'आई मी कुरकुरे नाही चोरले', चिप्स चोरीच्या आरोपामुळे १३ वर्षीय मुलाची आत्महत्या

  49

कोलकाता: पश्चिम बंगालच्या पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील पांशकुडाच्या गोसाईवाडी परिसरात हृदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे. १३ वर्षीय कृष्णेंदु दासने चोरीच्या खोट्या आरोपानंतर आत्महत्या केली. तो बकुलदा हायस्कूलमध्ये सातवीत शिकत होता. बुधवारी रात्री त्याने कीटकनाशक प्यायले आणि गुरूवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.


मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी स्थानिक दुकानदार शुभंकर दीक्षितने कृष्णेंदुवर तीन पॅकेट चिप्स चोरीचा आरोप केला होता. किशोरने स्पष्ट केले होते की ते पॅकेट्स त्याने रस्त्यावरून उचलले होते. त्याला वाटले की ही पाकिटे जमिनीवर पडली होती. यानंतर दुकानदाराने दुकानासमोर कान पकडून त्याला माफी मागण्यास लावले होते. यानंतर त्याच्या आईनेही सर्वांसमोर त्याला ओरडले होते.


कुटुंबाने आरोप केला आहे की एक सुसाईड नोट ताब्यात घेण्यात आली आहे. यात कृष्णेंदुने आत्महत्या करण्याआधी नोटबुकमध्ये लिहिले की, आई , मी कुरकुरे नाही चोरले. मला ते रस्त्यावर भेटले होते. मी चोरी नाही केली. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू प्रकरण दाखल करत तपास सुरू केला आहे. दुकानदार शुभांकर दीक्षित नागरिक स्वयंसेवकही आहे आणि घटनेनंतर फरार आहे.

Comments
Add Comment

भारताच्या आजी - माजी खासदारांचा जर्मनीत विवाह

बर्लिन : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा आणि बिजू जनता दलचे माजी खासदार पिनाकी मिश्रा यांनी लग्न केले.

भारतात तयार होणार राफेल लढाऊ विमानाचे सुटे भाग

नवी दिल्ली : राफेल उत्पादक दसॉल्ट एव्हिएशनने भारत आणि इतर जागतिक बाजारपेठांसाठी लढाऊ विमानांचे सुटे भाग तयार

शर्मिष्ठा पनोलीला उच्च न्यायालयाने दिला जामीन

कोलकाता : सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर शर्मिष्ठा पनोलीला कोलकाता उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. तपासात

RCB Victory Parade : RCBच्या विजयोत्सवात ११ मृत्युमुखी, चूक कुणाची?

मुख्यमंत्री सिद्धरमय्या काय बरळले ? बंगळुरू : बंगळुरूमधलं आनंदाचं वातावरण काही क्षणातच शोकांतिकेत बदललं. रॉयल

बंगळुरूतील चेंगराचेंगरीत 'या' अकरा जणांचा मृत्यू

बंगळुरू : आयपीएल २०२५ जिंकलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या विजयानिमित्त बंगळुरूत कर्नाटक सरकारने विजयी

सिक्कीम भूस्खलन : भारतीय लष्कराने ११३ पर्यटकांचा वाचवला जीव

गंगटोक : सिक्कीममधील पूर्णपणे संपर्क तुटलेल्या लाचेन गावापर्यंत पोहचण्यासाठी भारतीय लष्कराने अत्यंत खराब