Vaishnavi Hagawane : राजेंद्र हगवणेंची अजितदादांच्या राष्ट्रवादीतून हकालपट्टी!

पुणे : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात मोठी राजकीय कारवाई झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर राजेंद्र हगवणे यांना पक्षातून बडतर्फ करण्यात यावे, या मागणीनं जोर धरला होता. दरम्यान, पक्षाने निर्णय घेत त्यांची हकालपट्टी केली आहे. याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी माहिती दिली आहे. यासंदर्भात सुरज चव्हाण यांनी माहिती देताना सांगितलं की, 'अजित पवारांचं पुणे सीपींसोबत बोलणं झालंय. त्यांनी दोषींवर कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई केली जाईल', असं ते म्हणाले.



सुरज चव्हाण हगवणे यांच्या बडतर्फच्या कारवाईवर म्हणाले, 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी हगवणे यांचा कोणताही संबंध नाही, त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आलेलं आहे. अजित पवारांनी आतापर्यंत त्यांच्या कार्यकर्त्यांना अनेकवेळा संबोधित करताना कुणीही चुकीचं वागला, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, टायरमध्ये घालून मारलं जाईल, अशा पद्धतीच्या सुचना दिल्या होत्या. आज अजित पवारांनी पुणे सीपींशी बोलून तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे आदेश दिले आहेत.


सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पती, सासू, नणंद या तिघांना अटक करण्यात आली आहे. तर, सासरा आणि दीर फरार असल्याची माहिती आहे. सासरा आणि दीराला शोधण्यासाठी तपासासाठी पोलिसांच्या ४ पथके रवाना करण्यात आले आहे. तसेच आज, गुरुवारी (दि. २२) राजेंद्र हगवणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून बडतर्फ करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते होणार खड्डेमुक्त, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून निधी मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खड्डे बुजून रस्त्यांची डागडुजी करावी, रस्ते सुस्थितीत व्हावे,

'आरएसएस' कार्यक्रमाला सरन्यायाधीशांच्या मातोश्रींच्या उपस्थितीवरून मोठा सस्पेन्स!

ते पत्र खोटं! सरन्यायाधीशांच्या मातोश्री संघाच्या कार्यक्रमाला जाणार! राजेंद्र गवईंचा खुलासा अमरावती: देशाचे

पावसाचे कारण सांगून गैरहजर रहाणा-या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!

मुंबई : राज्यात परतीच्या पावसामुळे अतिवृष्टीचे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, अशा गंभीर परिस्थितीमध्ये

Maharashtra Rain Update : हवामान विभागाचा 'हाय अलर्ट', राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये मोठा धोका, घराबाहेर पडणे टाळाच!

राज्यात पूरस्थिती गंभीर : मुख्यमंत्री फडणवीसांकडून आढावा मुंबई : राज्यात सध्या पावसाने हाहाकार माजवला असून,

Rain Update : ठाणे जिल्ह्यासाठी रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट; प्रशासन सज्ज, पालघरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर

ठाणे : प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, ठाणे जिल्ह्यात दि.२८ सप्टेंबर २०२५ रोजी 'रेड अलर्ट' (Red Alert)

मुख्यमंत्र्यांनी पोलखोल करताच संजय राऊतांची जीभ घसरली, वाहिली शिव्यांची लाखोली; पहा नेमकं काय झालं?

भोXXXX सरकार कोणाचं आहे? हXXXX लोक आहेत, संजय राऊतांची जीभ घसरली मुंबई : उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र