अहिल्यानगरमध्ये संभाव्य दुर्घटनेचा धोका! विद्युत तारांवर लटकलेला फ्लेक्स, प्रशासन दुर्लक्ष करतंय?

अहिल्यानगर: राज्यात गेल्या वर्षी घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेत १७ जणांना जीव गमवावा लागला होता. यानंतर राज्यभरात अनधिकृत फ्लेक्स व होर्डिंग्सविरोधात कडक कारवाईचे आदेश देण्यात आले. मात्र, अजूनही अनेक ठिकाणी प्रशासनाचा हलगर्जीपणा जीवघेणा ठरू शकतो, याचा ताजा प्रत्यय काल अहिल्यानगरमध्ये पाहायला मिळाला.


पोलीस अधीक्षक कार्यालय चौकात काल वादळी वाऱ्यामुळे एक मोठा फ्लेक्स तुटून थेट मुख्य वीज वाहक तारांवर अडकला. परिणामी, त्या परिसरात नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. सदर ठिकाणी दिवसभरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते, त्यामुळे कोणतीही चूक जीवघेणी ठरू शकते.



विजेच्या तारांवर लटकणारे फ्लेक्स, नागरिकांमध्ये तीव्र संताप


गेल्या १२ ते १४ तासांपासून हा फ्लेक्स लटकत असून, महावितरण, महानगरपालिका किंवा पोलीस प्रशासनाकडून यावर कोणतीही तत्काळ कारवाई झालेली नाही. परिणामी, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.


सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारे यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया देत, प्रशासनाला प्रश्न विचारला आहे की, "मुंबईच्या घाटकोपर दुर्घटनेची पुन्हा पुनरावृत्ती होईपर्यंत प्रशासन डोळेझाक करत राहणार का?". सदर प्रकारावर त्वरीत कारवाई करून फ्लेक्स हटवण्यात यावे, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा