गच्चीवर गेली आणि एका फोटोसाठी गमावला जीव!

मुंबई : ढगाळ आकाश, थंड वाऱ्याची झुळूक आणि संध्याकाळचा रम्य क्षण... फोटोसाठी अगदी योग्य वेळ! पण त्या एका क्षणात एका कुटुंबाचे संपूर्ण आयुष्यच कोसळून गेले. दहिसरच्या मिस्किटा इमारतीत रहाणारी १६ वर्षांची जान्हवी चावला गच्चीवर फोटो काढण्यासाठी गेली होती. पण फोटो काढत असताना ती त्या गच्चीवरून खाली पडली आणि अखेरचा श्वास घेतला.


जान्हवीने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. तिचं आयुष्य पुढे किती उजळणार होतं, किती स्वप्नं उराशी बाळगलेली होती. पण रविवारी संध्याकाळी, ती गच्चीवर गेली आणि तिथून थेट सातव्या मजल्यावरून खाली पडली. फोटो काढत असताना अचानक तिचा तोल गेला, आणि क्षणभरात काळाने तिला गाठलं.



तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी हताशपणे तिचा मृत्यू घोषित केला. विशेष म्हणजे जान्हवीचे वडील त्या क्षणी इमारतीखालीच होते. त्यांच्या डोळ्यांसमोरच त्यांच्या लेकीचं हे भयानक अपघाती अंत घडलं.


या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी सुरू केली असून, नेमकं काय घडलं याचा शोध सुरू आहे.


जान्हवीचं हसतं-खेळतं आयुष्य, एका क्षणात असं संपेल, यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. एका फोटोसाठी गेलेली जान्हवी पुन्हा कधीच घरात परतली नाही... आणि मागे राहिलं ते फक्त अश्रूंचं आणि आठवणींचं गाठोडं.

Comments
Add Comment

Water Storage in Mumbai : जुलैच्या सरींकडे मुंबईकरांच्या नजरा खिळल्या, तलावांत केवळ ८.५ टक्के पाणीसाठा; २० ऑगस्टपर्यंत पुरेल पाणी

मुंबई  : मुंबईत मंगळवारपासून पुढील तीन दिवस पाऊस पडेल. मात्र, हा पाऊस पडला तरी तो ३० जूनपर्यंत या संपूर्ण

IAS Transfer : पी. वेलरासू यांच्यासह तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारने सोमवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि महापारेषणमधील

Chandrakant Patil : पॉलीटेक्निक प्रवेश अर्जासाठी 2 जुलैपर्यंत मुदतवाढ; 1.45 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी

 उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील मुंबई,  : प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी (पॉलीटेक्निक)

Monsoon Update : मान्सूनच्या प्रगतीमुळे राज्यात आनंदाचे वातावरण

मुंबई : बहुप्रतिक्षित मान्सूनने अखेर दोन आठवड्यांच्या विलंबानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात पुढे वाटचाल सुरू

Temple Endowment Law : नवा देवस्थान इनाम जमीन कायदा सर्वंकष न्याय देणारा असेल, महसूलमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई : राज्यातील देवस्थान इनाम जमिनींचे संवर्धन करण्यासह वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले समस्या मार्गी

Bangladeshi infiltrators : अडीच वर्षांत महाराष्ट्रातून ३ हजार ५४१ बांगलादेशी घुसखोरांची हकालपट्टी

मुंबई : वर्ष २०२४ पासून आजपर्यंत म्हणजेच गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रातून