जामखेड तालुक्यात पुन्हा जोरदार पावसाच्या सरी

  49

जामखेड : जामखेड तालुक्यात पुन्हा जोरदार पावसाच्या सरी व विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाल्याने तालुक्यातील जवळा, हाळगाव परिसरात फळबागाचे नुकसान झाले आहे.
पावसामुळे तालुक्यात बीज गायब झाली आहे. मे महिन्यात तब्बल पाच दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यात शेती, फळबागा आणि जनजीवन पावर परिणाम झाला आहे. आज दिवसभरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक भागांत झाडे उन्मळून पडली असून काही गावांचा वीजपुरवठाही खंडित झाला आहे. शेतात ठिकठिकाणी पाणी साचल्याचे दृश्य दिसत आहे. खासकरून फळबागांना मोठा तडाखा बसला असून जवळा, हळगाव, पिंपरखेड, फक्राबाद, मतेवाडी परिसरातील शेतकऱ्यांचे लिंबोणीच्या झाडे उन्मळून पडली आहेत.यामुळे बागांचे मोठे नुकसान झाले आहे.

कांदा उत्पादकांनाही या पावसाचा फटका बसला आहे.चौंडी गावात अक्षय सत्यवान सोनवणे यांच्या चालू असलेल्या घरकुलाच्या बांधकामाची भिंत कोसळली. या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी शासकीय मदतीची मागणी केली आहे.प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
Comments
Add Comment

MSBTE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकाल रोखून ठेवलेल्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी - लोढा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने

Daund Yawat Tension: ५०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १७ जणांना अटक, कलम १६३ लागू...

पुण्यातील जातीय हिंसाचारावर कारवाई पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील यवत गावात शुक्रवारी एका सोशल मीडिया

महाराष्ट्रात ४.१७ कोटींची बेनामी मालमत्ता उघड!

मुंबई : महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) यावर्षी भ्रष्ट लोकसेवक आणि खाजगी व्यक्तींविरुद्ध चार

पतीची न्यायालयीन कोठडीत रवानगी, रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट

पुणे : पुण्यातील खराडी परिसरातल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. घटनास्थळावरुन अमली पदार्थ जप्त केले. या

‘महादेवी हत्तिणी’च्या ‘नांदणी’वापसीचा मार्ग मोकळा, पण कायद्याचा अडसर

कोल्हापूर : संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या महादेवी हत्तिणीला जनभावनांचा आदर करत ‘वनतारा’