कल्याणमध्ये चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळला; श्रीसप्तश्रृंगी इमारतीचा स्लॅब कोसळून सहा जणांचा मृत्यू

कल्याण : कल्याण पूर्वमधील श्रीसप्तश्रृंगी या चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये तीन महिलांसह एका दीड वर्षाच्या चिमुकलीचा समावेश आहे. जखमींना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, ठाणे आपत्ती व्यवस्थापन पथक, पालिका अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिका-यांनी अथक प्रयत्नांनी आठ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र काहींना वाचविण्यात अपयश आले. अद्यापही काही जण ढिगा-याखाली अडकल्याची शक्यता असल्याने बचाव मोहीम सुरुच आहे.



या दुर्घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. इमारत जुनी असल्याची माहिती समोर आली असून त्याची स्थिती लक्षात घेता इतर रहिवाशांचीही काळजी घेतली जात आहे.


दरम्यान श्रीसप्तश्रृंगी इमारत ही धोकादायक इमारत म्हणून घोषित करण्यात आली होती. प्रशासनाने इमारत रिकामी करण्याचे आदेशही दिले होते. तरी काही कुटुंब तेथे वास्तव्यास होती.

Comments
Add Comment

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील