मुंबईतील नागरी सुविधांची दुरवस्था

मुंबई :मुंबई महापालिकेच्या कोट्यवधींच्या अर्थसंकल्पाच्या सावलीत राहणाऱ्या सामान्य मुंबईकरांसाठी नागरी सेवा अजूनही मोठ्या प्रमाणात अपुऱ्या आहेत. प्रजा फाऊंडेशनने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून पाणी, सांडपाणी, शौचालय, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण यासारख्या मूलभूत सेवांची दुरवस्था समोर आली आहे. अहवालानुसार, मुंबईत दर चार सार्वजनिक शौचालयांमागे फक्त एक शौचालय महिलांसाठी आहे. स्वच्छ भारत अभियानानुसार एका शौचालयाचा वापर ३५ पुरुष आणि २५ महिलांनी होणे अपेक्षित आहे, मात्र मुंबईत एका शौचालयावर सरासरी ८६ लोकांचा भार आहे. तसेच ६९% शौचालयांत पाणी आणि ६०% शौचालयांत वीज नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.


मुंबईत दररोज ४,३७० एमएलडी पाणी मिळते, पण गळतीमुळे केवळ ३,९७५ एमएलडी वापरासाठी उरते. झोपडपट्टीतील रहिवाशांना दरडोई केवळ ४५ एलपीसीडी पाणी मिळते, तर शहरातील उर्वरित भागात १३५ एलपीसीडी. झोपडपट्टीवासीयांना उर्वरित पाणी टँकरद्वारे विकत घ्यावे लागते, ज्यासाठी दरमहा सुमारे रु. ७५० खर्च येतो. मुंबईतील आठ सांडपाणी प्रक्रिया केंद्रांपैकी सहा केंद्रे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांवर अपयशी ठरली आहेत.२०२४ मध्ये मुंबईत २४.३७ लाख मेट्रिक टन कचरा संकलित झाला. देवनार आणि कांजूरमार्ग डंपिंग ग्राउंडवरच याची विल्हेवाट लावली जाते. २०२४ मध्ये नागरी सुविधांसंदर्भात एकूण १.१५ लाख तक्रारी नोंदवण्यात आल्या असून, २०१५ च्या तुलनेत यात ७०% वाढ झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक तक्रारी कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा आणि प्रदूषण विषयक होत्या. प्रजाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हस्के म्हणाले, की "मुंबई महापालिकेचा भव्य अर्थसंकल्प असूनही सेवांचे वितरण अपुरे आहे.

Comments
Add Comment

X अर्थात Twitter बंद पडलं, युझर त्रस्त

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील