सर्वांचं श्रेय जातयं ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना. अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत विकसित केलेल्या देशातील अनेक रेल्वे स्थानकांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्धाटन झालंय. बिकानेर - मुंबई एक्स्प्रेसला पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवला. इतकंच नव्हे तर जवळपास २६ हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण त्यांनी केलंय. पंतप्रधान मोदींनी जनतेला दिलेल्या आश्वासनांची वचनपूर्ती केलीय. यात रेल्वेसेवेचा विस्तार महत्त्वाचा होता. पंतप्रधान मोदींनी देशातील १८ राज्यं, केंद्रशासित प्रदेशातील ८६ जिल्ह्यांतील १०३ पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं उद्धाटन केलंय. या रेल्वे स्थानकांसाठी १,१०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झालाय. तर अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत १,३०० पेक्षा जास्त स्थानकांचा आधुनिक सेवा सुविधांसह पुनर्विकास केला जातोय.


रेल्वे स्थानकांच्या उभारणीत प्रादेशिक वास्तुकलेचं प्रतिबिंब दिसतंय.


आता पाहूयात अमृत रेल्वे स्थानकांची वैशिष्ट्ये


राजस्थानमध्ये देशनोक रेल्वेस्थानकावर करणी माता मंदिराची वास्तुकला प्रतिबिंबित आहे.
तेलंगणामध्ये बेगमपेट रेल्वेस्थानकावर काकतीय साम्राज्य वास्तुकला प्रतिबिंबित आहे.
बिहारमध्ये थावे रेल्वेस्थानकावर माता थावेवाली यांची वास्तुकला प्रतिबिंबित आहे.
गुजरातमध्ये डाकोर रेल्वेस्थानकावर रणछोडरायजी महाराज यांची वास्तुकला प्रतिबिंबित आहे.

या सर्व रेल्वे स्थानकांचा विकास करतानाच भारताचं व्हिजन काय आहे, हेही दिसून येतंय. सर्वसामान्यांसाठी सुविधा आणि प्रवासाचा समृद्ध अनुभव घेता येईल अशा प्रकारच्या शाश्वत पद्धतींचं अनोखं एकात्मतीकरण पंतप्रधान मोदींनी घडवून आणलंय.


१०० विद्युतीकरण झालेली रेल्वे स्थानकं कोणती आहेत ते पाहूया... 


सूरतगड-फलोदी, ३३६ किमी

फुलेरा-डेगाना, १०९ किमी

उदयपूर-हिम्मतनगर, २१० किमी

फलोदी-जैसलमेर, १५७ किमी

समदारी-बाडमेर, १२९ किमी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन भुयारी मार्ग, राष्ट्रीय महामार्गांचं रुंदीकरण, राजस्थानातील ७ रेल्वे प्रकल्पांचं लोकार्पण केलंय. तसंच त्यांनी सुमारे ४,८५० कोटी रुपयांहून अधिक रस्ते प्रकल्पांची पायाभरणी केलीय. पंतप्रधान मोदींच्या हस्ते विविध सौर्जऊर्जा आणि ऊर्जा प्रकल्पांची पायाभरणी, विविध आरोग्यसेवा, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा योजनांची पायाभरणी, लोकार्पण आणि उद्घाटन झालंय. मोदी हैं तो मुमकिन हैं असं म्हटलं जातं. दहशतवादाचा बीमोड करतानाच देशाच्या विकासाला चालना देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे विकासपुरुष म्हणून पाहिलं जातं, त्याला हिच कारणं आहेत.
Comments
Add Comment

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा

NEET UG 2026 Paper Leak : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण : सीबीआयची मोठी कारवाई, एनटीएच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिकेला पुण्यातून अटक

नवी दिल्ली : 'नीट-युजी' (NEET-UG) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची चक्रे

'पाकिस्तानने ठरवावे की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा ?'

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. या

PM Modi : 'द हेग'मध्ये जाणवला महाराष्ट्र, राजस्थान आणि यूपीचा उत्साह! पंतप्रधान मोदींकडून नेदरलँड्समधील अनिवासी भारतीयांचे विशेष कौतुक

हेग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी १६ मे रोजी नेदरलँड्समधील 'द हेग' (The Hague) शहरात अनिवासी भारतीयांच्या

Monsoon in Andaman 2026 : आला रे आला...अंदमान-निकोबारमध्ये पावसाची हजेरी, केरळ आणि कोकणात कधी धडकणार ?

संपूर्ण देशातील नागरिक आणि विशेषतः शेतकरी राजा ज्याची आतुरतेने वाट पाहत होता, तो मान्सून अखेर अंदमानच्या  (Andaman)

Fake News Alert! : अफवांवर विश्वास ठेवू नका! राज्यात 'कॅब' सेवा सुरूच राहणार; 'डीजीआयपीआर'ने सांगितले सत्य!

सध्या सोशल मीडियावर ओला (Ola), उबर (Uber) आणि रॅपिडो (Rapido) यांसारख्या लोकप्रिय कॅब सेवा महाराष्ट्रात कायमच्या बंद झाल्या