Shrikant Shinde: शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारताचे शिष्टमंडळ पोहोचले मुस्लिम देशात

अबूधाबी:  शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या नेतृत्वाखालील भारताचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ (All Party Delegation Team), 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) चा संदेश घेऊन मुस्लिम बहुल देश UAEमध्ये पोहोचले.  जिथे जाण्याचा त्यांचा उद्देश यशस्वीरित्या पूर्ण झाला असून, दहशतवाद विरुद्ध पुकारलेल्या या मोहिमेत UAE ची भारतासोबत वचनबद्धता अधोरेखित करण्यात आली आहे.


दहशतवादाविरुद्ध भारताचे धोरण आणि ऑपरेशन सिंदूर यावर चर्चा करण्यासाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळ अबू धाबी, UAE येथे पोहोचले आहेत. त्यांनी युएईच्या अधिकाऱ्यांसोबत फलदायी बैठका घेतल्या, ज्यामध्ये युएईची भारताप्रती असलेली वचनबद्धता अधोरेखित करण्यात आली आहे. युएईने भारताला दहशतवादविरुद्ध कार्यात सहकार्य करण्याचे वचन दिले आहे.


या बैठकीत काय निर्णय झाला, याबद्दल माहिती देताना शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, "आमची UAE समकक्षांसोबतची बैठक ही सार्थकी ठरली आहे. आम्ही संरक्षण समितीचे अध्यक्ष अली रशीद अल नुआमी आणि सहिष्णुता मंत्री शेख नाह्यान यांना भेटलो. UAE दहशतवादाविरुद्ध पूर्ण वचनबद्धतेने भारतासोबत खांद्याला खांदा लावून उभा राहणार आहे. युएईने दिलेला संदेश स्पष्ट होता- आम्ही दहशतवादाविरुद्ध लढ्यात भारतासोबत उभे आहोत, आणि दहशतवादाविरुद्ध दोन हात करत आहोत. मला वाटते की हा एक अतिशय महत्त्वाचा संदेश आहे."


शिवसेना खासदार पुढे म्हणाले की, "UAE मध्ये जी शांतता आणि समृद्धी आहे, तसेच UAE मध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या, सुरक्षित वाटणाऱ्या भारतीयांची संख्या आणि UAE ज्या पद्धतीने पुढे जात आहे, ते पाहता मला असे वाटते की यूएईसारख्या देशाने या कठीण काळात भारतासोबत खांद्याला खांदा लावून उभे राहणे खूप महत्वाचे आहे. UAE च्या समकक्षांकडून संदेश अगदी स्पष्ट आहे की आम्ही या दहशतवादाविरुद्ध तुमच्यासोबत आहोत. कोणत्याही धर्माच्या नावाखाली दहशतवादाला खतपाणी देता येऊ शकत नाही, असे दोन्ही मंत्र्यांच्या संदेशात स्पष्ट झाले आहे. "



'दहशतवादाने मानवतेवर हल्ला केला आहे'- श्रीकांत शिंदे




"दहशतवादाचा संबंध केवळ भारताशी नाही, तर मानवतेशी आहे, आणि हाच संदेश जगभरात पोहोचवणे गरजेचा आहे. दोन्ही देशांसाठी आणि शेजारील राष्ट्राच्या प्रगतीसाठी देखील हे महत्वाचे असून,  भारतावरील हल्ल्याचा निषेध करणारा युएई हा पहिला देश आहे..." असे श्रीकांत शिंदे यांनी पुढे सांगितले.



मुस्लिम बहुल देश अबूधाबीने दहशतवादविरुद्ध दिला हा संदेश




UAE फेडरल नॅशनल कौन्सिलच्या संरक्षण, अंतर्गत आणि परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्ष डॉ. अली रशीद अल नुआमी म्हणाले, "दहशतवादाला कोणताही धर्म किंवा राष्ट्रीयत्व नसते. तो संपूर्ण मानवतेसाठी धोका आहे." ते पुढे असे देखील म्हणाले की, "दहशतवाद हा केवळ एका राष्ट्रासाठी किंवा प्रदेशासाठी नाही तर संपूर्ण जगासाठी धोकादायक आहे. आमचा असा विश्वास आहे की आंतरराष्ट्रीय समुदायाने, विशेषतः संसद सदस्यांनी, एकत्र येऊन चांगले भविष्य घडविण्यासाठी रणनीती आखली पाहिजे आणि एकत्र काम केले पाहिजे. ही बैठक दहशतवादाविरुद्ध एकत्रितपणे लढण्याचा आणि आपल्या नागरिकांसाठी आणि प्रदेशासाठी चांगले भविष्य सुनिश्चित करण्याचा आमचा संकल्प प्रतिबिंबित करते."

Comments
Add Comment

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती

Strait of Hormuz : होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय नाविकांच्या तैनातीला मनाई

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर डीजीएमएचा मोठा निर्णय नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या

Narendra Modi : पंतप्रधान मोदी शुक्रवारी देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला दाखवणार हिरवा झेंडा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी हरियाणातील जिंद रेल्वे स्थानकावरून जिंद आणि सोनीपत दरम्यान

Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे.