मुंबईत काही ठिकाणी १३ तासांचा पाणीब्लॉक

१५ टक्के पाणीकपात जाहीर


मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिका तसेच ठाणे व भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेत पाणीपुरवठा करणाऱ्या पांनरापूर येथील उर्दचन केंद्रागीरा टप्पा क्रमांक १ येथे नवीन दाबवाढ नियंत्रण टाकी (अँटी सर्ज व्हसेल) कार्यान्वित करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. हे काम बुधवार २८ मे २०५२५ रोजी सकाळी ९.४५ पासून रात्री १०.४५ वाजेपर्यंत म्हणजेच एकूण १२ तासांसाठी नियोजित आहे.

त्यामुळे शहर विभाग आणि पूर्व उपनगरांतील बहुतेक विभागांचा पाणीपुरवठा प्रभावित होणार असून या १२ तासांच्या कालावधीत शहर आणि पूर्व उपनगरांमध्ये १५ टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. तसेच ठाणे व भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील ज्या भागास मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा होतो त्या भागांतही ही १५ टक्के पाणीकपात लागू राहणार आहे. त्यामुळे या संबंधित परिसरांमधील सर्व नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून या कालावधीत पाण्याचा चापर काटकसरीने करावे असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

शहर भागांत याठिकाणी असेल पाणीकपात


एफ दक्षिण विभाग (परळ, शिवडी, लालबाग, काळाचौकी)
एफ उत्तर विभाग (वडाळा, माटुंगा, शीव, अॅटॉप हिल)

पूर्व उपनगरातील या भागांत असेल पाणीकपात


टी विभाग मुलुङ (पूर्व) आणि (पश्चिम) भाग
एस विभाग भांडुप, नाहूर, काजूरमार्ग आणि विक्रोळी (पूर्व) भाग
एन विभाग विक्रोळी, घाटकोपर (पूर्व), घाटकोपर आदी भाग
एल विभाग कुर्ला (पूर्व) आणि टिळकनगर चुनाभट्टी भाग
एम पूर्व विभाग (गोवंडी, देवनार, शिवाजी नगर) पूर्ण विभाग
एम पश्चिम विभाग: चेंबूर आणि आसपासचा भाग
Comments
Add Comment

Marine Technology : आधुनिक सागरी तंत्रज्ञान महाराष्ट्रात आणणार; मंत्री नितेश राणे

मुंबई : राज्यातील सागरी वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक, सुरक्षित आणि प्रवासी-केंद्रित करण्याच्या दृष्टीने

Nitesh Rane : मांडवा-मरीना व रेवस-मांडवा जेट्टी कामांना गती द्या, मंत्री नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : अलिबाग तालुक्यातील मांडवा मरीना जेट्टी विकास तसेच रेवस-मांडवा प्रवासी जेट्टी दुरुस्ती व मजबुतीकरणाच्या

Pandharpur : पंढरपूर विकास आराखड्याच्या कामास गती देणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : आषाढी वारी काळात निघणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी

Heatstroke : अतिउष्णतेच्या संकटाचा सामना करण्यासाठी सक्षम उपाययोजना करणार

मुंबई : हवामान बदल या संकटाचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला, विशेषतः अल्प भूधारक शेतकऱ्यांना बसत आहे

Tarapur MIDC : तारापूर औद्योगिक क्षेत्रात चाललंय काय ? अहवाल सादर करण्याचे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश

मुंबई : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील घातक रासायनिक द्रव स्वरुपातील गैरप्रकाराबद्दल औद्योगिक भूखंडाची

Youth : ‘युवकांमध्ये प्रचंड सृजनशीलता, नाविन्यता, कौशल्यता आणि कल्पकता’

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य