वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसने दिली पहिली प्रतिक्रिया

मुंबई : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणेने आत्महत्या केली. पण वैष्णवीच्या मृत्यूला तिच्या सासरची माणसंच कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात प्रमुख आरोपी असलेले वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे हे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असल्याच्या बातम्या येत होत्या. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हगवणे कुटुंबाचा पक्षाशी संबंध नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही पदावर नाहीत, असेही ते म्हणाले.

वैष्णवीच्या मृत्यूप्रकरणी हगवणे कुटुंबातील चौघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यापैकी तीन आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे हे अद्यापही फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

वैष्णवीचा मुलगा जेमतेम नऊ महिन्यांचा आहे. नातवाचा ताबा घेण्यासाठी गेले त्यावेळी निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीने पिस्तुल दाखवून धमकावले, असा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला आहे. वैष्णवीच्या मृत्यूला आठवडा उलटला तरी नातवाचा ताबा मिळालेला नाही. आता नातवाला सुरक्षितरित्या ताब्यात देण्याची जबाबदारी पोलिसांनी त्यांच्या शिरावर घ्यावी, अशी भूमिका वैष्णवीच्या वडिलांनी जाहीररित्या घेतली आहे.

वैष्णवीचा हुंड्यासाठी अमानुष छळ केल्याचा सासरे राजेंद्र हगवणेंसह सासू, पती, दिर आणि नणंद यांच्यावर आरोप आहे. प्रेम विवाहावेळी ५१ तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी आणि चांदीची भांडी दिली तरी जमीन खरेदीसाठी दोन कोटी रुपयांकरिता वैष्णवीच्या सासरच्यांनी तिच्याकडे तगादा लावला होता. पती शशांक हा वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला होता. वारंवार वैष्णवीचा शारीरिक आणि मानसिक छळ होत होता.
Comments
Add Comment

महाराष्ट्रात उभारले जाणार पर्यावरणपूरक 'ग्रीन डेटा सेंटर'; प्रकल्पांच्या अभ्यासासाठी डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती!

उद्योगमंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेत माहिती मुंबई : राज्याचा औद्योगिक विकास वेगाने करतानाच पर्यावरण आणि

Health Minister Prakash Abitkar : खासगी रुग्णालयांनी उपचारांचे दरफलक लावणे बंधनकारक

अतिरिक्त शुल्क घेतल्यास होणार कारवाई मुंबई : राज्यातील खासगी रुग्णालयांनी उपचारांचे दरफलक लावणे बंधनकारक असून

Strait of Hormuz : ३० भारतीय जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून बाहेर पडली ; तेल, वायू अन् खतांचा जहाजात समावेश, २० हून अधिक जहाजे रांगेत

३० भारतीय जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून बाहेर पडली नवी दिल्ली : इराण आणि अमेरिका यांच्यातील सामंजस्य

Ketan Agrawal Murder Case : 'खून मी नाही, त्याने केला!'... केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट; पोलिसही चक्रावले

Journalist Controversy : पत्रकार वादावर खासदार संजय पाटील यांनी मागितली माफी

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय पाटील(Sanjay Patil) यांनी पत्रकारांसोबत झालेल्या वादानंतर जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली

Environment Minister Pankaja Munde : प्रदूषण नियंत्रणासाठी शॉर्ट, मिड व लॉंग टर्म आराखडा;

मुंबई : चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लाँग टर्म गोल्सचा स्वतंत्र