धाराशिव, रायगड जिल्ह्याची जबाबदारी दोन लेडी सिंघमकडे

  527

मुंबई: धाराशिव आणि रायगड जिल्ह्यात दोन महिला आयपीएस अधिकाऱ्यांची वर्णी लागली असून, दोन लेडी सिंघम अधिकाऱ्यांकडे या जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच पोलीस प्रशासनाची जबाबदारी देण्यात आलेली आहे.


धाराशिवचे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची बदली झाली असून त्यांच्या जागी सांगली येथील अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांची नियुक्ती झाली आहे. तर रायगड पोलिस अधीक्षकपदी पुण्याच्या पोलिस बल गट क्रमांक 1 मधील आचल दलाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.



राज्यात एकाचवेळी मोठ्या प्रमाणात पोलिस अधिकाऱ्यांची खांदेपालट


राज्यात एकाचवेळी मोठ्या प्रमाणात पोलिस अधिकाऱ्यांची खांदेपालट करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिस दलातील 22 पोलिस अधीक्षक आणि पोलिस उपायुक्त पदांवरील बदल्या करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये धारशिव आणि रायगड जिल्ह्याची जबाबदारी दोन महिला आयपीएसच्या खांद्यावर देण्यात आली आहे. त्यानुसार नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर यांना तुळजापूर ड्रग्ज प्रकरण आणि जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीचं आव्हान असणार आहे. रितू खोकर ह्या पाणीपत जिल्ह्यातील रहिवाशी असून 2018 च्या बॅचमधील युपीएससी उत्तीर्ण उमेदवार आहेत. त्यांचे वडिल गावचे माजी सरपंच होते.


तर धाराशिवचे माजी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांना नवीन नियुक्ती मिळालेली नाही. त्यांना स्वतंत्रपणे नियुक्ती देण्यात येणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.


तसेच रायगड पोलिस अधीक्षकांची अचानक बदली करून त्याजागी आचल दलाल यांची नियुक्ती करण्यात आली असल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. तर  रायगडचे माजी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची रायगड नंतर आता अहिल्यानगरच्या पोलिस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.


राज्यातील अधिकाऱ्यांच्या या मोठ्या खांदेपालट प्रकरणांमध्ये,  कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे पोलिस दलात उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. तर सातारचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांची बृहन्मुंबई पोलिस दलात उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत

Pune Airport: प्रवाशांना घेऊन विमान पुण्यात तर आलं, पण सामान मागेच राहीलं!

स्पाइसजेटच्या दुबई-पुणे विमानाने इंधन भारामुळे प्रवाशांचे सामान न घेताच पुण्यात लँडिंग केले.  पुणे:  दुबईहून