नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी, या तारखेपासून UPI मधून पटकन पैसे काढता येणार

मुंबई: नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी आहे. EPFO चे पैसे थेट UPI वरुन काढता येणार आहेत. आपल्या हक्काचे पैसे कर्मचाऱ्यांना आता कधीही काढता येणार आहेत. एप्रिल २०२६ रोजी काही नवीन बदल होणार आहेत. त्याचा थेट फायदा कर्मचाऱ्यांना होणार आहे.


तुमच्या हक्काच्या EPFO मधील पैसे काढण्यासाठी आता क्लेम फॉर्म भरून दिवसेंदिवस वाट पाहण्याची गरज उरणार नाही. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं आपल्या ८ कोटी सदस्यांसाठी 'EPFO 3.0' अॅपमध्ये हे महत्त्वाचं आणि नवीन अपग्रेड आणत आहे. या अंतर्गत एप्रिल २०२६ पर्यंत एक नवीन मोबाईल ॲप लाँच केला जाईल, ज्याद्वारे सदस्य थेट UPI वापरून आपल्या खात्यातील पैसे काढू शकतात.


पीएफ काढण्याची प्रक्रिया आता सोपी होणार आहे. नव्या नियमांनुसार, सदस्य आपल्या युपीआय पिनचा वापर करून लिंक केलेल्या बँक खात्यात तात्काळ पैसे वळवू शकतील. आजारपण, लग्न, शिक्षण किंवा घराच्या कामासाठी लागणारा पैसा आता अवघ्या तीन दिवसांत हातात येईल. विशेष म्हणजे, हे काम स्वत: वापरकर्ता करु शकणार आहे.


युपीआयद्वारे पैसे काढताना एका व्यवहारासाठी २५ हजार रुपयांची मर्यादा असण्याची शक्यता आहे. निवृत्तीनंतरची सुरक्षा जपण्यासाठी तुमच्या एकूण बॅलन्सपैकी किमान २५ टक्के हिस्सा 'लॉक' राहील, तर उर्वरित मोठा हिस्सा तुम्ही गरजेनुसार काढू शकाल. लांबच लांब क्लेम प्रोसेसऐवजी आता थेट डिजिटल सेटलमेंटवर भर दिला जाईल.

Comments
Add Comment

Indian Railways : लोणावळा - कर्जत मार्गावर दरड कोसळल्यामुळे दिनांक १७ जुलै २०२६ पर्यंत काही गाड्यांच्या मार्गात बदल

लोणावळा - कर्जत मार्गावर दरड कोसळल्यामुळे दिनांक १७ जुलै २०२६ पर्यंत काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट/ शॉर्ट ओरीजनेट/

Moshi Incident : मोशी दुर्घटनेतील मृतांचा आकडा सहावर; १७ जणांना बाहेर काढण्यात यश

पिंपरी  : मोशी येथील कचरा डेपो परिसरात कचऱ्याचा प्रचंड ढिगारा कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत मृतांचा आकडा सहावर

Donald Trump : हजार क्षेपणास्त्रे तयार;इराणला ट्रम्प यांचा इशारा

वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंध पुन्हा एकदा तणावपूर्ण वळणावर आले असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

Traffic Congestion : वाहतूक कोंडीचा अर्थव्यवस्थेला फटका;चार शहरांना दरवर्षी ₹१.४७ लाख कोटींचे नुकसान

नवी दिल्ली: देशातील प्रमुख महानगरांमधील वाढती वाहतूक कोंडी ही केवळ नागरिकांच्या गैरसोयीचा विषय राहिलेली नसून,

Heatwave in India : उष्णतेच्या विळख्यात भारतातील १४ शहरे

जागतिक धोकादायक ५० शहरांच्या यादीत पुणे, नागपूरचा समावेश; अहमदाबाद दुसऱ्या क्रमांकावर नवी दिल्ली : शहरातील सतत

Ashish Shelar : लोककलांच्या धोरणाच्या बळकटीकरणासाठी समिती स्थापन करणार

सांस्कृतिक कार्यमंत्री अँड आशिष शेलार राज्याचे सांस्कृतिक धोरण तयार झाले आहे, त्यामध्ये लोककलांचा विचार