अहिल्यानगरमध्ये संभाव्य दुर्घटनेचा धोका! विद्युत तारांवर लटकलेला फ्लेक्स, प्रशासन दुर्लक्ष करतंय?

अहिल्यानगर: राज्यात गेल्या वर्षी घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेत १७ जणांना जीव गमवावा लागला होता. यानंतर राज्यभरात अनधिकृत फ्लेक्स व होर्डिंग्सविरोधात कडक कारवाईचे आदेश देण्यात आले. मात्र, अजूनही अनेक ठिकाणी प्रशासनाचा हलगर्जीपणा जीवघेणा ठरू शकतो, याचा ताजा प्रत्यय काल अहिल्यानगरमध्ये पाहायला मिळाला.


पोलीस अधीक्षक कार्यालय चौकात काल वादळी वाऱ्यामुळे एक मोठा फ्लेक्स तुटून थेट मुख्य वीज वाहक तारांवर अडकला. परिणामी, त्या परिसरात नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. सदर ठिकाणी दिवसभरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते, त्यामुळे कोणतीही चूक जीवघेणी ठरू शकते.



विजेच्या तारांवर लटकणारे फ्लेक्स, नागरिकांमध्ये तीव्र संताप


गेल्या १२ ते १४ तासांपासून हा फ्लेक्स लटकत असून, महावितरण, महानगरपालिका किंवा पोलीस प्रशासनाकडून यावर कोणतीही तत्काळ कारवाई झालेली नाही. परिणामी, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.


सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारे यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया देत, प्रशासनाला प्रश्न विचारला आहे की, "मुंबईच्या घाटकोपर दुर्घटनेची पुन्हा पुनरावृत्ती होईपर्यंत प्रशासन डोळेझाक करत राहणार का?". सदर प्रकारावर त्वरीत कारवाई करून फ्लेक्स हटवण्यात यावे, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार