मीरा-भाईंदरची नालेसफाई ३१ मे पूर्वी पूर्ण होणार

  40

भाईंदर :पाऊस अति पडला तरी किंवा अजिबात पडला नाही तरी नुकसान करतो. त्यामुळे पावसाळा म्हटला की सामान्य नागरिकांच्या पोटात गोळाच येतो. आधीच्या वर्षाच्या अनुभवावरून शाहणे होऊन पुढील वर्षीचा त्रास टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असतात. त्यातील महत्त्वाचे काम असते नालेसफाईचे. पावसाळयात शहरात पाणी साचू नये यासाठी नालेसफाई योग्य पद्धतीने व वेळेत पूर्ण होण्यासाठी महापालिका प्रशासनाने एप्रिलपासून सुरू केलेले काम जवळजवळ ६५ टक्के पूर्ण झाले असून ३१ मे पूर्वी ते पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. पालिकेने शहरातील १५५ नाले सफाईसाठी ४ कोटी रुपयांची तरतूद केली असून शहरातील ४५ सखल भागांसाठी सक्शन पंप तैनात केले आहेत.


मीरा-भाईंदर शहरात लहान मोठे १५५ नाले आहेत. त्यात मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दिल्ली दरबार हॉटेल जवळ, वेस्टर्न पार्क, पंजाब फौंड्री, मुंशी कंपाऊंड, लक्ष्मी पार्क यांचा प्रामुख्याने समावेश आहे. महापालिकेने २० एप्रिलपासून नियोजनबद्ध पद्धतीने नालेसफाई करण्यास सुरुवात केली होती. कनिष्ठ अभियंता, स्वच्छता निरीक्षक दर्जाच्या ११ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली नालेसफाईचे काम सफाई कामगार पोकलन, बोट पोकलन, जेसीबी, डंपर इत्यादी साहित्यासह करत आहेत. अतीवृष्टी झाल्यावर शहरातील सखल भागात पाणी भरत असते. त्यासाठी प्रशासनाने ४५ सक्शन पंप तैनात केलेले आहेत.

Comments
Add Comment

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, नगरसेवक संख्येत वाढ नाहीच, यंदाही 131 नगसेवक

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आज ठाणे महानगरपालिकेची

Bhiwandi Accident : भिवंडीत खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचे प्राण गेले, जबाबदार कोण?

भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड

ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्यात शिरलं पाणी

ठाण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पावसाचा फटका गणपती मूर्तीला देखील बसला

पावसामुळे ठाण्यात ४ महिन्यांत २० जणांचा बळी!

ठाणे: गेल्या चार महिन्यांत ठाणे जिल्ह्यात पावसामुळे संबंधित घटनांमध्ये किमान २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुरू केले ‘लाडकी सून’ अभियान

ठाणे: 'लाडकी बहीण' योजनेच्या यशामुळे उत्साहित होऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी

भिवंडीत साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आला स्पायडरमॅन !

ठाणे : भिवंडीत भाजी मार्केटमध्ये साचलेले पाणी काढण्यासाठी चक्क स्पायडरमॅन आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर