मीरा-भाईंदरची नालेसफाई ३१ मे पूर्वी पूर्ण होणार

  33

भाईंदर :पाऊस अति पडला तरी किंवा अजिबात पडला नाही तरी नुकसान करतो. त्यामुळे पावसाळा म्हटला की सामान्य नागरिकांच्या पोटात गोळाच येतो. आधीच्या वर्षाच्या अनुभवावरून शाहणे होऊन पुढील वर्षीचा त्रास टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असतात. त्यातील महत्त्वाचे काम असते नालेसफाईचे. पावसाळयात शहरात पाणी साचू नये यासाठी नालेसफाई योग्य पद्धतीने व वेळेत पूर्ण होण्यासाठी महापालिका प्रशासनाने एप्रिलपासून सुरू केलेले काम जवळजवळ ६५ टक्के पूर्ण झाले असून ३१ मे पूर्वी ते पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. पालिकेने शहरातील १५५ नाले सफाईसाठी ४ कोटी रुपयांची तरतूद केली असून शहरातील ४५ सखल भागांसाठी सक्शन पंप तैनात केले आहेत.


मीरा-भाईंदर शहरात लहान मोठे १५५ नाले आहेत. त्यात मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दिल्ली दरबार हॉटेल जवळ, वेस्टर्न पार्क, पंजाब फौंड्री, मुंशी कंपाऊंड, लक्ष्मी पार्क यांचा प्रामुख्याने समावेश आहे. महापालिकेने २० एप्रिलपासून नियोजनबद्ध पद्धतीने नालेसफाई करण्यास सुरुवात केली होती. कनिष्ठ अभियंता, स्वच्छता निरीक्षक दर्जाच्या ११ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली नालेसफाईचे काम सफाई कामगार पोकलन, बोट पोकलन, जेसीबी, डंपर इत्यादी साहित्यासह करत आहेत. अतीवृष्टी झाल्यावर शहरातील सखल भागात पाणी भरत असते. त्यासाठी प्रशासनाने ४५ सक्शन पंप तैनात केलेले आहेत.

Comments
Add Comment

पोलीस अधिकारी संभाजी देशमुख यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदक

कल्याण : पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय कामगीरीमुळे राज्य गुप्त वार्ता विभागातील पोलीस अधिकारी संभाजी देशमुख

ठाणेकरांनो, पाण्याचा जपून वापरा करा

मंगळवारी ८ तास पाणीपुरवठा बंद डोंबिवली  : केडीएमसीच्या कल्याण (पूर्व) परिसरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील

श्रीकृष्णनाथ पांचाळ ठाण्याचे जिल्हाधिकारी

मुंबई : जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची महाराष्ट्र सरकारने बदली केली असून ठाण्याचे

मध्य रेल्वेची ऐन सकाळी ठप्प झालेली वाहतूक सुरळीत, रेल्वे रुळाला तडे गेल्याने नोकरदारांचे झाले हाल

कर्जत: मध्य रेल्वेची लोकल वाहतूक आज सकाळी काही तासांसाठी विस्कळीत झालेली पाहायला मिळाली. पण रेल्वे प्रशासनाच्या

सॅनिटरी नॅपकिन बनवणारी मशीन भंगारमध्ये

सहा वर्षे धूळ खात पडून भाईंदर : महिलांच्या मासिक पाळी काळात स्वच्छता वाढवण्यासाठी तसेच महिलांना रोजगार उपलब्ध

दूषित पाण्यामुळे डोंबिवलीकरांचे आरोग्य धोक्यात

ठाणे  : डोंबिवली पश्चिमेतील गृहनिर्माण सोसायट्यांना दूषित व पिवळसर रंगाचा पाणीपुरवठा होत असून, यामुळे नागरिक