गच्चीवर गेली आणि एका फोटोसाठी गमावला जीव!

मुंबई : ढगाळ आकाश, थंड वाऱ्याची झुळूक आणि संध्याकाळचा रम्य क्षण... फोटोसाठी अगदी योग्य वेळ! पण त्या एका क्षणात एका कुटुंबाचे संपूर्ण आयुष्यच कोसळून गेले. दहिसरच्या मिस्किटा इमारतीत रहाणारी १६ वर्षांची जान्हवी चावला गच्चीवर फोटो काढण्यासाठी गेली होती. पण फोटो काढत असताना ती त्या गच्चीवरून खाली पडली आणि अखेरचा श्वास घेतला.


जान्हवीने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. तिचं आयुष्य पुढे किती उजळणार होतं, किती स्वप्नं उराशी बाळगलेली होती. पण रविवारी संध्याकाळी, ती गच्चीवर गेली आणि तिथून थेट सातव्या मजल्यावरून खाली पडली. फोटो काढत असताना अचानक तिचा तोल गेला, आणि क्षणभरात काळाने तिला गाठलं.



तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी हताशपणे तिचा मृत्यू घोषित केला. विशेष म्हणजे जान्हवीचे वडील त्या क्षणी इमारतीखालीच होते. त्यांच्या डोळ्यांसमोरच त्यांच्या लेकीचं हे भयानक अपघाती अंत घडलं.


या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी सुरू केली असून, नेमकं काय घडलं याचा शोध सुरू आहे.


जान्हवीचं हसतं-खेळतं आयुष्य, एका क्षणात असं संपेल, यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. एका फोटोसाठी गेलेली जान्हवी पुन्हा कधीच घरात परतली नाही... आणि मागे राहिलं ते फक्त अश्रूंचं आणि आठवणींचं गाठोडं.

Comments
Add Comment

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा, कोहली-रोहितचे पुनरागमन निश्चित!

मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर्स रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहेत. रोहित

शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?

मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची

BMC ची मोठी भेट: आता हॉस्पिटलमध्ये 'मोफत' आणि 'कॅशलेस' उपचार!

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने (BMC) आरोग्याच्या सोयी चांगल्या करण्यासाठी एक खूप चांगली गोष्ट सुरू केली आहे. या नव्या

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी

मुंबई : राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल

मुंबई महापालिकेत सहायक आयुक्तांची खांदेपालट, कुणाची कुठे बदली, कुणाची कुठे वर्णी...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा सहायक आयुक्तांची खांदेपालट करून विद्यमान सहायक आयुक्तांची

'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस ‘मातोश्री’त का ठेवला ?' नार्को टेस्ट कराच!

बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रावरुन नवा वाद, रामदास कदमांनी दिली धक्कादायक माहिती मुंबई : गोरेगावच्या नेस्को