'आई मी कुरकुरे नाही चोरले', चिप्स चोरीच्या आरोपामुळे १३ वर्षीय मुलाची आत्महत्या

कोलकाता: पश्चिम बंगालच्या पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील पांशकुडाच्या गोसाईवाडी परिसरात हृदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे. १३ वर्षीय कृष्णेंदु दासने चोरीच्या खोट्या आरोपानंतर आत्महत्या केली. तो बकुलदा हायस्कूलमध्ये सातवीत शिकत होता. बुधवारी रात्री त्याने कीटकनाशक प्यायले आणि गुरूवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.


मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी स्थानिक दुकानदार शुभंकर दीक्षितने कृष्णेंदुवर तीन पॅकेट चिप्स चोरीचा आरोप केला होता. किशोरने स्पष्ट केले होते की ते पॅकेट्स त्याने रस्त्यावरून उचलले होते. त्याला वाटले की ही पाकिटे जमिनीवर पडली होती. यानंतर दुकानदाराने दुकानासमोर कान पकडून त्याला माफी मागण्यास लावले होते. यानंतर त्याच्या आईनेही सर्वांसमोर त्याला ओरडले होते.


कुटुंबाने आरोप केला आहे की एक सुसाईड नोट ताब्यात घेण्यात आली आहे. यात कृष्णेंदुने आत्महत्या करण्याआधी नोटबुकमध्ये लिहिले की, आई , मी कुरकुरे नाही चोरले. मला ते रस्त्यावर भेटले होते. मी चोरी नाही केली. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू प्रकरण दाखल करत तपास सुरू केला आहे. दुकानदार शुभांकर दीक्षित नागरिक स्वयंसेवकही आहे आणि घटनेनंतर फरार आहे.

Comments
Add Comment

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय

केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहन चुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे

राज्य स्थापनेनंतर ३८ वर्षांनी मिझोरमला मिळाली रेल्वे

मिझोरम : मिझोरम या राज्याची स्थापना २० फेब्रुवारी १९८७ रोजी झाली. राज्य स्थापनेनंतर जवळपास ३८ वर्षांनी मिझोरम