सद्गुरू का हवे?

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै


आज अध्यात्माच्या विरोधात काही विशिष्ट प्रवृत्ती निर्माण झालेल्या आहेत. देव नाहीच असे म्हणतात. कारण यांना सद्गुरुंचे मार्गदर्शन नसते आणि हे म्हणतात आम्हांला गुरूच नको. सद्गुरू आम्ही करणारच नाही. आमचे आम्ही मुख्यत्यार आहोत. देव म्हणजे काय खेळणे आहे का? जगांत काय चालले आहे ते मार्गदर्शकाशिवाय कसे कळणार? आमच्या भीमसेन जोशींनीसुद्धा गाण्यासाठी किती हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या किती ठिकाणी फिरावे लागले व फिरता फिरता चांगले गुरू मिळाले ते त्यांच्या शेजारीच. चांगले गुरू त्यांना त्यांच्या शेजारीच मिळाले. कोण? सवाई गंधर्व हे त्यांचे गुरू व ते त्यांच्या शेजारीच होते पण भीमसेन जोशी कुठे कुठे फिरले. तसे आपले झालेले आहे. आपण देवाला शोध शोध शोधतो व तो असतो आपल्याजवळ. सांगायचा मुद्दा असा भीमसेन जोशींना गाण्यासाठी मार्गदर्शन मिळाले तरी त्यांना कितीतरी कष्ट करावे लागले मग अध्यात्मात काय? पण लोकांना समजत नाही त्याला काय करणार?


जीवनाच्या सर्वच क्षेत्रात मार्गदर्शकाचे म्हणजेच गुरुचे स्थान वादातीत आहे. परमार्थाच्या क्षेत्रात तर सद्गुरुंचे महत्त्व अपरंपार आहे. स्थूल स्वरूपाच्या विद्या व कला गुरूशिवाय आकळता येत नाहीत मग अध्यात्मविद्येसारखी सूक्ष्मविद्या सद्गुरूंशिवाय आत्मसात करता येणे शक्य आहे का? अध्यात्म विद्येचे स्वरूपच न समजल्यामुळे हा सर्व घोटाळा निर्माण झालेला आहे. अध्यात्मशास्त्र शिकायचे म्हणजे आपल्या जीवनातील फार मोठे गुह्य आकलणे होय. परंतु खेदाची गोष्ट अशी आहे की, या सत्याची जाणीव परमार्थात पडलेल्या बहुसंख्य लोकांना नसते. खरे सद्गुरू भेटतात तेव्हाच या सत्याची जाणीव साधकाला होते व ते सद्गुरूच साधकाला जीवनातील मोठे गुह्य समजावून देऊन त्या महान गुह्याची उकल कशी करून घ्यायची त्याचा स्पष्ट मार्ग दाखवितात. म्हणून सद्गुरुशिवाय तरणोपाय नाही असे सर्व संत सांगतात ते स्वीकारायचे की नाकारायचे हे तू ठरव कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.

Comments
Add Comment

Chandra Grahan 2026: चंद्रग्रहणात धुळवड खेळावी? काय करावे, टाळावे? जाणून घ्या

मुंबई: यंदा होळी आणि चंद्रग्रहण अशी दुर्मीळ घटना जुळून आली आहे. २ मार्च रोजी होलिका दहन असून ३ मार्चला

Surya Grahan 2026: दुर्मीळ योग! माघ अमावस्या आणि सूर्यग्रहण एकाच दिवशी; काय खावे आणि काय टाळावे?, जाणून घ्या...

मुंबई: खगोलीय घटनांच्या दृष्टीने २०२६ हे वर्ष विशेष ठरणार आहे. या वर्षात दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण

Solar Eclipse: १७ फेब्रुवारीला वर्षातील पहिलं सूर्यग्रहण, जाणून घ्या वेळ आणि दिवसभरात कोणत्या चूका टाळाव्यात?

मुंबई: खगोलशास्त्र आणि धार्मिक परंपरांमध्ये रस असणाऱ्यांसाठी २०२६ हे वर्ष विशेष महत्त्वाचं ठरणार आहे. या

MahaShivratri 2026: महाशिवरात्री पूजेनंतर वापरलेल्या साहित्याचे काय करावे?, विसर्जनाची योग्य पद्धत जाणून घ्या...

मुंबई: महाशिवरात्री पूजा संपताच मनात विचार येतो की, पूजेत वापरल्या जाणाऱ्या साहित्याचे काय करावे? ते कचऱ्यात

Grishneshwar temple : शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी! महाशिवरात्रीला घृष्णेश्वराचे 'गाभारा दर्शन' सुरूच राहणार

वेरूळ : महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरातील दर्शनाबाबत प्रशासनाने

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची