बीड जिल्ह्यात उलथापलाथ, एकाचवेळी ६०६ पोलिसांच्या बदल्या

बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात मोठी उलथापालथ झाली आहे. जिल्ह्यातील ६०६ पोलिसांची एकाचवेळी बदली करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा विश्वासू वाल्मिक कराड याच्यावर गंभीर आरोप झाले. नंतर वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांना अटक झाली. बीड जिल्ह्यातील पोलिसांच्या भोंगळ कारभाराच्या अनेक बातम्या आल्या. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील ६०६ पोलिसांच्या बदल्यांचे आदेश एकाचवेळी काढण्यात आले आहेत. याआधी सरपंच हत्येप्रकरणी काही पोलिसांचे निलंबन झाले आहे. निलंबनाच्या कारवाईनंतर काही काळ बीडमध्ये पोलीस दलात काही बदल झाले नव्हते. पण आता एकदम मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

बीड पोलीस दलातील शिपाई ते पोलीस उपनिरीक्षक या पदांवरच्या ६०६ पोलिसांच्या बदल्यांचे आदेश एकाचवेळी काढण्यात आले आहेत. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी याबाबतची प्रक्रिया पूर्ण केली आहे. महिन्याभरात बदल्यांच्या अंमलबजावणीचे काम पूर्ण होईल. सर्व अधिकारी - कर्मचारी नव्या जबाबदारीवर नियुक्त होतील. संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मागील अनेक वर्षांपासून एकाच पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले होते. यातील काही पोलिसांचे स्थानिक गुन्हेगारांशी संबंध होते. त्यामुळे गुन्हेगारांची हिंमत वाढली होती.
Comments
Add Comment

अरे बापरे! देशभरात २२ बनावट विद्यापीठे

यूजीसीकडून देशातील २२ बनावट विद्यापीठांची यादी जाहीर नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) देशातील २२ बनावट

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यासपीठावर मनोज जरांगे येणार का?

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांच्या मनात नेमकं चाललंय काय? निवृत्ती की राजकीय खेळी?

शिंदे गटाच्या आमदाराच्या निर्णयामागे कुटुंबातील 'नवे नेतृत्व' आणण्याची खेळी? मुंबई : राज्याचे समाजकल्याण

मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये खुर्चीवरून भांडण! नागपूरचे पोस्टमास्टर जनरलपद नेमके कुणाकडे?

एकीने दुसरीच्या अंगावर पाणी ओतलं, चिमटाही काढला नागपूर : नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या

एल्फिन्स्टन पूल पाडण्यासाठी रेल्वेच्या मंजुरीची प्रतीक्षा, पश्चिम रेल्वेची अवाजवी मागणी!

मुंबई : वरळी-शिवडी उन्नत मार्गाच्या प्रकल्पासाठी एल्फिन्स्टन पुलावरील डांबरी थर काढण्याचे काम पूर्ण झाले असून,