कृषी उत्पन्न बाजार समितीची ५०० कोटींची आर्थिक उलाढाल

शेतमालाची आवक वाढली : साहेबराव रोहोम


कोपरगाव : येथील कृषि उत्प़न्ऩ बाजार समिती मध्ये आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ५०० कोटीचे वर आर्थिक उलाढाल झाली असुन, बाजार समितीला ५१ कोटीचे उत्प़न्ऩ झालेले आहे. बाजार समितीच्या उत्पन्नात सातत्याने वाढ होत आहे. आजवरच्या वाटचालीत विक्रमी उत्प़न्ऩ व नफा झालेला आहे. माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे, आमदार आशुतोष काळे, विवेक कोल्हे तसेच राजेश परजणे, नितीन औताडे यांचे मार्गदर्शन व नेतृत्वाखाली सभापती साहेबराव रोहोम, उपसभापती गोवर्धन परजणे यांचे अधिपत्याखाली संचालक कार्यरत असुन ते शेतकरी हित लक्षात घेऊन शेतकरी बांधवांना सर्व सुविधा उपलब्ध़ करुन देण्यासाठी सदैव तत्प़र आहेत.


बाजार समितीच्या मुख्य़ मार्केट मध्ये व उपबाजार आवार तिळवणी येथे शेतक-यांचे शेतमालाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी बांधव इतरत्र न जाता येथेच आपला शेतमाल विक्रीसाठी आणतात. कोपरगांव तालुक्याबरोबरच शेजारील वैजापुर, राहाता, येवला, श्रीरामपुर व सिन्ऩर या तालुक्यातील शेतकरी बाजार समितीत शेतमाल विक्रीस आणतात.सन २०२४-२५ या वर्षात २१ लाख क्विंटल आवक झालेली आहे.तसेच उपबाजार आवार मोर्विस धामोरी फाटा या ठिकाणी लवकरच कांदा व भुसार लिलाव सुरू होणार असुन संस्थेचा कारभार अतिशय पारदर्शक व काटकसरी पध्दतीने सुरू असुन शेतकरी, व्यापारी व सर्व बाजार घटकांसाठी जास्तीत जास्त़ सुविधा उपलब्ध़ करून देणार आहे. भाजीपाला मार्केट येथे बाजार समितीने ११० × ५० साईजचे शेतकरी भाजीपाला लिलावाकरीता सेल हॉल बांधकाम पुर्ण केलेले असुन भाजीपाला धुण्यासाठी ओटा, पाणी व्यवस्था, टॉयलेट ब्लॉक व लाईट सुविधा केलेली आहे.जनावरे बाजार येथे बाजार समितीने टॉयलेट, पाणी आहाळ -४, जनावरे चढ उतार करण्यासाठी धक्का, जनावरे बांधण्यासाठी दावणी तसेच पार्किंग परिसर मुरूमीकरण केला आहे. जनावरे बांधण्यासाठी शेड व्यवस्था व शेतकरी, व्यापारी यांचेसाठी जारव्दारे पिण्याचे पाण्याची व्यवस्था केली आहे. तेथील रस्ता डांबरीकरण करणेचे काम मंजुर असुन ते सुरू होणार आहे.


बाहेरील राज्यातील व स्थानिक व्यापारी यांचे स्प़र्धेतुन शेतक-यांच्या शेतमालाला वाजवी किंमत मिळते तसेच चोख वजनमाप, काटला नाही, रोख पेमेंट यामुळे बाजार समितीवर शेतक-यांचा विश्वास असल्यामुळे बाजार समितीमध्ये आवक मोठया प्रमाणात होत आहे. शेतक-यांनी आपला शेतमाल कोपरगांव बाजार समिती व उपबाजार आवार तिळवणी येथे विक्रीस आणुन आपला फायदा करुन घ्यावा असे आवाहन सचिव एन.एस.रणशूर यांनी केले आहे.

Comments
Add Comment

‘एमयुएचएस’ च्‍या कुलगुरूपदी डॉ. अजय चंदनवाले

नाशिक : राज्‍य शासनाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांची नियुक्‍ती ‘महाराष्‍ट्र

“मोदी मिशन हे पुस्तक पुढच्या पिढीला प्रेरणा देणारं”, 'मोदीज् मिशन' मधील काही भाग पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना

मुंबई :“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘मोदीज् मिशन’ हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे आणि संग्रहित

मुंबईनजिक बांधणार देशातील सर्वाधिक लांबीची भिंत! पण यामागचे कारण काय?

मुंबई : पालघर जिल्ह्यात बांधले जाणारे वाढवण बंदर हा केंद्र सरकारचा एक खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. या बंदरात

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा

पुण्याच्या NDA मध्ये गूढ! एकाच आठवड्यात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू: नेमकं चाललंय तरी काय?

पुणे : पुण्यातील खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या असलेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (NDA) पोहण्याचा सराव करत

मुंबई पोलिसांचा दाऊदच्या टोळीला मोठा झटका! ड्रग्सचा कारखाना सांगलीत तर मास्टरमाइंड दुबईतून पकडला

मुंबई : मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने (गुन्हे शाखेने) एक मोठे ड्रग्सचे आंतरराष्ट्रीय जाळे पकडून दाऊद