अमृत भारत स्थानकांमध्ये उत्तर प्रदेशचा सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा प्रतिबिंबित

गोरखपूर: भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येत असून या अंतर्गत व्यावसायिक आणि नागरिक- केंद्रित सेवांना प्रोत्साहन दिले जाईल. देशभरात अशी १ हजार ३०० हून अधिक रेल्वे स्थानके बांधली जात आहेत. या योजनेअंतर्गत, रेल्वे स्थानके ही शहर केंद्रे म्हणून विकसित केली जात आहेत.

अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत, १०३ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात आला असून, उत्तर प्रदेशातील १९ स्थानके असून त्यात बलरामपूर, सिद्धार्थनगर, स्वामी नारायण छापिया, मैलानी, गोला, गोकर्णनाथ, रामघाट हॉल्ट, इज्जतनगर, बरेली सिटी, उजनी, हाथरस सिटी, सुरेमानपूर, बिजनौर, सहारनपूर, फतेहाबाद, गोवर्धन, इदगाह आग्रा जंक्शन, पोखरायण, गोविंदपुरी यांचा पुनर्विकास करण्यात आला. १९० कोटींहून अधिक खर्चाने ही विकसित स्थानके स्थानिक संस्कृती आणि उत्कृष्ट प्रवासी सुविधांचे मिश्रण आहेत. या स्थानकांमध्ये भव्यता असून यांची प्रवेशद्वार, आकर्षक दर्शनी भाग, उंच दिवे, आधुनिक प्रतीक्षालय, तिकीट काउंटर, आधुनिक शौचालय आणि दिव्यांगजनांसाठी सुलभ रॅम्पसारख्या सुविधा विकसित केल्या आहेत.

सिद्धार्थनगर स्टेशनवर बौद्ध संस्कृतीची झलक दिसते, जिथून देश-विदेशातील लोक भेट देऊ शकतात. सरयू नदीच्या अयोध्या काठावर असलेल्या रामघाट हॉल्ट स्टेशनवर प्रवाशांसाठी १,१६४ चौरस मीटरची एक नवीन बहुउद्देशीय इमारत केली आहे. छपिया स्टेशनला स्वामी नारायण मंदिर म्हणूनही ओळखले जाते. सहारनपूर स्टेशन हे शाकंभरी देवी मंदिर म्हणून ओळखले जाते त्याप्रमाणे अनुकूल डिझाइन केले गेले आहे. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत, उत्तर प्रदेश आता त्या दिशेने वाटचाल करत असून जिथे प्रत्येक स्टेशन स्थानिक संस्कृती, आधुनिक वास्तुकला आणि आणि चांगल्या प्रवासी सुविधांचे एक उत्कृष्ट उदाहरण ठरणार आहे.
Comments
Add Comment

Krishna controversy : 'श्रीकृष्ण मुस्लिम होता', मौलानाचा दावा; व्हायरल व्हिडिओवरून नवा वाद, हिंदू संघटनांकडून कारवाईची मागणी

श्रीकृष्णावरून वाद; हिंदू संघटना संतापली मथुरा : श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण न्यायालयात प्रलंबित असतानाच एका

Supreme Court on Three-Language Policy : त्रिभाषा धोरणावर सर्वोच्च न्यायालयाची तीव्र नाराजी; 'नववीपासून नवी भाषा म्हणजे विद्यार्थ्यांवर अनावश्यक ताण'

नवी दिल्ली : इयत्ता नववीपासून त्रिभाषा धोरण लागू करण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी

Bay of Bengal Tragedy : बंगालच्या उपसागरात रोहिंग्यांच्या दोन बोटी उलटल्या; ५०० हून अधिक जण मृत्युमुखी पडल्याची भीती

ढाका/यांगून : म्यानमारमधून पलायन करणाऱ्या रोहिंग्या निर्वासितांवर मोठे संकट कोसळले आहे. बंगालच्या उपसागरात

Pimple Solution : चेहऱ्यावर वारंवार पिंपल्स येतात? 'या' सोप्या उपायांनी मिळवा स्वच्छ, नितळ त्वचा

पिंपल्स का

ISRO scientists resign : मोठी बातमी! गगनयानसारख्या मोहिमांवर काम करणाऱ्या १०० हून अधिक शास्त्रज्ञांनी सोडली 'इस्रो'; राजीनाम्यांचे नियम आता होणार कडक!

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (ISRO) एका मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे. गगनयानसारख्या देशाच्या अत्यंत

Shri Jagannath Rath Yatra 2026 : आजपासून श्रीजगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ! २४ जुलैपर्यंत रंगणार भक्तिमय सोहळा; जाणून घ्या महत्त्व, परंपरा आणि संपूर्ण वेळापत्रक

पुरी (ओडिशा): सनातन धर्मातील सर्वात पवित्र आणि भव्य उत्सवांपैकी एक असलेल्या श्रीजगन्नाथ रथयात्रेला आज (१६ जुलै)