UPSC ची फसवणूक करणाऱ्या पूजाला खून केला नाही म्हणून जामीन

  48

नवी दिल्ली : UPSC (Union Public Service Commission) अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या पूज खेडकरला सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिला आहे. पूजावर फसवणुकीचा आरोप आहे याची नोंद घेताना तिने हत्या केलेली नाही अशी टिप्पणी करत सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.

पूजाने कोणता गंभीर गुन्हा केला आहे ? ती ड्रग्ज माफिया किंवा अतिरेकी नाही, तिने हत्या केलेली नाही, ती एनडीपीएस कायद्यांतर्गत आरोपी नाही; अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर करताना केली. पूजावर जे आरोप आहेत त्यांचा तपास करण्यासाठी एखादी व्यवस्था अर्थात सॉफ्टवेअर हवे. यामुळे निश्चित वेळेत तपास करुन पुढील कारवाई करता येईल. पूजाने आतापर्यंत सर्व काही गमावले आहे. पूजाला आता कुठेही नोकरी मिळणार नाही; असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बीव्ही नागरत्ना आणि सतीश चंद्र शर्मा म्हणाले.

नागरी सेवा परीक्षेत अपंगत्व आणि ओबीसी आरक्षणाचा गैरफायदा घेणे. आरक्षणाच्या तरतुदींचा गैरफायदा घेण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाची फसवणूक करणारी माहिती सादर करणे; असे गंभीर आरोप पूजा खेडकरवर आहेत. या प्रकरणात सुरू असलेल्या तपासाला पूजाने सहकार्य केलेले नाही. ही कारणं देत दिल्ली पोलिसांच्या वकिलाने पूजाच्या अटकपूर्व जामिनाला तीव्र विरोध केला. यावर बोलताना प्रकरणातील तथ्ये आणि परिस्थिती लक्षात घेता, दिल्ली उच्च न्यायालयाने पूजाला जामीन मंजूर करायला हवा होता असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने पूजा खेडकरला तपास कामात सहकार्य करण्याचे निर्देश दिले.

पूजा खेडकरने आरक्षणाचे फायदे मिळवण्यासाठी २०२२ च्या यूपीएससी परीक्षेच्या अर्जात चुकीची माहिती दिल्याचा आरोप आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) दाखल केलेल्या लेखी तक्रारीच्या आधारे जुलै २०२४ मध्ये खेडकरविरुद्ध बनावट कागदपत्रे, फसवणूक, आयटी कायद्याचे उल्लंघन आणि अपंगत्व कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंदविण्यात आला आहे.

बनावट कागदपत्रे तयार करण्याकरिता मदत करणाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी पूजाची काही काळ कोठडीत चौकशी आवश्यक आहे, असे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने पूजाने हत्या केलेली नाही, अशी टिप्पणी करत तिला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
Comments
Add Comment

काँग्रेस काळजी नक्षलवाद्यांची, भाजपाकडे केली शस्त्रसंधीची मागणी

नवी दिल्ली : भारताला नक्षलवादमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या नेतृत्वात देशव्यापी मोहीम सुरू आहे. सर्व

Longest Tunnel T50 Vande Bharat : जम्मू-श्रीनगर-बारामुला रेल्वेमार्गाचे स्वप्न पूर्ण! T-५० मधून सुसाट धावली वंदे भारत; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला प्रवास

जम्मू-कश्मीर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी जम्मू-कश्मीरमधील कटरा (Katra) आणि श्रीनगर (Shrinagar) 

काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकमध्ये दलितांवर अत्याचार, तीन दलित मुलांना खांबाला बांधून बेदम चोपले

गडग : काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकमध्ये दलितांवर अत्याचार होत असल्याचे वृत्त आहे. कर्नाटकमधील गडग

आरसीबीच्या मार्केटिंग प्रमुखासह चौघांना अटक

बंगळूरु चेंगराचेंगरी प्रकरणी बंगळूरु: बंगळूरुमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी

पंतप्रधान मोदींना कॅनडाकडून जी-७ संमेलनाचे आमंत्रण

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना कॅनडाकडून जी-७ संमेलनाचे आमंत्रण देण्यात आले आहे. कॅनडाचे

Indus Water Treaty: पाकिस्तानची भारताला पाणी देण्याची विनंती; चार वेळा पाठवले पत्र

नवी दिल्ली: पाकिस्तानने भारताला चार वेळा पत्र लिहून सिंधू पाणी करार (IWT) स्थगित करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार