पावसाने थैमान घातल्यामुळे २० तास वीज पुरवठा खंडित

  57

मुरबाड तालुक्यातील वीट भट्टीवाल्यांचेही मोठे नुकसान 


मुरबाड: मुरबाड तालुक्यातील ग्रामीण आदिवासी पट्टा तसेच मुरबाड शहर परिसरात मागील दहा ते बारा दिवस मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने थैमान घातल्याने सर्वच ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून येत आहे. वादळी वाऱ्याच्या पावसामुळे तालुक्यातील एकूण २७ घरांवरील छपरे उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती तहसील कार्यालयात मिळाली आहे. याबाबतची माहिती मिळताच तसेच कार्याद्वारे तलाठी सर्कल मंडळ तसेच कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली आहे.

पावसामुळे वीट भट्टी वाल्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या वीट भट्टीचा पंचनामा करण्याची मागणी वीट भट्टीचे मालक दीपक धुमाळ यांनी केली आहे.

पावसामुळे मुरबाड तालुक्यात उच्च दाब वाहिनीचे जवळपास १३ विजेचे खांब व २७ लघुदाब वाहिनीचे खांब कोसळले आहेत, तसेच मोठ मोठी झाडे पडल्यामुळे ५० ते ६० ठिकाणी तारा तुटून पडल्या आहे. त्यामुळे मुरबाड तालुक्यातील जवळपास २७००० ग्राहकांचा वीज पुरवठा बाधित झालेला होता. कर्मचारी व अधिकारी यांनी रात्री भर पावसात वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी अथक परिश्रम घेऊन जवळपास २२००० ग्राहकांचा वीज पुरवठा रात्रीच सुरळीत केला. सध्या पडलेले विजेचे खांब उभे करण्यासाठी ७ कंत्राटदार, ६० कामगार, कर्मचारी व अधिकारी सतत कार्यरत असून उर्वरित ग्राहकाचा वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. बदलापूर विभागाचे महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता आनंद काटकर यांनी ही माहिती दिली आहे.

ग्रामीण भागात जवळपास २०तास वीज पुरवठा खंडित झाला होता त्यानंतर मुरबाड महावितरण कंपनीच्या टीमने सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात करून युद्धपातळीवर काम केले त्यावेळी सकाळी ११ वाजता विद्युत पुरवठा सुरू झाल्याची माहिती मुरबाड महावितरण कंपनीचे प्रभारी उपअभियंता राजेंद्र शिर्के यांनी दिली आहे.
Comments
Add Comment

उबाठा गटाचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

रामदास कांबळे यांची युवासेना कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती जाहीर ठाणे: मुंबई महानगरपालिकेतील सायन कोळीवाडा

भारत महासत्ता न होण्यासाठी तरुणाईला अंमली पदार्थांच्या आहारी लोटण्याचा परकीय शक्तींचा डाव

आयआरएस समीर वानखेडे यांचे वक्तव्य कल्याण  : ''आपला भारत देश हा महासत्ता होण्याच्या दिशेने अतिशय विश्वासाने आणि

पोलीस अधिकारी संभाजी देशमुख यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदक

कल्याण : पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय कामगीरीमुळे राज्य गुप्त वार्ता विभागातील पोलीस अधिकारी संभाजी देशमुख

ठाणेकरांनो, पाण्याचा जपून वापरा करा

मंगळवारी ८ तास पाणीपुरवठा बंद डोंबिवली  : केडीएमसीच्या कल्याण (पूर्व) परिसरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील

श्रीकृष्णनाथ पांचाळ ठाण्याचे जिल्हाधिकारी

मुंबई : जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची महाराष्ट्र सरकारने बदली केली असून ठाण्याचे

मध्य रेल्वेची ऐन सकाळी ठप्प झालेली वाहतूक सुरळीत, रेल्वे रुळाला तडे गेल्याने नोकरदारांचे झाले हाल

कर्जत: मध्य रेल्वेची लोकल वाहतूक आज सकाळी काही तासांसाठी विस्कळीत झालेली पाहायला मिळाली. पण रेल्वे प्रशासनाच्या