जामखेड तालुक्यात पुन्हा जोरदार पावसाच्या सरी

जामखेड : जामखेड तालुक्यात पुन्हा जोरदार पावसाच्या सरी व विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाल्याने तालुक्यातील जवळा, हाळगाव परिसरात फळबागाचे नुकसान झाले आहे.
पावसामुळे तालुक्यात बीज गायब झाली आहे. मे महिन्यात तब्बल पाच दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यात शेती, फळबागा आणि जनजीवन पावर परिणाम झाला आहे. आज दिवसभरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक भागांत झाडे उन्मळून पडली असून काही गावांचा वीजपुरवठाही खंडित झाला आहे. शेतात ठिकठिकाणी पाणी साचल्याचे दृश्य दिसत आहे. खासकरून फळबागांना मोठा तडाखा बसला असून जवळा, हळगाव, पिंपरखेड, फक्राबाद, मतेवाडी परिसरातील शेतकऱ्यांचे लिंबोणीच्या झाडे उन्मळून पडली आहेत.यामुळे बागांचे मोठे नुकसान झाले आहे.

कांदा उत्पादकांनाही या पावसाचा फटका बसला आहे.चौंडी गावात अक्षय सत्यवान सोनवणे यांच्या चालू असलेल्या घरकुलाच्या बांधकामाची भिंत कोसळली. या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी शासकीय मदतीची मागणी केली आहे.प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये