वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसने दिली पहिली प्रतिक्रिया

मुंबई : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणेने आत्महत्या केली. पण वैष्णवीच्या मृत्यूला तिच्या सासरची माणसंच कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात प्रमुख आरोपी असलेले वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे हे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असल्याच्या बातम्या येत होत्या. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हगवणे कुटुंबाचा पक्षाशी संबंध नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही पदावर नाहीत, असेही ते म्हणाले.

वैष्णवीच्या मृत्यूप्रकरणी हगवणे कुटुंबातील चौघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यापैकी तीन आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे हे अद्यापही फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

वैष्णवीचा मुलगा जेमतेम नऊ महिन्यांचा आहे. नातवाचा ताबा घेण्यासाठी गेले त्यावेळी निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीने पिस्तुल दाखवून धमकावले, असा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला आहे. वैष्णवीच्या मृत्यूला आठवडा उलटला तरी नातवाचा ताबा मिळालेला नाही. आता नातवाला सुरक्षितरित्या ताब्यात देण्याची जबाबदारी पोलिसांनी त्यांच्या शिरावर घ्यावी, अशी भूमिका वैष्णवीच्या वडिलांनी जाहीररित्या घेतली आहे.

वैष्णवीचा हुंड्यासाठी अमानुष छळ केल्याचा सासरे राजेंद्र हगवणेंसह सासू, पती, दिर आणि नणंद यांच्यावर आरोप आहे. प्रेम विवाहावेळी ५१ तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी आणि चांदीची भांडी दिली तरी जमीन खरेदीसाठी दोन कोटी रुपयांकरिता वैष्णवीच्या सासरच्यांनी तिच्याकडे तगादा लावला होता. पती शशांक हा वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला होता. वारंवार वैष्णवीचा शारीरिक आणि मानसिक छळ होत होता.
Comments
Add Comment

Mumbai Local Train Crime : लोकलमधील किरकोळ वादाचं भीषण रूप; मध्यरात्री घडली धक्कादायक घटना

मुंबई : मुंबईच्या (Mumbai) लोकल ट्रेनमध्ये (Local Train) पुन्हा एकदा धक्कादायक गुन्ह्याची (Crime) घटना समोर आली आहे. मध्यरात्री

Devendra Fadnavis : सुमार कामगिरी करणाऱ्यांना मुख्यमंत्री देणार नारळ?

- मंत्रिमंडळात फेरबदलांचे संकेत; चांगले काम करणाऱ्या मंत्र्यांचे 'प्रमोशन' मुंबई : महायुती सरकारमध्ये सुमार

Chandrashekhar Bawankule : ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने’साठी ९१ विधानसभा मतदारसंघांत 'सह अध्यक्षां'ची नेमणूक; महसूलमंत्री बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याच्या असलेल्या ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने’च्या

Narendra Modi : सीईटीए' करारामुळे शेतकरी, उद्योजक आणि एमएसएमईंना नवी गती : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातील 'सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार' आणि ऐतिहासिक 'सामाजिक

Jaykumar Gore : सोलापूर-मुंबई विमानसेवा २ ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्याला यश

सोलापूर : सोलापूर विमानतळावरून २८ जून पासून बंद असलेली सोलापूर ते मुंबई विमानसेवा स्टार एअरलाईन कंपनीकडून २

PoK : पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबारात PoK मध्ये 12 नागरिकांचा मृत्यू

मुझफ्फराबाद : पाकिस्तानव्याप्त काश्मीर (POK)मध्ये सरकारविरोधी आंदोलन अधिक तीव्र झाले असून, मंगळवारी आंदोलक आणि