बीड जिल्ह्यात उलथापलाथ, एकाचवेळी ६०६ पोलिसांच्या बदल्या

बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात मोठी उलथापालथ झाली आहे. जिल्ह्यातील ६०६ पोलिसांची एकाचवेळी बदली करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा विश्वासू वाल्मिक कराड याच्यावर गंभीर आरोप झाले. नंतर वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांना अटक झाली. बीड जिल्ह्यातील पोलिसांच्या भोंगळ कारभाराच्या अनेक बातम्या आल्या. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील ६०६ पोलिसांच्या बदल्यांचे आदेश एकाचवेळी काढण्यात आले आहेत. याआधी सरपंच हत्येप्रकरणी काही पोलिसांचे निलंबन झाले आहे. निलंबनाच्या कारवाईनंतर काही काळ बीडमध्ये पोलीस दलात काही बदल झाले नव्हते. पण आता एकदम मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

बीड पोलीस दलातील शिपाई ते पोलीस उपनिरीक्षक या पदांवरच्या ६०६ पोलिसांच्या बदल्यांचे आदेश एकाचवेळी काढण्यात आले आहेत. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी याबाबतची प्रक्रिया पूर्ण केली आहे. महिन्याभरात बदल्यांच्या अंमलबजावणीचे काम पूर्ण होईल. सर्व अधिकारी - कर्मचारी नव्या जबाबदारीवर नियुक्त होतील. संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मागील अनेक वर्षांपासून एकाच पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले होते. यातील काही पोलिसांचे स्थानिक गुन्हेगारांशी संबंध होते. त्यामुळे गुन्हेगारांची हिंमत वाढली होती.
Comments
Add Comment

10th-12 Board Exam 2026: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेवर पोहोचवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी लढवली अनोखी शक्कल

ठाणे: आजपासून म्हणजेच मंगळवार १० फेब्रुवारी पासून बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. तर २० फेब्रुवारी

नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी, या तारखेपासून UPI मधून पटकन पैसे काढता येणार

मुंबई: नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी आहे. EPFO चे पैसे थेट UPI वरुन काढता येणार आहेत. आपल्या हक्काचे पैसे

Delhi Crime: पलंगाखाली सापडला खजिना, मोलकरीण ३० लाखांचे दागिने घेऊन फरार

नवी दिल्ली: द्वारका येथे एका मोलकरणीने केलेल्या मोठ्या चोरीचा उलगडा दिल्ली पोलिसांनी केला आहे. जलदगतीने कारवाई

Gold-Silver Rate: आनंदवार्ता! सोन्याच्या दरात २५०० रुपयांची घसरण; चांदीचे दरही घसरले

मुंबई: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवार ९ फेब्रुवारी रोजी सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये वाढ झाली होती.

Sunetra Pawar: उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारताच सुनेत्रा पवार यांचं पहिलं ट्विट; म्हणाल्या...

मुंबई: अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. मात्र आज

उबाठा गट हा शून्यात हरवलेला पक्ष भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई : सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा पोटभाडेकरू असलेला उबाठा गट हा शून्यात हरवलेला पक्ष आहे असा घणाघात