10th-12 Board Exam 2026: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेवर पोहोचवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी लढवली अनोखी शक्कल

ठाणे: आजपासून म्हणजेच मंगळवार १० फेब्रुवारी पासून बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. तर २० फेब्रुवारी पासून दहावीच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. अशातच ठाणे वाहतूक पोलिसांनी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी उशीर होऊ नये म्हणून एक अनोखी शक्कल लढवली आहे.


परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना होणाऱ्या प्रवासाच्या अडचणी कमी करण्यासाठी, ठाणे वाहतूक पोलिसांनी ठाणे पोलीस आयुक्तालयात मोटारसायकलवर ५४ वाहतूक हवालदार तैनात केले आहेत.


वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, विद्यार्थी किंवा त्यांचे पालक वाहतूक नियंत्रण हेल्पलाइन, व्हॉट्सअॅप किंवा १८ ट्रॅफिक युनिटपैकी कोणत्याही एका युनिटद्वारे त्यांचे लाईव्ह लोकेशन शेअर करून मदत मागू शकतात. वाहतूक कोंडी किंवा वाहनांच्या बिघाडामुळे त्यांना उशीर होऊ नये म्हणून दुचाकीवरून एक ट्रॅफिक कॉन्स्टेबल त्या ठिकाणी पोहोचेल आणि त्यांना परीक्षा केंद्रावर सोडेल.


गेल्या वर्षीही असाच एक उपक्रम ठाणे वाहतूक पोलिसांकडून राबवण्यात आला होता. त्यावेळी ३२ पोलिसांनी दुचाकीवरून वाहतूक कोंडीत अडकलेल्या ३४ विद्यार्थ्यांची मदत केली होती.


सध्या सर्वत्र अनेक रस्त्यांची कामे, मेट्रो बांधकाम आणि महामार्ग प्रकल्प सुरू असल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. अशातच परीक्षेच्या काळात सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत जड वाहनांना त्या मार्गांवरून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. जड वाहन चालकांनी याचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही पोलिसांनी सांगितले.


ठाणे पोलिस आयुक्तालयांतर्गत, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी २२३ आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी १२६ परीक्षा केंद्रे आहेत.

Comments
Add Comment

Nitesh Rane : राज्यातील आदिवासी भागात 'मत्स्यक्रांती'चे वारे; मंत्री नितेश राणे यांनी घेतला 'धरती आभा अभियाना'चा आढावा

- ५ वर्षांत १८० प्रकल्प मंजूर मुंबई : राज्यातील दुर्गम आणि आदिवासी बहुल भागांमधील आर्थिक सक्षमीकरणाला गती

Devendra Fadnavis : राज्यातील तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ९९३ कोटी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी

- दर्जेदार सुविधांसह कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई : राज्यातील ऐतिहासिक, धार्मिक आणि

Nitesh Rane : बुरोंडीत मच्छीमार जेट्टी उभारणीला गती; दापोलीच्या मत्स्यव्यवसायाला मिळणार नवे बळ – मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील बुरोंडी येथे प्रस्तावित मच्छीमार जेट्टी प्रकल्पाला आता गती

Nitesh Rane : इंधन बचतीसाठी मंत्री नितेश राणे यांचा मेट्रोने प्रवास

मुंबई : जागतिक इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला

Pratap Sarnaik : 'एसटी'चा प्रवास महागणार?

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संकेत; ३१ मेपर्यंत वाट पाहण्याची भूमिका मुंबई : अमेरिका आणि इराणमधील

Chandrashekhar Bawankule : भर कार्यक्रमात महसूलमंत्र्यांना कागदाने वारा! अमरावतीच्या जनता दरबारातील 'तो' व्हिडिओ चर्चेत

अमरावती : राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या एका अनोख्या व्हिडिओची जोरदार चर्चा रंगली आहे. अमरावती जिल्ह्यातील