बीड जिल्ह्यात उलथापलाथ, एकाचवेळी ६०६ पोलिसांच्या बदल्या

बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात मोठी उलथापालथ झाली आहे. जिल्ह्यातील ६०६ पोलिसांची एकाचवेळी बदली करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा विश्वासू वाल्मिक कराड याच्यावर गंभीर आरोप झाले. नंतर वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांना अटक झाली. बीड जिल्ह्यातील पोलिसांच्या भोंगळ कारभाराच्या अनेक बातम्या आल्या. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील ६०६ पोलिसांच्या बदल्यांचे आदेश एकाचवेळी काढण्यात आले आहेत. याआधी सरपंच हत्येप्रकरणी काही पोलिसांचे निलंबन झाले आहे. निलंबनाच्या कारवाईनंतर काही काळ बीडमध्ये पोलीस दलात काही बदल झाले नव्हते. पण आता एकदम मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

बीड पोलीस दलातील शिपाई ते पोलीस उपनिरीक्षक या पदांवरच्या ६०६ पोलिसांच्या बदल्यांचे आदेश एकाचवेळी काढण्यात आले आहेत. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी याबाबतची प्रक्रिया पूर्ण केली आहे. महिन्याभरात बदल्यांच्या अंमलबजावणीचे काम पूर्ण होईल. सर्व अधिकारी - कर्मचारी नव्या जबाबदारीवर नियुक्त होतील. संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मागील अनेक वर्षांपासून एकाच पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले होते. यातील काही पोलिसांचे स्थानिक गुन्हेगारांशी संबंध होते. त्यामुळे गुन्हेगारांची हिंमत वाढली होती.
Comments
Add Comment

baba adhav passed away : कष्टकऱ्यांचा आधार हरपला! ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचे निधन; वयाच्या ९५ व्या वर्षी बाबा आढावांनी घेतला अखेरचा श्वास

पुणे : राज्यातील पुरोगामी चळवळीला आणि शेतकरी-कामगार वर्गाला मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा

जास्तीचे शुल्क न आकारता प्रवाशांचे पैसे परत करा, मुरलीधर मोहोळ यांचे निर्देश

पुणे : 'इंडिगो' च्या ढिसाळ नियोजनाचा फटका बसलेल्या प्रवाशांकडून जास्तीचे शुल्क न आकारता प्रवाशांचे पैसे परत करा

राज्यातील ४९ लाख जमिनी अधिकृत होणार

नागपूर : महाराष्ट्र सरकारने शेतजमिनीच्या तुकडेबंदी कायद्यात ऐतिहासिक सुधारणा करत मुंबई, पुणे, नागपूरसह

अज्ञात वैमानिकाच्या पत्रात 'इंडिगो'वर ‘गैरव्यवस्थापन,’ आणि ‘अपमान’ केल्याचा आरोप

नवी दिल्ली : देशातील एक विमान सेवा कंपनी सध्या आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे. गेला

बाणेरमधील आरोपीला दिल्लीतून पाच महिन्यांनंतर अटक

पुणे : बाणेर भागात रिक्षाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यू प्रकरणी एकाला दिल्लीतून अटक

'या' तारखेला १०३ वर्षांचा ब्रिटिशकालीन पूल पाडणार, कसं असेल मध्य रेल्वेचं नवं वेळापत्रक?

सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील जवळपास १०३ वर्षे जुना असलेला ब्रिटिशकालीन रोड ओव्हर ब्रिज अखेर