'आई मी कुरकुरे नाही चोरले', चिप्स चोरीच्या आरोपामुळे १३ वर्षीय मुलाची आत्महत्या

कोलकाता: पश्चिम बंगालच्या पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील पांशकुडाच्या गोसाईवाडी परिसरात हृदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे. १३ वर्षीय कृष्णेंदु दासने चोरीच्या खोट्या आरोपानंतर आत्महत्या केली. तो बकुलदा हायस्कूलमध्ये सातवीत शिकत होता. बुधवारी रात्री त्याने कीटकनाशक प्यायले आणि गुरूवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.


मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी स्थानिक दुकानदार शुभंकर दीक्षितने कृष्णेंदुवर तीन पॅकेट चिप्स चोरीचा आरोप केला होता. किशोरने स्पष्ट केले होते की ते पॅकेट्स त्याने रस्त्यावरून उचलले होते. त्याला वाटले की ही पाकिटे जमिनीवर पडली होती. यानंतर दुकानदाराने दुकानासमोर कान पकडून त्याला माफी मागण्यास लावले होते. यानंतर त्याच्या आईनेही सर्वांसमोर त्याला ओरडले होते.


कुटुंबाने आरोप केला आहे की एक सुसाईड नोट ताब्यात घेण्यात आली आहे. यात कृष्णेंदुने आत्महत्या करण्याआधी नोटबुकमध्ये लिहिले की, आई , मी कुरकुरे नाही चोरले. मला ते रस्त्यावर भेटले होते. मी चोरी नाही केली. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू प्रकरण दाखल करत तपास सुरू केला आहे. दुकानदार शुभांकर दीक्षित नागरिक स्वयंसेवकही आहे आणि घटनेनंतर फरार आहे.

Comments
Add Comment

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात

'Nanda Devi' Ship : तब्बल ४६,५०० मेट्रिक टनहुन अधिक एलपीजी घेऊन ‘नंदा देवी’ जहाज भारतात दाखल

‘शिवालिक’नंतर आणखी एक एलपीजी टँकर भारतात दाखल झाला आहे. ‘नंदा देवी’ हे जहाज आज म्हणजेच मंगळवार १७ मार्च रोजी

एनआयएची मोठी कारवाई, युक्रेनच्या सहा आणि अमेरिकेच्या एका नागरिकाला अटक

नवी दिल्ली : कोलकाता विमानतळ येथे अमेरिकन नागरिकाला तर लखनऊ विमानतळ आणि दिल्ली विमानतळ येथे प्रत्येकी तीन

West Bengal ED Raid : पश्चिम बंगालमध्ये ईडीअँक्शन मोडवर; एकूण १० ठिकाणी छापेमारी

- अवैध कॉल सेंटरद्वारे फसवणुकीचे प्रकरण पश्चिम बंगालमध्ये अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) सोमवारी (१६ मार्च) मोठी

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, भाजपची १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शुभेंदू अधिकारी