Jayant Narlikar Death: ज्येष्ठ खगोल शास्रज्ञ जयंत नारळीकर यांनी ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुणे: जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानप्रसारक डॉ. जयंत नारळीकर (Jayant Narlikar) यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी झोपेतच अखेरचा श्वास घेतला. भारतीय खगोलशास्त्राच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या नारळीकरांनी सामान्यांपर्यंत विज्ञान पोहोचवण्याचे कार्यही अविरतपणे केले.


चार दशकाहून अधिक कालावधीपासून जयंत नारळीकर यांचे खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याच बरोबर त्यांनी अनेक पुस्तकं देखील लिहिली आहेत. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्‍न केले. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. त्याचप्रमाणे डॉ. जयंत नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’ मांडली. असे हे मराठमोळे शास्त्रज्ञ वृद्धापकाळामुळे काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्यांच्या पश्चात गीता, गिरिजा व लीलावती या तीन मुली आहेत.


जयंत नारळीकर यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद भूषवले आहे. तसेच १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली होती.


जयंत नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे जुलै १९, १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रॅंग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ तर त्यांचीआई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. तर त्यांच्या पत्नी मंगला नारळीकर गणितज्ञ होत्या. ज्यांचे दोन वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. प्रतिष्ठित सांख्यिकीशास्त्रज्ञ व्ही. एस. हुजुरबाजार हे जयंत नारळीकर यांचे मामा होते. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ साली त्यांनी विज्ञानात पदवी (B.Sc.) प्राप्त केली. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडीच्या पदव्या मिळाल्या. शिवाय, रॅंग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे मिळाली.


Comments
Add Comment

समृद्धी महामार्गावरील निष्काळजीपणानंतर खिळे काढले, वाहतूक पुन्हा सुरळीत

पुणे: नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग हा पुन्हा चर्चेत आला आहे. या महामार्गावर सतत वेगवेगळ्या कारणांमुळे अपघात

बंजारा समाजाचा धडक मोर्चा; मराठा समाजाप्रमाणे बंजारा समाजालाही हैदराबाद गॅझेट लागू करा

सोलापूर : बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून त्यांना अनुसूचित जमाती (एसटी) मधून आरक्षण द्यावे, अशी मागणी

भावी पिढीला प्रदूषणमुक्त पर्यावरण देण्यासाठी 'नो पीयूसी... नो फ्युएल' उपक्रम राबवणार! म्हणजे नेमकं काय करणार? जाणून घ्या

मुंबई: भविष्यातील पिढीला प्रदूषण मुक्त पर्यावरण देण्यासाठी सध्याच्या पिढीने स्वतः वर पर्यावरण पूरक काही

मनोज जरांगे यांची आणखी एक नवी मागणी... ओबीसी नेत्यांमध्ये मोठी खळबळ

संभाजीनगर: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबईतील आझाद मैदानात ५ दिवस उपोषण करत, सरकारकडून आपल्या मागण्या पूर्ण

मंत्रालयातच फसवणूक! सरकारी नोकरीच्या नावाखाली घेतली मुलाखत, आणि...

नागपूर: सरकारी नोकरीचे स्वप्न प्रत्येकांचे असते, त्यासाठी तरुणवर्ग विविध भरती प्रक्रियेची तयारी करतात, मुलाखती

मराठ्यांना कुणबी दाखले देण्यास सुरुवात

भुजबळांचे गैरसमज दूर करणार, शासननिर्णय व आश्वासनांची पूर्तता करण्याचे मंत्रिमंडळ उपसमितीचे