Jayant Narlikar Death: ज्येष्ठ खगोल शास्रज्ञ जयंत नारळीकर यांनी ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुणे: जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानप्रसारक डॉ. जयंत नारळीकर (Jayant Narlikar) यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी झोपेतच अखेरचा श्वास घेतला. भारतीय खगोलशास्त्राच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या नारळीकरांनी सामान्यांपर्यंत विज्ञान पोहोचवण्याचे कार्यही अविरतपणे केले.


चार दशकाहून अधिक कालावधीपासून जयंत नारळीकर यांचे खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याच बरोबर त्यांनी अनेक पुस्तकं देखील लिहिली आहेत. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्‍न केले. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. त्याचप्रमाणे डॉ. जयंत नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’ मांडली. असे हे मराठमोळे शास्त्रज्ञ वृद्धापकाळामुळे काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्यांच्या पश्चात गीता, गिरिजा व लीलावती या तीन मुली आहेत.


जयंत नारळीकर यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद भूषवले आहे. तसेच १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली होती.


जयंत नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे जुलै १९, १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रॅंग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ तर त्यांचीआई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. तर त्यांच्या पत्नी मंगला नारळीकर गणितज्ञ होत्या. ज्यांचे दोन वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. प्रतिष्ठित सांख्यिकीशास्त्रज्ञ व्ही. एस. हुजुरबाजार हे जयंत नारळीकर यांचे मामा होते. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ साली त्यांनी विज्ञानात पदवी (B.Sc.) प्राप्त केली. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडीच्या पदव्या मिळाल्या. शिवाय, रॅंग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे मिळाली.


Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात