Nashik Jindal Company Fire : जिंदाल कंपनीला भीषण आग, जीवितहानी टळली

  237

इगतपुरी : इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव शिवारामध्ये असलेल्या जिंदाल कंपनीला मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या अग्नी तांडवा मध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे . सुमारे चार तासानंतर या आजी वरती काबू आणला गेला असला तरी प्रत्यक्षामध्ये अजूनही ही आग या ठिकाणी दुमसत आहे.


याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मुंबई-नाशिक महामार्गावरील मुंडेगाव शिवारात असलेल्या जिंदाल कंपनीच्या परिसरात काल (मध्यरात्री) दीड वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे समजते. या अग्नि तंडवामुळे परिसरामध्ये चांगलीच खळबळ उडाली आजूबाजूच्या गावातील नागरिक या ठिकाणी दाखल झाले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर इगतपुरी चे तहसीलदार, इगतपुरी व वाडीवरे पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व इतर सरकारी यंत्रणा या ठिकाणी दाखल झाली.



कंपनीच्या चार नंबर गेटच्या मागील शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर रॉ मटेरियल साठवलेले होते. याच भागातून आगीची सुरुवात झाली असून पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. आगीमुळे आकाशात धुराचे लोट पसरले होते, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.घटनेची माहिती मिळताच इगतपुरी नगर परिषद, महिंद्रा अँड महिंद्रा आणि नाशिक महापालिकेच्या सिडको मुख्यालय आणि पंचवटी विभागीय कार्यालय येथून अग्निशमन दलाच्या ६ ते ७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले.


सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. आगीवर सुमारे चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर काबू आणली गेली नंतर अजूनही ही आग दुमसत असल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले असून या ठिकाणी अग्निशमन दलाचे बंब कायम ठेवण्यात आलेले आहेत.आग लागल्यामुळे कंपनीच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू असून सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी तळ ठोकून आहेत.

Comments
Add Comment

बैलपोळाच्या दिवशी नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गवसला

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील एक युवक बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी पेढी नदीवर गेला असता, अचानक पाय

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली

छत्रपती संभाजीनगरला २४x७ शाश्वत पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा; २६ द.ल.ली. जलशुद्धीकरण केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुढील २५-३० वर्षे शहराच्या अपेक्षित

महाराष्ट्रात गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा मान; घरबसल्या दर्शनासाठी विशेष पोर्टल सुरू

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव, घरगुती गणेशोत्सव, महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला आता राज्याने प्रथमच महाराष्ट्र

Ajit Pawar: मतचोरीच्या आरोपांवर अजितदादांचा जोरदार हल्लाबोल, म्हणाले "फेक नरेटीव्ह...

मुंबई: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मतदानावरून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले,  त्यानंतर देशभरात वातावरण

महाराष्ट्रातील १ कोटी बहीणींना लखपती दीदी करणार

मुंबई : लखपती दीदींसाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रात