प्रहार    

Jayant Narlikar Death: ज्येष्ठ खगोल शास्रज्ञ जयंत नारळीकर यांनी ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

  124

Jayant Narlikar Death: ज्येष्ठ खगोल शास्रज्ञ जयंत नारळीकर यांनी ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुणे: जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानप्रसारक डॉ. जयंत नारळीकर (Jayant Narlikar) यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी झोपेतच अखेरचा श्वास घेतला. भारतीय खगोलशास्त्राच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या नारळीकरांनी सामान्यांपर्यंत विज्ञान पोहोचवण्याचे कार्यही अविरतपणे केले.


चार दशकाहून अधिक कालावधीपासून जयंत नारळीकर यांचे खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याच बरोबर त्यांनी अनेक पुस्तकं देखील लिहिली आहेत. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्‍न केले. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. त्याचप्रमाणे डॉ. जयंत नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’ मांडली. असे हे मराठमोळे शास्त्रज्ञ वृद्धापकाळामुळे काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्यांच्या पश्चात गीता, गिरिजा व लीलावती या तीन मुली आहेत.


जयंत नारळीकर यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद भूषवले आहे. तसेच १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली होती.


जयंत नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे जुलै १९, १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रॅंग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ तर त्यांचीआई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. तर त्यांच्या पत्नी मंगला नारळीकर गणितज्ञ होत्या. ज्यांचे दोन वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. प्रतिष्ठित सांख्यिकीशास्त्रज्ञ व्ही. एस. हुजुरबाजार हे जयंत नारळीकर यांचे मामा होते. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ साली त्यांनी विज्ञानात पदवी (B.Sc.) प्राप्त केली. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडीच्या पदव्या मिळाल्या. शिवाय, रॅंग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे मिळाली.


Comments
Add Comment

इम्तियाज जलील यांच्या घरी होणार मटण-चिकन पार्टी, थेट मुख्यमंत्र्यांना पार्टीचं निमंत्रण

१५ ऑगस्ट रोजी, कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय अनेक महापालिकांनी घेतला . या निर्णयावरून,

रायगड : आदिती तटकरेंना ध्वजारोहणाचा मान, रायगडमध्ये पुन्हा पालकमंत्रीपदावरून वाद

महायुतीचं सरकार आल्यापासून रायगडच्या पालकमंत्री पदावरुन असलेला वाद राज्याला सर्वश्रुत आहे.रायगडच्या

रत्नागिरी : लव्ह जिहादला एकत्र येऊन उत्तर द्या, राज्यात हिंदूंचे भक्कम सरकार - नितेश राणे

रत्नागिरीतील चिपळूणमधील रक्षाबंधनानिमित्त राखी संकलनाच्या कार्यक्रमात मंत्री नितेश राणे यांनी लव्ह

कोकणात राष्ट्रवादीला धक्का प्रशांत यादव भाजपमध्ये करणार प्रवेश, मंत्री नितेश राणे यांची घोषणा

मंत्री नितेश राणे यांनी कोकणात राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील

'ग्लोबल गणेश फेस्टिवल २०२५'च्या अध्यक्षपदी एकनाथ शिंदे, स्वागताध्यक्षपदी चंद्रकांत पाटील

पुणे: गौरवशाली परंपरा असलेल्या पुण्याचा गणेशोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक करण्यासाठी ग्लोबल

कांदा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नाशिक जिल्ह्यातील ९६७२ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना १८ कोटी ५८ लाख रुपयांचे अनुदान वितरीत

येवला: राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला लासलगाव