Nashik Jindal Company Fire : जिंदाल कंपनीला भीषण आग, जीवितहानी टळली

इगतपुरी : इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव शिवारामध्ये असलेल्या जिंदाल कंपनीला मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या अग्नी तांडवा मध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे . सुमारे चार तासानंतर या आजी वरती काबू आणला गेला असला तरी प्रत्यक्षामध्ये अजूनही ही आग या ठिकाणी दुमसत आहे.


याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मुंबई-नाशिक महामार्गावरील मुंडेगाव शिवारात असलेल्या जिंदाल कंपनीच्या परिसरात काल (मध्यरात्री) दीड वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे समजते. या अग्नि तंडवामुळे परिसरामध्ये चांगलीच खळबळ उडाली आजूबाजूच्या गावातील नागरिक या ठिकाणी दाखल झाले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर इगतपुरी चे तहसीलदार, इगतपुरी व वाडीवरे पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व इतर सरकारी यंत्रणा या ठिकाणी दाखल झाली.



कंपनीच्या चार नंबर गेटच्या मागील शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर रॉ मटेरियल साठवलेले होते. याच भागातून आगीची सुरुवात झाली असून पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. आगीमुळे आकाशात धुराचे लोट पसरले होते, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.घटनेची माहिती मिळताच इगतपुरी नगर परिषद, महिंद्रा अँड महिंद्रा आणि नाशिक महापालिकेच्या सिडको मुख्यालय आणि पंचवटी विभागीय कार्यालय येथून अग्निशमन दलाच्या ६ ते ७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले.


सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. आगीवर सुमारे चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर काबू आणली गेली नंतर अजूनही ही आग दुमसत असल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले असून या ठिकाणी अग्निशमन दलाचे बंब कायम ठेवण्यात आलेले आहेत.आग लागल्यामुळे कंपनीच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू असून सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी तळ ठोकून आहेत.

Comments
Add Comment

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

जगभरात लोकप्रिय ‘रेडिओ सिलोन’ची शताब्दी

‘बिनाका गीतमाला’सह गाजलेले अनेक कार्यक्रम कोलंबो : भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात अजरामर ठरलेल्या ‘रेडिओ

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ