Rain Alert: मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा! राज्यातील ‘या’ भागात यलो अलर्ट

आज राज्यात वादळी वाऱ्यासह वळिवाच्या पावसाचा तडाखा, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा 


मुंबई : सध्या संपूर्ण राज्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई तसेच मुंबई लगत इतर परिसरात देखील पावसाच्या हलक्या सरी बरसत असल्या, तरी पुढील तीन दिवस  मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवाखान खात्यातून वर्तवण्यात आली आहे.


मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबईतील किमान तापमान 20 मे रोजी 26 अंश सेल्सिअस राहील. तर मुंबईतील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. मुंबईत ढगाळ वातावरण राहील.



राज्यात वळिवाच्या पावसाचा तडाखा


राज्यातील काही भागात वळिवाच्या पावसाने तडाखा दिला आहे. यामुळे काही प्रमाणात फळबागांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, पावसामुळे तापमानात घट झाली असली तरी उकाडा मात्र कायम आहे. सकाळी ११ ते १२ पर्यंत उन्हाचा ताप आणि दुपारनंतर वादळी पाऊस असे वातावरण अनेक भागात आहे.  आज कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पुन्हा पाऊस हजेरी लावणार आहे. वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होईल. या पट्ट्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मे महिन्यातच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मान्सूनपूर्वी शेतीची मशागत खोळंबली आहे. पण यामुळे रान आबादानी झाले आहे.



राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता 


पुण्यात 20 मे रोजी किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहील. तर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. पुण्यात 20 मे रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, असा अंदाज आहे. कोल्हापूर, सातारा, धाराशिव, सांगली, सोलापूर, लातूर, सिंधुदुर्ग आणि पुण्यालाही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. इथे विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.



या भागांसाठी यलो अलर्ट 


छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार या भागांत मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूरमध्ये तापमान साधारणपणे 28 ते 42 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. इथे वेगाने वारे वाहतील. तसेच विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.



आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन 


हवामानात बदल होत असल्याने नागरिकांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. तसेच शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेणे आवश्यक आहे. राज्यासाठी 20 मे नंतरचे काही दिवस पावसाच्या दृष्टीने महत्वाचे ठरतील. पुढच्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर अधिक वाढू शकतो. त्यामुळे सतर्क राहण्याची सूचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


Comments
Add Comment

Nanded Suicide : स्टेटस ठेवलं अन् शिक्षकाची दोन मुलांसह आत्महत्या; पोलीस तपास सुरु

नांदेडमध्ये शिक्षकाची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या; व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे खळबळ नांदेड : नांदेड (Nanded) जिल्ह्यातून

Jalgaon : छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील उमाळा घाटात भीषण अपघात, दोन ठार, चार गंभीर

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर–जळगाव महामार्गावर (Chhatrapati Sambhajinagar–Jalgaon Highway) भीषण अपघात घडल्याची माहिती समोर

Ahilyanagar : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर (राहुरी प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) होवू घातलेल्या

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ketan Agrawal Murder Case : 'मला त्याला स्लो पॉयझन देऊन मारायचं होतं..';केतन हत्याकांड प्रकरणातील 'त्या' गुप्त कटामागचा मास्टरमाइंड कोण?

केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक दावा; 'स्लो पॉयझन' देण्याचाही कट असल्याची तपासात चर्चा पुणे : केतन

Minister Radhakrishna Vikhe Patil : मतदार यादीत घुसखोरांना जागा नाही ; पुनरिक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी पुढे या : ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar (Shevgaon) : मतदार यादीची सखोल पुनरिक्षण मोहीम भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.सरकारी स्तरावर काम सुरू असले